शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

Aditya Thackeray: 'ते निर्लज्ज 'गद्दार'च; जे घरातल्यांचे झाले नाहीत ते महाराष्ट्राचे काय होणार?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 14:25 IST

आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. गद्दार, निर्लज्ज, विश्वासघातकी असे शब्द वापरत आदित्य यांनी बंडखोर आमदारांवर तोफ डागली.

सिंधुदुर्ग - शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडाळीनंतर शिवसेना कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी युवानेते आदित्य ठाकरेंनी निष्ठा यात्रा सुरू केली आहे. या माध्यमातून ते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पैठण, शिर्डी अशी यात्रा केल्यानंतर आदित्य ठाकरे आज कोकणात दाखल झाले आहेत. कुडाळ येथून त्यांनी बंडखोर आमदारावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. यावेळी, त्यांनी बंडखोर गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांच्यावरही नाव न घेता टिका केली. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह इतरही 40 आमदारांना पुन्हा एकदा बंडखोराची उपमा दिली.  

आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. गद्दार, निर्लज्ज, विश्वासघातकी असे शब्द वापरत आदित्य यांनी बंडखोर आमदारांवर तोफ डागली. आमच्या पाठिंत खंजीर खुपसण्याचं काम यांनी केल्याचंही ते म्हणाले. ''डिसेंबर महिन्यात कोविडचा काळ वाढत होता, त्यावेळी उद्धव ठाकरे हॉस्पीटलमधून संवाद साधत होते, व्हॉट्सअपद्वारे संपर्कात होते. शिवसेना जिल्हा प्रमुखांशी, शासन-प्रशासन, जिल्हाधिकारी, एसपी यांच्याशी ते कोविडमधून लोकांना कसं वाचवायचं यासंदर्भातच बोलत होते. मंत्रीमंडळाच्या बैठकाही व्हीसीमधून घेत होते. एकीकडे हे सगळं सुरू असताना, दुसरीकडे गद्दारांचे नेते पक्ष फोडायला सुरुवात करत होते. आमदारांना विचारत होते, माझ्यासोबत येतो का, माझ्यासोबत येतो का...'' अशी टिका आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता केली. 

तसेच, आज बोलायची वेळ आली म्हणून बोलत आहे, आम्हाला वाटायचं ही 40 लोकं आपलीच आहेत. आम्हाला परिवार म्हणून सांभाळून घेतील. आपल्यासोबतच राहतील, पण याच गद्दारांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. केवळ आमच्याच नाही तर माणूसकीच्या पाठीत खंजीर खुपसला. अहो, हे गद्दार स्वत:च्या घरातल्यांचे झाले नाहीत, परिवाराचे नाहीत झाले, कुटुंबांचे नाहीत झाले, ते महाराष्ट्राचे काय होणार? अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह बंडखोर 40 आमदारांवर टिका केली. 

राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावा

आदित्य ठाकरें म्हणाले, बंड आणि उठाव करायला हिंमत लागते. ती हिंमत या गद्दारांमध्ये नाही. हिंमत असती तर या गद्दारांनी इथं राहून बंड केले असते. त्यासाठी सुरत, गुवाहाटीकडे जायची गरज नव्हती. महाराष्ट्राची वृत्ती असी नाही असे खडसावत राजीनामा देवून निवडणुकीला सामोरे या असे थेट आव्हानच त्यांनी यावेळी बंडखोर आमदारांना दिले.

ही गद्दारी माणुसकीसोबत

बंडखोरांनी केलेली गद्दारी ही फक्त शिवसेना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत नसून ही गद्दारी माणुसकीसोबत असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. या बंडखोर नेत्यांवर विश्वास ठेवून त्यांना सर्वकाही दिले. पण त्यांनी गद्दारी केली. इतक घाणेरडे राजकारण मी कधीही पाहिले नाही. महाराष्ट्राची ही संस्कृती नव्हती की पक्ष फोडा, गद्दारी करा. ज्या माणसाने घडवले, ओळख दिली त्याच माणसाच्या पाठित या बंडखोरांनी खंचीर खुपसला. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे