शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
7
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
8
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
9
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
10
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
11
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
12
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
13
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
14
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
15
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
16
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
17
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
18
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
19
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
20
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका

कृषी समिती सभा : पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 15:44 IST

निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईपोटी सिंधुदुर्गाला मिळालेल्या २५ कोटींपैकी नुकसानग्रस्तांपर्यंत २५ लाखसुद्धा पोहोचले नसल्याचा आरोप गटनेते रणजित देसाई यांनी करीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला.

ठळक मुद्देकृषी समिती सभा : पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा निषेधरणजित देसाई यांचा आरोप, सिंधुदुर्गला कोणी वाली नसल्याची टीका

सिंधुदुर्ग : निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईपोटी सिंधुदुर्गाला मिळालेल्या २५ कोटींपैकी नुकसानग्रस्तांपर्यंत २५ लाखसुद्धा पोहोचले नसल्याचा आरोप गटनेते रणजित देसाई यांनी करीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला.

उदय सामंत हे रत्नागिरीचे असल्यामुळे व रायगड जिल्ह्यात तटकरे असल्यामुळे तेथे भरघोस निधी मिळतो. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्याला वाली कोण? असा प्रश्न उपस्थित करीत पालकमंत्री उदय सामंत यांना लक्ष्य केले.जिल्हा परिषद कृषी समिती सभा आॅनलाईनद्वारे बुधवारी सकाळच्या सत्रात जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी समिती सचिव तथा कृषी विकास अधिकारी सुनील चव्हाण, सदस्य गटनेते रणजित देसाई, गणेश राणे, संजय देसाई, सुधीर नकाशे, महेंद्र चव्हाण, अमरसेन सावंत आदी उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला या महिन्यात निधन झालेले भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी, पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांचे आई-वडील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मधुसुदन बांदिवडेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ कोटींचे पॅकेज जाहीर केले. जुलै महिन्यात याची घोषणाही झाली. मात्र, यापैकी २५ लाखसुद्धा नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचले नसल्याचा आरोप देसाई यांनी केला. आपल्या जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे दोन आमदार, एक खासदार असूनही जिल्ह्याला वाली कोणीही नसल्याचा आरोपही देसाई यांनी केला. सुधीर नकाशे यांनीही आगपाखड केली....तर तुमची पळता भुई थोडी होईलशिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांना सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी वेळोवेळी घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सगळे विरूद्ध अमरसेन असे चित्र पहावयास मिळाले. जिल्हा रुग्णालयाच्या एका विषयावर गटनेते रणजित देसाई यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्हा रुग्णालयात सुविधा नाहीत. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर आहे. कित्येक दिवस चादरी बदलल्या जात नाहीत. स्वच्छता नाही. यापेक्षाही भयाण परिस्थिती आहे. सगळेच बोलायला गेलो तर तुमची पळता भुई थोडी होईल अशा शब्दांत सदस्य सावंत यांना इशारा दिला.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतsindhudurgसिंधुदुर्ग