शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

महायुतीमुळेच २५ वर्षानंतर गेळे गावाला सुवर्ण दिवस - पालकमंत्री रविंद्र चव्हाण 

By अनंत खं.जाधव | Updated: October 9, 2024 16:54 IST

मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत जमिनीचे वाटप 

सावंतवाडी : वर्षानुवर्षे ज्या प्रश्नासंदर्भात आपण सर्वजण झटत होतो व संघर्ष करीत होतो तो गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न खऱ्या अर्थाने सुटला आहे. २५ वर्षानंतर हा सुवर्ण दिवस महायुती सरकारमुळेच पाहात आहे. त्यामुळे आपले आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी ठेवा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले आहे.गेळे कबुलायतदार महाराष्ट्र शासनाच्या जमिनीचे वाटप व पोटहिस्सा मोजणीच्या कागदपत्रांचे वाटप सावंतवाडीत पार पडले. मंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात  ग्रामस्थांना  पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, लखमराजे भोंसले, राजन तेली, संजू परब, प्रभाकर सावंत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.मंत्री चव्हाण म्हणाले, आंबोली, चौकुळ व गेळे या गावांमधील कबूलायतदार गावकर प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली. तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा विषय पुढे नेण्याचे काम केले. तर शिक्षण मंत्री दीपक केसरकर व मी सातत्याने या प्रश्नाच्या पाठीशी राहून हा प्रश्न सोडविला. महायुती सरकारच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच हा प्रश्न सुटू शकला असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.मंत्री केसरकर यांनी, आंबोली चौकुळ गेळे ही तीन गावे पर्यटनाचा केंद्रबिंदू राहणार असून मला ही गावे नेहमीच जवळची वाटली आहेत. आज खऱ्या अर्थाने लोकांचे सरकार कसे असते हे बघितले. आता या तीन गावांमधील ३५ सेक्शनचा प्रश्न राहिला नसून हे सेक्शन हटविण्यात आले आहे. त्यामुळे आता पूर्ण जमिन वाटप होणार आहे असेही केसरकर म्हणाले. यावेळी गेळेच्या गावाच्या वतीने पालकमंत्र्यासह, शिक्षण मंत्री व लखम सावंत भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गguardian ministerपालक मंत्रीDeepak Kesarkarदीपक केसरकर