शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

भरपावसात आदित्य ठाकरेंचं भाषण, महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचे केले आरोप, भाजपाला दिलं ओपन चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 14:47 IST

मालवण येथे आज महाविकास आघाडीने मोर्चाचे आयोजन केले होते, यावेळी ठाकरे समर्थ आणि राणे समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काही दिवसापूर्वी कोसळला. या प्रकरणी आज महाविकास आघाडीने मालवण येथे मोर्चा काढला आहे. यावेळी ठाकरे गट आणि राण समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले, यावेळी दोन्ही गट आक्रमक झाले होते, तसेच दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, दोन तासांनंतर किल्ल्यावरुन आदित्य ठाकरे बाहेर पडले. यानंतर त्यांनी मोर्चास्थळी भरपावसात भाषण केले. यावेळी त्यांनी भाजपासह महायुती सरकार टीका केली. 

"आधी त्यांना समजवा"... मालवण किल्ल्यावर जयंत पाटलांचा मध्यस्थीचा प्रयत्न, राणे - ठाकरे समर्थक मागे हटेनात!

मोर्चावेळी मालवणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसातच आमदार आदित्य ठाकरे यांनी भाषणाला सुरूवात केली. " आपल्या मोर्चामध्ये काही चिंधीचोर आले,मी त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही. आज बालिशपणा होत होता. हा भाजपचा भ्रष्टाचार आहे. इकडचे स्थानिक खासदार कसे जिंकूण आले आहेत आपल्याला माहिती आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी खासदार नारायण राणे यांना लगावला. या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असेल तर आपण तिथं गेलं पाहिजे. आपण या मातीतील लोक आहोत. ही परिस्थिती देशात आहे. दहा वर्षात भाजपाने जी काम केली आहेत, त्या कामाला गळती लागली आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. 

"देशात कोणताही एक भाग सोडलेला नाही जिथे भाजपाने भ्रष्टाचार केलेला नाही. मुंबईची मेट्रो असो, मुंबई महापालिकेतील घोटाळे असो. अयोध्येमधील राम मंदिरातही गळती लागली आहे. या कामाची जगभराच जाहीरात केली. नवीन संसद भवनातही पाणी गळत आहे. दिल्ली विमानतळाचे छतही पडले, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

"मालवण येथील या पुतळ्याचे कॉन्ट्रक्ट भाजपाने मिंधे सरकारने कोणाला दिले होते.हे जगासमोर आलं पाहिजे. कोण होते हे आपटे? कोणताही अनुभव नसताना तुम्ही हे काम कसं दिलं. अमेरिकेतली एक पुतळा समुद्र किनारी १३८ वर्षे टीकला आहे. पण आपला हा पुतळा ८ महिन्यात कसा कोसळला? हे आपटे कोण आहेत कुठे आहेत हे आम्हाला कळालं पाहिजे. तो आपटे कुणाचा तरी मित्र आहे म्हणून त्यांना काम मिळालं. याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही चार वर्षापूर्वी संभाजीनगर येथील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ हे नाव दिलं आहे, पण मोदी सरकारने अजूनही या नावाला मान्यता दिलेली नाही. यांचा महाराष्ट्रातील या नावांचा विरोध का आहे? यांचा महाराष्ट्रद्वेष का आहे?, असा आरोपही ठाकरे यांनी केला. समोरुन अनेक अफजल येतील, ईडी, सीबीआय आणतील पण आम्ही झुकणार नाही हे सांगा, आम्ही लढायला तयार आहे, असं सांगत आदित्य ठाकरे यांनी चॅलेंज दिलं. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा