शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

जनतेने निवडून दिलेले सिंधुदुर्गातील सर्वच लोकप्रतिनिधी अपयशी : उपरकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 18:53 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर न झालेल्या विकासकामांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंदोलनाचा फार्स निर्माण केला जात आहे. वास्तविक जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीच लोकप्रतिनिधीना जनतेने निवडून दिले आहे. मात्र, जनतेचे प्रश्न सोडविण्यात जिल्ह्यातील फक्त एकच आमदार नाही तर सर्वच आमदार, खासदार आणि मंत्री अपयशी ठरले आहेत.अशी टीका मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देजनतेने निवडून दिलेले सिंधुदुर्गातील सर्वच लोकप्रतिनिधी अपयशी!परशुराम उपरकर यांची टीका: जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आंदोलने

कणकवली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर न झालेल्या विकासकामांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंदोलनाचा फार्स निर्माण केला जात आहे. वास्तविक जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठीच लोकप्रतिनिधीना जनतेने निवडून दिले आहे. मात्र, जनतेचे प्रश्न सोडविण्यात जिल्ह्यातील फक्त एकच आमदार नाही तर सर्वच आमदार, खासदार आणि मंत्री अपयशी ठरले आहेत.अशी टीका मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी परशुराम उपरकर पुढे म्हणाले, मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारसभा घेतल्या. त्याचा फटका निश्चितच युतीला बसेल. नरेंद्र मोदी यांनी देशभर प्रचार करताना अगदी खालची पातळी गाठली. राज्यातही युतीला फटका बसणार असल्याने धसका घेतलेल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदार , माजी आमदार तसेच पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची पाळी आली आहे.केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी ३१ मार्च २०१९ पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल .अशी घोषणा केली होती. तर पावसाळ्यात राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खड्डे मुक्त रस्ते करण्याबरोबरच महामार्गाची एक लेन तत्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, काम अपूर्णच असल्याने मंत्री नागरिकांबरोबरच त्यांच्या पदाधिकाऱ्यानाही फसवतात असे सिद्ध झाले आहे.त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी महामार्ग प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांच्याकडे समस्या मांडत बसण्यापेक्षा त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांकडेच सरळ मागणी करून त्याची पूर्तता करून घ्यावी. मात्र, सत्ताधाऱ्याना आपण भविष्यात सत्तेत असणार नाही असे वाटत असल्याने सध्या आंदोलनाची गरज पडली आहे, असे चित्र दिसत आहे.मनसेने महामार्ग चौपदरीकरण तसेच इतर समस्यांविरोधात यापूर्वीच आवाज उठविला होता. परंतु , मध्यतरी सर्वत्र चर्चा होती की, महामार्ग ठेकेदाराने काही नेत्यांना चारचाकी गाड्या भेट दिल्या. त्यांची वैधता संपत आल्याने पुन्हा आंदोलनाची भाषा या नेत्यांना करावी लागत आहे का? हे समजत नाही.जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील नेते , खासदार, आमदार, पालकमंत्री हे जनतेच्या समस्या सोडवत नाहीत. त्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांना देखील जनतेच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही.सर्वच खेळखंडोबा सुरू आहे. असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.मनसेकडून सातत्यपूर्ण आंदोलने !जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी मनसेकडून सातत्यपूर्ण आंदोलने करण्यात येत आहेत. त्यांना यशही मिळत आहे. यापुढेही जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मनसे आंदोलने करेल.असे यावेळी परशुराम उपरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग