शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनस्थळ आंबोली : पोलीस ठाण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 14:44 IST

अनंत जाधव  सावंतवाडी : आंबोलीसाठी नव्याने उभारण्यात येणारे पोलीस ठाणे हे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. अपुरे पोलीस बळ आणि मोठे ...

ठळक मुद्देपर्यटनस्थळ आंबोली : पोलीस ठाण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत अपुरे पोलीस दल, मोठे क्षेत्रफळ!

अनंत जाधव सावंतवाडी : आंबोलीसाठी नव्याने उभारण्यात येणारे पोलीस ठाणे हे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. अपुरे पोलीस बळ आणि मोठे क्षेत्रफळ हेही आंंबोलीत क्राईमच्या घटना वाढण्यास कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.

पश्चिम घाटातील पर्यटनाचा हॉटस्पॉट असलेले थंड हवेचे ठिकाण म्हणजे आंबोली. हे पर्यटन स्थळ गेल्या काही वर्षांपासून क्राईम मिस्ट्रीचा हॉटस्पॉट बनत चालले आहे. या ठिकाणी घडणाऱ्या घटनांनी पोलिसांंपुढची डोकेदुखी वाढत चालली आहे.

आंबोलीसाठी नव्याने उभारण्यात येणारे पोलीस ठाणे हे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. अपुरे पोलीस बळ आणि मोठे क्षेत्रफळ हेही आंंबोलीत क्राईमच्या घटना वाढण्यास कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.शांत, सुंदर आंबोलीचा चेहरा अशा घटनांनी बदलत चालल्याने तेथील व्यवसायावरही त्याचा मोठा परिणाम होत आहे. एकतर आंबोली घाट कोसळण्याच्या घटनांमुळे तेथील व्यावसायिक चिंतेत सापडला असताना सतत बाहेरील गुन्हेगारी डोके वर काढत असल्याने आंबोलीच्या चिंतेत आणखीनच भर पडत चालली आहे.आंबोलीची बदनामी होेणारी पहिली घटना म्हणजे पंजाब येथील युवकाने तेथील मुलीचा खून करून आंबोलीतील एका लॉजमध्ये केलेली आत्महत्या. त्यानंतर एकामागून एक अशा घटना घडत गेल्या. त्या अद्यापपर्यंत थांबण्याचे नावच घेत नाहीत.त्यातच सगळ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारी तशीच एक घटना घडली. ती म्हणजे सांगली येथील मोबाईल चोरीच्या घटनेतील संशयित आरोपीला आंंबोलीतील महादेवगड पॉर्इंटवर पोलिसांंनी आणून जाळून मारण्यात आले. या घटनेनंतर आंबोलीची संपूर्ण राज्यात बदनामी झाली.ही घटना सांगलीची असली तरी कृत्य आंबोलीत केल्याने आंबोलीची बदनामी झाली. त्यानंतर गडहिंग्लज येथील शिक्षकाची हत्या असो किंवा साखर वाहतूक करणाºया ट्रकवर दरोडा घालून ट्रक चालकाला आंबोलीत आणून खून केल्याचा प्रकार असो या घटना सतत घडत गेल्याने आंबोलीची सर्वत्र बदनामी झाल्याचे दिसून येत आहे.

त्यातच गेल्यावर्षी आंंबोली येथील घाटात असाच महिलेचा मृतदेह मिळाला होता. पण त्याचा तपास अद्याप लागलेला नाही. आता चार दिवसांपूर्वी नव्याने आणखी एका महिलेचा मृतदेह मिळाल्याने या घटनेचा तपासतरी लागतो का ? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.सततच्या घटनांमुळे आंबोलीत बाहेरून पर्यटक जायचे की नाही याचा विचार करीत असतो. त्यातच आंबोलीत नैसर्गिक पर्यटन मोठ्या प्रमाणात आहे. खरे पण सरकारकडून सतत होणारा दुर्लक्ष यामुळे आंबोलीचे पर्यटन मागे पडत चालले आहे.पेट्रोलिंगवर भर देणार : शशिकांत खोतआंंबोलीतून खाली येणारी प्रत्येक गाडी तपासणी केल्यानंतरच खाली येते. मात्र, कोणी रात्रीच्या वेळी अशा घटना घडवित असतील तर घाटात रात्रीच्यावेळी पेट्रोलिंगही वाढवावे लागणार आहे. तसेच आंंबोलीचा परिसर मोठा असल्याने तेथे वाढीव पोलीस बळही दिले जाईल, असे मत सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी व्यक्त केले आहे.आंबोली, चौकुळ, गेळे हा परिसर क्षेत्रफळानुसार तसा मोठा आहे. मात्र, अपुरे पोलीस दल असल्याने पोलीस लक्ष तरी देणार कुठे? असाच प्रश्न पडतो. त्यामुळे आंबोलीची बदनामी रोखायची असल्यास आंबोलीला नव्याने पोलीस ठाणे मंजूर करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत आंबोलीत अतिरिक्त पोलीस दल देणे गरजेचे आहे. अन्यथा बाहेरील गुन्हेगारी आंबोलीची पर्यायाने सिंधुदुर्गची डोकेदुखी अशी वाढवित राहणार आहे.गुन्हेगारी घटनांनी पर्यटनाला बाधासतत घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना आंबोलीच्या पर्यटनाला बाधा आणणाऱ्याच आहेत. आंबोली येथे सांंगली येथील घटनेनंतर दूरक्षेत्राऐवजी पोलीस ठाणे उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. पोलीस अधीक्षकांनी तसा प्रस्ताव शासनाकडेही पाठविला होता. मात्र, अद्यापपर्यंत आंबोलीसाठी नवे पोलीस ठाणे मंजूर झाले नाही.

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनPolice Stationपोलीस ठाणेsindhudurgसिंधुदुर्गtourismपर्यटन