शहरं
Join us  
Trending Stories
1
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
2
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
3
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
4
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
5
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
6
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
7
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
8
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
10
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
11
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
12
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
13
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
14
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
15
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
16
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
17
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
18
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
19
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
20
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी समिती सभा : पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 15:44 IST

निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईपोटी सिंधुदुर्गाला मिळालेल्या २५ कोटींपैकी नुकसानग्रस्तांपर्यंत २५ लाखसुद्धा पोहोचले नसल्याचा आरोप गटनेते रणजित देसाई यांनी करीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला.

ठळक मुद्देकृषी समिती सभा : पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा निषेधरणजित देसाई यांचा आरोप, सिंधुदुर्गला कोणी वाली नसल्याची टीका

सिंधुदुर्ग : निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईपोटी सिंधुदुर्गाला मिळालेल्या २५ कोटींपैकी नुकसानग्रस्तांपर्यंत २५ लाखसुद्धा पोहोचले नसल्याचा आरोप गटनेते रणजित देसाई यांनी करीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला.

उदय सामंत हे रत्नागिरीचे असल्यामुळे व रायगड जिल्ह्यात तटकरे असल्यामुळे तेथे भरघोस निधी मिळतो. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्याला वाली कोण? असा प्रश्न उपस्थित करीत पालकमंत्री उदय सामंत यांना लक्ष्य केले.जिल्हा परिषद कृषी समिती सभा आॅनलाईनद्वारे बुधवारी सकाळच्या सत्रात जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी समिती सचिव तथा कृषी विकास अधिकारी सुनील चव्हाण, सदस्य गटनेते रणजित देसाई, गणेश राणे, संजय देसाई, सुधीर नकाशे, महेंद्र चव्हाण, अमरसेन सावंत आदी उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला या महिन्यात निधन झालेले भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी, पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांचे आई-वडील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मधुसुदन बांदिवडेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ कोटींचे पॅकेज जाहीर केले. जुलै महिन्यात याची घोषणाही झाली. मात्र, यापैकी २५ लाखसुद्धा नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचले नसल्याचा आरोप देसाई यांनी केला. आपल्या जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे दोन आमदार, एक खासदार असूनही जिल्ह्याला वाली कोणीही नसल्याचा आरोपही देसाई यांनी केला. सुधीर नकाशे यांनीही आगपाखड केली....तर तुमची पळता भुई थोडी होईलशिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांना सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी वेळोवेळी घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सगळे विरूद्ध अमरसेन असे चित्र पहावयास मिळाले. जिल्हा रुग्णालयाच्या एका विषयावर गटनेते रणजित देसाई यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्हा रुग्णालयात सुविधा नाहीत. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर आहे. कित्येक दिवस चादरी बदलल्या जात नाहीत. स्वच्छता नाही. यापेक्षाही भयाण परिस्थिती आहे. सगळेच बोलायला गेलो तर तुमची पळता भुई थोडी होईल अशा शब्दांत सदस्य सावंत यांना इशारा दिला.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतsindhudurgसिंधुदुर्ग