शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

भरपावसात आदित्य ठाकरेंचं भाषण, महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचे केले आरोप, भाजपाला दिलं ओपन चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 14:47 IST

मालवण येथे आज महाविकास आघाडीने मोर्चाचे आयोजन केले होते, यावेळी ठाकरे समर्थ आणि राणे समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काही दिवसापूर्वी कोसळला. या प्रकरणी आज महाविकास आघाडीने मालवण येथे मोर्चा काढला आहे. यावेळी ठाकरे गट आणि राण समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले, यावेळी दोन्ही गट आक्रमक झाले होते, तसेच दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, दोन तासांनंतर किल्ल्यावरुन आदित्य ठाकरे बाहेर पडले. यानंतर त्यांनी मोर्चास्थळी भरपावसात भाषण केले. यावेळी त्यांनी भाजपासह महायुती सरकार टीका केली. 

"आधी त्यांना समजवा"... मालवण किल्ल्यावर जयंत पाटलांचा मध्यस्थीचा प्रयत्न, राणे - ठाकरे समर्थक मागे हटेनात!

मोर्चावेळी मालवणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसातच आमदार आदित्य ठाकरे यांनी भाषणाला सुरूवात केली. " आपल्या मोर्चामध्ये काही चिंधीचोर आले,मी त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही. आज बालिशपणा होत होता. हा भाजपचा भ्रष्टाचार आहे. इकडचे स्थानिक खासदार कसे जिंकूण आले आहेत आपल्याला माहिती आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी खासदार नारायण राणे यांना लगावला. या ठिकाणी भ्रष्टाचार झाला असेल तर आपण तिथं गेलं पाहिजे. आपण या मातीतील लोक आहोत. ही परिस्थिती देशात आहे. दहा वर्षात भाजपाने जी काम केली आहेत, त्या कामाला गळती लागली आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. 

"देशात कोणताही एक भाग सोडलेला नाही जिथे भाजपाने भ्रष्टाचार केलेला नाही. मुंबईची मेट्रो असो, मुंबई महापालिकेतील घोटाळे असो. अयोध्येमधील राम मंदिरातही गळती लागली आहे. या कामाची जगभराच जाहीरात केली. नवीन संसद भवनातही पाणी गळत आहे. दिल्ली विमानतळाचे छतही पडले, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

"मालवण येथील या पुतळ्याचे कॉन्ट्रक्ट भाजपाने मिंधे सरकारने कोणाला दिले होते.हे जगासमोर आलं पाहिजे. कोण होते हे आपटे? कोणताही अनुभव नसताना तुम्ही हे काम कसं दिलं. अमेरिकेतली एक पुतळा समुद्र किनारी १३८ वर्षे टीकला आहे. पण आपला हा पुतळा ८ महिन्यात कसा कोसळला? हे आपटे कोण आहेत कुठे आहेत हे आम्हाला कळालं पाहिजे. तो आपटे कुणाचा तरी मित्र आहे म्हणून त्यांना काम मिळालं. याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे, असंही ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही चार वर्षापूर्वी संभाजीनगर येथील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ हे नाव दिलं आहे, पण मोदी सरकारने अजूनही या नावाला मान्यता दिलेली नाही. यांचा महाराष्ट्रातील या नावांचा विरोध का आहे? यांचा महाराष्ट्रद्वेष का आहे?, असा आरोपही ठाकरे यांनी केला. समोरुन अनेक अफजल येतील, ईडी, सीबीआय आणतील पण आम्ही झुकणार नाही हे सांगा, आम्ही लढायला तयार आहे, असं सांगत आदित्य ठाकरे यांनी चॅलेंज दिलं. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा