शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

आंबोलीत बॅटरी आॅपरेट कार, पर्यटन सफारीसाठी निर्णय : पहिल्या टप्प्यात दहा कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 15:23 IST

आंबोलीतील पर्यटनाला चालना देण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंबोलीच्या पर्यटन सफारीसाठी बॅटरी आॅपरेट कार घेण्याचे निश्चित केले आहे. पहिल्या टप्प्यात वन विभागाच्या माध्यमातून दहा कार घेण्यात येण्यात येणार आहेत. या सर्व कार वनविभाग स्थानिक वनसमितीकडे देणार असून, त्यांच्या माध्यमातून त्या चालविण्याचा त्यांचा विचार आहे.

ठळक मुद्देआंबोलीत बॅटरी आॅपरेट कार, पर्यटन सफारीसाठी निर्णय पहिल्या टप्प्यात दहा कार; पालकमंत्र्यांची संकल्पना

अनंत जाधव सावंतवाडी : आंबोलीतील पर्यटनाला चालना देण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंबोलीच्या पर्यटन सफारीसाठी बॅटरी आॅपरेट कार घेण्याचे निश्चित केले आहे. पहिल्या टप्प्यात वन विभागाच्या माध्यमातून दहा कार घेण्यात येण्यात येणार आहेत. या सर्व कार वनविभाग स्थानिक वनसमितीकडे देणार असून, त्यांच्या माध्यमातून त्या चालविण्याचा त्यांचा विचार आहे.आंबोलीत मोठ्या प्रमाणात देशभरातून पर्यटक येत असतात. मात्र, या पर्यटकांना आंबोलीच्या पर्यटनाची ओळख हवी तशी होत नाही. तसेच आंबोलीत पर्यटन गाईडही नाही. आंबोलीच्या जंगलात बरेच काही पाहण्यासारखे आहे. मात्र, आंबोलीची ओळख असलेला धबधबाच फक्त पर्यटक पाहतात आणि निघून जातात. म्हणूनच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आंबोलीच्या पर्यटन सफारीला चालना मिळावी यासाठी खास पुढाकार घेतला आहे.पावसाळ््यात धबधबे पाहण्यासाठी लाखो पर्यटक हे शनिवारी व रविवारी येत असल्याने आंबोलीच्या घाटात वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी टाळावी म्हणून येणाऱ्या पर्यटकांनी आंबोलीतच आपले वाहन पार्किंग करावे आणि खाली बॅटरी आॅपरेट कारने यावे, अशी संकल्पना असल्याने मंत्री केसरकर यांनी या बॅटरी आॅपरेट कार आणण्याचे ठरविले आहे. या कार वनविभागाच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणार आहेत. या सर्व कार वनसमिती खरेदी करणार आहे.वनविभागाने दीपक केसरकर यांच्याकडे ३० कारचा प्रस्ताव दिला होता. मात्र आता पहिल्या टप्प्यात मंत्री केसरकर यांनी दहाच कार खरेदी करण्याचे निश्चित केले आहे. या खरेदीला नियोजनच्या बैठकीतही मान्यता मिळाली असून, आता पुढील प्रकिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दिली आहे.बॅटरी आॅपरेट कारऐवजी सहाआसनी घ्या : वनविभागाचे मतवनविभागाने आंबोलीत बॅटरी आॅपरेट कार घेण्याऐवजी सहा आसनी रिक्षा खरेदी करण्यात याव्यात, अशी मागणी पालकमंत्री केसरकर यांच्याकडे केली आहे. मात्र केसरकर यांनी बॅटरी कार खरेदीवरच भर दिला आहे.स्थानिक सहा आसनीधारक अडचणीतजर वनविभागाने बॅटरी आॅपरेट कार किंवा सहा आसनी रिक्षा जर आंबोलीत चालविल्या तर स्थानिक सहा आसनी रिक्षा चालकांवर अन्याय होणार आहे. कारण त्याच्या माध्यमातून होणाऱ्या वाहतुकीवर आपोआप निर्बंध येणार आहे. त्यामुळे यावर सुवर्णमध्य काढणे गरजेचे आहे.बॅटरी आॅपरेट कारच घेणार : दीपक केसरकरआम्ही आंबोलीच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी बॅटरी आॅपरेट कार खरेदी करणार असून, पहिल्या टप्प्यात दहा कार खरेदी केल्या जाणार आहेत. सहा आसनी रिक्षा खरेदी केल्या जाणार नाहीत. पर्यावरणदृष्ट्या हा प्रकल्प असून, वनविभाग किंवा पर्यटन यांच्या माध्यमातून या कार खरेदी केल्या जाणार आहेत.

टॅग्स :carकारsindhudurgसिंधुदुर्ग