शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

समाजकारणासाठी सर्वांनी एकत्र यावे

By admin | Updated: February 20, 2015 23:12 IST

नीतेश राणे : देवगड तालुका आमसभेत मार्गदर्शन

देवगड : तालुक्याच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार असून पुढची २५ वर्षे देवगडला विकासात कसे पुढे नेता येईल यासाठी दिशा ठरविणार आहे. समाजकारण करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन आमदार नीतेश राणे यांनी देवगड तालुक्याच्या आमसभेत केले. शुक्रवारी येथील इंद्रप्रस्थ सभागृहात देवगड तालुक्याची आमसभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सभापती डॉ. मनोज सारंग, वित्त व बांधकाम सभापती संजय बोंबडी, माजी आमदार अजित गोगटे, तहसीलदार जीवन कांबळे, सदाशिव ओगले, प्रणाली माने आदी मान्यवर उपस्थित होते. आमसभेच्या सुरुवातीला देवगडच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या व गेल्या वर्षभरात निधन पावलेल्यांची आठवण करण्यात आली.आमदार राणे पुढे म्हणाले की, देवगड-जामसंडे पाणीप्रश्नावर राजकारण न करता हा प्रश्न सोडविण्यासाठी एकमेकांना सहकार्य करावे. तिलारीप्रमाणे देवगडात योजना राबविण्याचा प्रयत्न झाल्यास आपला त्याला विरोधच असेल. निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल. पडेल कॅन्टींग येथील सर्कल वाहतूकदृष्ट्या अडचणीचे असल्याने त्याचे काम स्थगित करण्यात येईल. देवगड तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. खेळांच्या स्पर्धांमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या खर्चाबाबत प्रस्ताव मांडण्यात आला.आनंदवाडी प्रकल्पासह इतर प्रश्नांबाबत लेखी निवेदने देण्यास सांगण्यात आले. आंबा बागायतदारांप्रमाणेच मत्स्य व्यावसायिकांनाही क्रेट देण्याची मागणी शिवाजी कांदळगावकर यांनी केली. माजी आमदार गोगटे यांनी देवगड-जामसंडे नगरपंचायत होण्यासंदर्भात मुद्दा मांडला. आमसभेला उपस्थित नसलेल्या वीज वितरणच्या अधिकाऱ्याबद्दल आमदार राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आमदार राणे म्हणाले की, देवगडला मागासलेला तालुका असे म्हटले जाते. आता ही प्रतिमा बदलून देवगडला विकसनशील व पुरोगामी तालुका असे म्हटले जाईल. तालुक्याच्या विकासाची जबाबदारी आमच्यावर आहे. या आधीच्या लोकप्रतिनिधींनी आपल्यापरीने विकास केला. तशाच प्रकारे विकास करताना लोकांनी दिलेली संधी योग्य रितीने पार पाडली जाईल. (वार्ताहर)विविध पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा सत्कारसभेदरम्यान पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक, आदर्श ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांचा सत्कार करण्यात आला. देवगड पंचायत समितीने पंचायत राज अभियानात प्रथम क्रमांक मिळविल्याने तसेच आय.एस.ओ. मानांकन प्राप्त केल्याने गटविकास अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.