शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

कृषी समिती सभा : पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 15:44 IST

निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईपोटी सिंधुदुर्गाला मिळालेल्या २५ कोटींपैकी नुकसानग्रस्तांपर्यंत २५ लाखसुद्धा पोहोचले नसल्याचा आरोप गटनेते रणजित देसाई यांनी करीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला.

ठळक मुद्देकृषी समिती सभा : पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा निषेधरणजित देसाई यांचा आरोप, सिंधुदुर्गला कोणी वाली नसल्याची टीका

सिंधुदुर्ग : निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईपोटी सिंधुदुर्गाला मिळालेल्या २५ कोटींपैकी नुकसानग्रस्तांपर्यंत २५ लाखसुद्धा पोहोचले नसल्याचा आरोप गटनेते रणजित देसाई यांनी करीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला.

उदय सामंत हे रत्नागिरीचे असल्यामुळे व रायगड जिल्ह्यात तटकरे असल्यामुळे तेथे भरघोस निधी मिळतो. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्याला वाली कोण? असा प्रश्न उपस्थित करीत पालकमंत्री उदय सामंत यांना लक्ष्य केले.जिल्हा परिषद कृषी समिती सभा आॅनलाईनद्वारे बुधवारी सकाळच्या सत्रात जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती राजेंद्र म्हापसेकर यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी समिती सचिव तथा कृषी विकास अधिकारी सुनील चव्हाण, सदस्य गटनेते रणजित देसाई, गणेश राणे, संजय देसाई, सुधीर नकाशे, महेंद्र चव्हाण, अमरसेन सावंत आदी उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला या महिन्यात निधन झालेले भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी, पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांचे आई-वडील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मधुसुदन बांदिवडेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ कोटींचे पॅकेज जाहीर केले. जुलै महिन्यात याची घोषणाही झाली. मात्र, यापैकी २५ लाखसुद्धा नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचले नसल्याचा आरोप देसाई यांनी केला. आपल्या जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे दोन आमदार, एक खासदार असूनही जिल्ह्याला वाली कोणीही नसल्याचा आरोपही देसाई यांनी केला. सुधीर नकाशे यांनीही आगपाखड केली....तर तुमची पळता भुई थोडी होईलशिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांना सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी वेळोवेळी घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सगळे विरूद्ध अमरसेन असे चित्र पहावयास मिळाले. जिल्हा रुग्णालयाच्या एका विषयावर गटनेते रणजित देसाई यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्हा रुग्णालयात सुविधा नाहीत. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर आहे. कित्येक दिवस चादरी बदलल्या जात नाहीत. स्वच्छता नाही. यापेक्षाही भयाण परिस्थिती आहे. सगळेच बोलायला गेलो तर तुमची पळता भुई थोडी होईल अशा शब्दांत सदस्य सावंत यांना इशारा दिला.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतsindhudurgसिंधुदुर्ग