शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

..अन् सिंधुदुर्गातील गाव सोडून गेलेले चिंदरमधील ग्रामस्थ पुन्हा परतले, सुनसुन गाव पुन्हा गजबजले

By सुधीर राणे | Updated: November 22, 2022 18:25 IST

वेशीबाहेर असलेल्या ग्रामस्थांना गाव भरण्याची होती प्रतिक्षा

आचरा: श्री देव रवळनाथाचा कौल मिळताच चिंदर गाव आज, मंगळवारी पुन्हा गजबजला. निसर्गाच्या सानिध्यात थाटलेले आपले संसार पुन्हा एकत्र करीत गावाकऱ्यांची पावले आपल्या घराच्या दिशेने वळली. शेकडो वर्षापासून परंपरा जपणाऱ्या गावपळण पुर्ण झाल्याचा कौल मिळताच चार दिवसांनी गावकरी गुराढोरासह पुन्हा गावात परतले.ग्रामस्थांनी सहजीवनाचा आनंद लुटून परत गाव गाठला आहे. तीन वर्षांनी होणाऱ्या गावपळणीकरिता कौल मिळाल्याने १८ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत गावपळण पार पडली. सोमवारी दुपारी देवाचा कौल न झाल्याने मंगळवारी दुपारी देवाचा कौल झाल्यावर गाव भरण्यास सुरुवात झाली होती. चाकरमानी, नातेवाईक, शेजारील गावातील ग्रामस्थ हे गावपळणीत उत्साहाने सहभागी झाले होते.चिंदर गावाच्या सीमेलगतच्या आचरा, वायंगणी, कालावल, त्रिबंक येथे चिंदरवासीय झोपाड्या उभारून आपले संसार थाटून राहिले होते. निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनोखा अनुभव गावकऱ्यांनी घेतला. चार रात्रीच्या मुक्कामानंतर देव रवळनाथचा कौल झाल्याने चिंदरवासीय आज मिळेल त्या वाहनाने आपल्या घराकडे धाव घेतली. तर काहीजणांनी आपला रानात थाटलेला संसार गोळा करून पायी चालत घर गाठले.चार दिवस सुनसुन झालेले गाव पुन्हा गजबजलेशुक्रवारपासून गावपळणीमुळे वेशीबाहेर असलेल्या चिंदर ग्रामस्थांना सोमवारी गाव भरण्याची प्रतिक्षा होती. मात्र देवाने कौल दिला नसल्याने वेशीबाहेर एक दिवसाने मुक्काम वाढला होता. आज, मंगळवारी गाव भरण्याचा कौल मिळताच ग्रामस्थ गावात आले व गावाचे जीवनमान पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली. चिंदर गाव गेले चार दिवस शांत असणारा गाव पुन्हा गजबजला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग