शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

आमदाराकडून ठेकेदारीच्या पैशातून अगरबत्ती, खडीसाखर : निलेश राणे यांची टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 17:35 IST

आमदार नाईक यांचा भाऊ रस्त्यांचे ठेके घेतो आणि त्याच ठेकेदारीच्या पैशातून आमदाराकडून जनतेला अगरबत्ती, खडीसाखर दिली जाते, अशी टिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी केली.

ठळक मुद्देआमदाराकडून ठेकेदारीच्या पैशातून अगरबत्ती, खडीसाखर : निलेश राणे यांची टिका आडारी-निवे पर्यायी रस्त्याचा शुभारंभ

मालवण : कोळंब पूल धोकादायक स्थितीत असताना आमदार वैभव नाईक यांनी पयार्यी रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. गेल्या चार वर्षात कुडाळ-मालवण मतदारसंघाची बिकट अवस्था करून ठेवली असून जनतेला केवळ शब्द देणे हाच सत्ताधारी विकास समजत आहेत.

आमदार नाईक यांचा भाऊ रस्त्यांचे ठेके घेतो आणि त्याच ठेकेदारीच्या पैशातून आमदाराकडून जनतेला अगरबत्ती, खडीसाखर दिली जाते, अशी टिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी केली.कोळंब पूल संघर्ष समितीच्या मागणीनुसार स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी आडारी-निवे या पयार्यी मागार्साठी २५ लाखाचा निधी मंजूर केला. या रस्ता कामाचा शुभारंभ माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आडारी ढोलमवाडी येथे करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक तालुकाध्यक्ष मंदार केणी तर कृष्णानाथ तांडेल यांनी विचार मांडले. यावेळी राणे यांनी कोळंब पूल संघर्ष समितीचे कौतुक केले.यावेळी स्वाभिमानाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, कृष्णनाथ तांडेल, सभापती सोनाली कोदे, बाबा परब, नगरसेवक यतीन खोत, कोळंब सरपंच प्रतिमा भोजने, सन्नी कुडाळकर, राऊळ, सजेर्कोट सरपंच सौ. परुळेकर, विजय नेमळेकर, गोपीनाथ तांडेल, संदीप भोजने, मंदार लुडबे, सुर्यकांत फणसेकर, निखिल नेमळेकर, रामदास ढोलम, बबन मलये, हरिश्चंद्र ढोलम, हनुमंत ढोलम, मनोहर करंगुटकर, विशाल ढोलम, अनिल मलये, अरुण ढोलम, आत्माराम ढोलम यांच्यासह ग्रामस्थ व स्वाभिमान पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.निलेश राणे म्हणाले, आमदार नाईक यांच्यात पयार्यी मागार्ला निधी देण्याची क्षमता नसल्याने संघर्ष समितीला खासदार नारायण राणे यांनी २५ लाखाचा निधी मंजूर करून दिला. आमदार, खासदार यांनी सत्ताकाळात केलेली पाच विकासकामे जाहीर करावी. खासदार राणे आमदार असते तर कोळंब पुलाचे काम केव्हाच मार्गी लागले असते. }

खासदार विनायक राऊताना जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी वेळही नाही. खडी, डांबर हाच नाईकांचा व्यवसाय असून शासकीय रस्त्यांची कामे त्यांचा भाऊ करोडो रुपये कमावतो आणि त्याच पैशातून जनतेला अगरबत्ती, खडीसाखर वाटली जाते. जनतेला अपेक्षित असलेली विकासकामे होत नसल्याने सत्ताधा?्यांना जनता शिव्या घालू लागली आहे, असा टोला राणे यांनी लगावला.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग