शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जनतेने निवडून दिलेले सिंधुदुर्गातील सर्वच लोकप्रतिनिधी अपयशी : उपरकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 18:53 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर न झालेल्या विकासकामांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंदोलनाचा फार्स निर्माण केला जात आहे. वास्तविक जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीच लोकप्रतिनिधीना जनतेने निवडून दिले आहे. मात्र, जनतेचे प्रश्न सोडविण्यात जिल्ह्यातील फक्त एकच आमदार नाही तर सर्वच आमदार, खासदार आणि मंत्री अपयशी ठरले आहेत.अशी टीका मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देजनतेने निवडून दिलेले सिंधुदुर्गातील सर्वच लोकप्रतिनिधी अपयशी!परशुराम उपरकर यांची टीका: जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आंदोलने

कणकवली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर न झालेल्या विकासकामांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंदोलनाचा फार्स निर्माण केला जात आहे. वास्तविक जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीच लोकप्रतिनिधीना जनतेने निवडून दिले आहे. मात्र, जनतेचे प्रश्न सोडविण्यात जिल्ह्यातील फक्त एकच आमदार नाही तर सर्वच आमदार, खासदार आणि मंत्री अपयशी ठरले आहेत.अशी टीका मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी परशुराम उपरकर पुढे म्हणाले, मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारसभा घेतल्या. त्याचा फटका निश्चितच युतीला बसेल. नरेंद्र मोदी यांनी देशभर प्रचार करताना अगदी खालची पातळी गाठली. राज्यातही युतीला फटका बसणार असल्याने धसका घेतलेल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदार , माजी आमदार तसेच पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची पाळी आली आहे.केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी ३१ मार्च २०१९ पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल .अशी घोषणा केली होती. तर पावसाळ्यात राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डे मुक्त रस्ते करण्याबरोबरच महामार्गाची एक लेन तत्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काम अपूर्णच असल्याने मंत्री नागरिकांबरोबरच त्यांच्या पदाधिकाऱ्यानाही फसवतात असे सिद्ध झाले आहे.त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांच्याकडे समस्या मांडत बसण्यापेक्षा त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांकडेच सरळ मागणी करून त्याची पूर्तता करून घ्यावी. मात्र, सत्ताधाऱ्याना आपण भविष्यात सत्तेत असणार नाही असे वाटत असल्याने सध्या आंदोलनाची गरज पडली आहे, असे चित्र दिसत आहे.मनसेने महामार्ग चौपदरीकरण तसेच इतर समस्यांविरोधात यापूर्वीच आवाज उठविला होता. परंतु , मध्यतरी सर्वत्र चर्चा होती की, महामार्ग ठेकेदाराने काही नेत्यांना चारचाकी गाड्या भेट दिल्या. त्यांची वैधता संपत आल्याने पुन्हा आंदोलनाची भाषा या नेत्यांना करावी लागत आहे का? हे समजत नाही.जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील नेते , खासदार, आमदार, पालकमंत्री हे जनतेच्या समस्या सोडवत नाहीत. त्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांना देखील जनतेच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही.सर्वच खेळखंडोबा सुरू आहे. असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.मनसेकडून सातत्यपूर्ण आंदोलने !जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मनसेकडून सातत्यपूर्ण आंदोलने करण्यात येत आहेत. त्यांना यशही मिळत आहे. यापुढेही जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मनसे आंदोलने करेल.असे यावेळी परशुराम उपरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग