शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

आंबोलीचा प्रभार ८० किलोमीटर दूरच्या वनक्षेत्रपालकडे, दीपक केसरकरांच्या बैठकीत पडसाद

By अनंत खं.जाधव | Updated: January 24, 2025 06:38 IST

Amboli Forest News: आंबोली येथील वनक्षेत्रपाल यांची बदली होऊन तब्बल सहा महिने उलटले तरी अद्याप पर्यत आंबोली ला नवीन वनक्षेत्रपाल दिला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सावंतवाडी - आंबोली येथील वनक्षेत्रपाल यांची बदली होऊन तब्बल सहा महिने उलटले तरी अद्याप पर्यत आंबोली ला नवीन वनक्षेत्रपाल दिला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातच आंबोली सारख्या वन दृष्ट्या संवेदनशील अशा वनक्षेत्र पदाचा प्रभारी कार्यभार सावंतवाडी कुडाळ येथील वनक्षेत्रपाल यांच्याकडे द्याचे सोडून तब्बल 80 किलोमीटर दूर अशा कडावल वनक्षेत्रपाल कडे देण्यात आल्याने चर्चेचा विषय बनला असून याचे पडसाद आमदार दीपक केसरकर यांच्या बैठकीत ही चांगलेच उमटले.

या प्रभारी वनक्षेत्रपाला बद्दल यापूर्वीच अनेक तक्रारी असतना नव्याने आंबोली सारख्या संवेदनशील क्षेत्राचा कार्यभार देण्यात आला असून तातडीने या क्षेत्राला शासनाने नवीन वनक्षेत्रपाल द्यावा अशी मागणी होत आहे.आमदार केसरकर यांनी ही याची दखल घेत शासनाला तसे लवकरच कळवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आंबोली येथील वनक्षेत्रपाल पदाचा कार्यभार हा विद्या घोडके यांच्याकडे होता.पण त्याची सहा महिन्यापूर्वीच पदोन्नतीवर बदली झाल्याने या पदाचा कार्यभार कडावल वनक्षेत्रपाल अमित कटके यांच्याकडे देण्यात आला आहे.मात्र कटके यांचा कायमस्वरूपी प्रभार हा कडावलचा असून कडावल ते आंबोली हे अंतर तब्बल 80 किलोमीटर चे आहे.त्यामुळेच ते कडावल चे काम करणार कि आंबोली चे काम करणार कसे असा प्रश्न सर्वानाच पडला आहे.

आंबोली च्या जवळपास दोडामार्ग तसेच सावंतवाडी कुडाळ असे वनक्षेत्रपाल कार्यालय मात्र वनविभाग कटके याच्यावरच मेहरबान का?असा प्रश्न पडू लागला आहे.त्यातच गेल्या काहि महिन्यात आंबोली वनपरिक्षेत्रात मोठ्याप्रमाणात वृक्षतोड व शिकारी चे प्रकार ही निर्दशनास आले आहेत तसेच परवाना धारक ट्रक थांबवून टोल वसुल करण्याचे प्रकार ही वाढले असून याबाबत काहिनी थेट कटके तसेच उपवनसंरक्षक यांच्याकडे ही तक्रारी केल्या आहेत.

आंबोली वनपरिक्षेत्र हे संवेदनशील असल्याने येथील कार्यभार प्रभारी कडे देण्याऐवजी कायमस्वरूपी अधिकारी देण्यात यावा यासाठी बुधवारी सावंतवाडी येथे आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आवाज उठवण्यात आला असून या प्रकारानंतर आमदार केसरकर यांनी आपण शासनाकडे मागणी करून लवकरच आंबोली येथे कायमस्वरूपी वनक्षेत्रपाल देण्यास सांगू असे स्पष्ट केले आहे.या प्रकारानंतर उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी यांनी ही आंबोली बाबत काहि तक्रार असल्यास थेट मला संपर्क करा असे आवाहन उपस्थितांना केले.

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनforestजंगलforest departmentवनविभागDeepak Kesarkarदीपक केसरकर