शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

आमदाराकडून ठेकेदारीच्या पैशातून अगरबत्ती, खडीसाखर : निलेश राणे यांची टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 17:35 IST

आमदार नाईक यांचा भाऊ रस्त्यांचे ठेके घेतो आणि त्याच ठेकेदारीच्या पैशातून आमदाराकडून जनतेला अगरबत्ती, खडीसाखर दिली जाते, अशी टिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी केली.

ठळक मुद्देआमदाराकडून ठेकेदारीच्या पैशातून अगरबत्ती, खडीसाखर : निलेश राणे यांची टिका आडारी-निवे पर्यायी रस्त्याचा शुभारंभ

मालवण : कोळंब पूल धोकादायक स्थितीत असताना आमदार वैभव नाईक यांनी पयार्यी रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. गेल्या चार वर्षात कुडाळ-मालवण मतदारसंघाची बिकट अवस्था करून ठेवली असून जनतेला केवळ शब्द देणे हाच सत्ताधारी विकास समजत आहेत.

आमदार नाईक यांचा भाऊ रस्त्यांचे ठेके घेतो आणि त्याच ठेकेदारीच्या पैशातून आमदाराकडून जनतेला अगरबत्ती, खडीसाखर दिली जाते, अशी टिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी केली.कोळंब पूल संघर्ष समितीच्या मागणीनुसार स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी आडारी-निवे या पयार्यी मागार्साठी २५ लाखाचा निधी मंजूर केला. या रस्ता कामाचा शुभारंभ माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आडारी ढोलमवाडी येथे करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक तालुकाध्यक्ष मंदार केणी तर कृष्णानाथ तांडेल यांनी विचार मांडले. यावेळी राणे यांनी कोळंब पूल संघर्ष समितीचे कौतुक केले.यावेळी स्वाभिमानाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, कृष्णनाथ तांडेल, सभापती सोनाली कोदे, बाबा परब, नगरसेवक यतीन खोत, कोळंब सरपंच प्रतिमा भोजने, सन्नी कुडाळकर, राऊळ, सजेर्कोट सरपंच सौ. परुळेकर, विजय नेमळेकर, गोपीनाथ तांडेल, संदीप भोजने, मंदार लुडबे, सुर्यकांत फणसेकर, निखिल नेमळेकर, रामदास ढोलम, बबन मलये, हरिश्चंद्र ढोलम, हनुमंत ढोलम, मनोहर करंगुटकर, विशाल ढोलम, अनिल मलये, अरुण ढोलम, आत्माराम ढोलम यांच्यासह ग्रामस्थ व स्वाभिमान पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.निलेश राणे म्हणाले, आमदार नाईक यांच्यात पयार्यी मागार्ला निधी देण्याची क्षमता नसल्याने संघर्ष समितीला खासदार नारायण राणे यांनी २५ लाखाचा निधी मंजूर करून दिला. आमदार, खासदार यांनी सत्ताकाळात केलेली पाच विकासकामे जाहीर करावी. खासदार राणे आमदार असते तर कोळंब पुलाचे काम केव्हाच मार्गी लागले असते. }

खासदार विनायक राऊताना जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी वेळही नाही. खडी, डांबर हाच नाईकांचा व्यवसाय असून शासकीय रस्त्यांची कामे त्यांचा भाऊ करोडो रुपये कमावतो आणि त्याच पैशातून जनतेला अगरबत्ती, खडीसाखर वाटली जाते. जनतेला अपेक्षित असलेली विकासकामे होत नसल्याने सत्ताधा?्यांना जनता शिव्या घालू लागली आहे, असा टोला राणे यांनी लगावला.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग