शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

महायुतीमुळेच २५ वर्षानंतर गेळे गावाला सुवर्ण दिवस - पालकमंत्री रविंद्र चव्हाण 

By अनंत खं.जाधव | Updated: October 9, 2024 16:54 IST

मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत जमिनीचे वाटप 

सावंतवाडी : वर्षानुवर्षे ज्या प्रश्नासंदर्भात आपण सर्वजण झटत होतो व संघर्ष करीत होतो तो गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न खऱ्या अर्थाने सुटला आहे. २५ वर्षानंतर हा सुवर्ण दिवस महायुती सरकारमुळेच पाहात आहे. त्यामुळे आपले आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी ठेवा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले आहे.गेळे कबुलायतदार महाराष्ट्र शासनाच्या जमिनीचे वाटप व पोटहिस्सा मोजणीच्या कागदपत्रांचे वाटप सावंतवाडीत पार पडले. मंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात  ग्रामस्थांना  पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, लखमराजे भोंसले, राजन तेली, संजू परब, प्रभाकर सावंत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.मंत्री चव्हाण म्हणाले, आंबोली, चौकुळ व गेळे या गावांमधील कबूलायतदार गावकर प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली. तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा विषय पुढे नेण्याचे काम केले. तर शिक्षण मंत्री दीपक केसरकर व मी सातत्याने या प्रश्नाच्या पाठीशी राहून हा प्रश्न सोडविला. महायुती सरकारच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच हा प्रश्न सुटू शकला असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.मंत्री केसरकर यांनी, आंबोली चौकुळ गेळे ही तीन गावे पर्यटनाचा केंद्रबिंदू राहणार असून मला ही गावे नेहमीच जवळची वाटली आहेत. आज खऱ्या अर्थाने लोकांचे सरकार कसे असते हे बघितले. आता या तीन गावांमधील ३५ सेक्शनचा प्रश्न राहिला नसून हे सेक्शन हटविण्यात आले आहे. त्यामुळे आता पूर्ण जमिन वाटप होणार आहे असेही केसरकर म्हणाले. यावेळी गेळेच्या गावाच्या वतीने पालकमंत्र्यासह, शिक्षण मंत्री व लखम सावंत भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गguardian ministerपालक मंत्रीDeepak Kesarkarदीपक केसरकर