शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Aditya Thackeray: 'ते निर्लज्ज 'गद्दार'च; जे घरातल्यांचे झाले नाहीत ते महाराष्ट्राचे काय होणार?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 14:25 IST

आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. गद्दार, निर्लज्ज, विश्वासघातकी असे शब्द वापरत आदित्य यांनी बंडखोर आमदारांवर तोफ डागली.

सिंधुदुर्ग - शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडाळीनंतर शिवसेना कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी युवानेते आदित्य ठाकरेंनी निष्ठा यात्रा सुरू केली आहे. या माध्यमातून ते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पैठण, शिर्डी अशी यात्रा केल्यानंतर आदित्य ठाकरे आज कोकणात दाखल झाले आहेत. कुडाळ येथून त्यांनी बंडखोर आमदारावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. यावेळी, त्यांनी बंडखोर गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांच्यावरही नाव न घेता टिका केली. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह इतरही 40 आमदारांना पुन्हा एकदा बंडखोराची उपमा दिली.  

आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला. गद्दार, निर्लज्ज, विश्वासघातकी असे शब्द वापरत आदित्य यांनी बंडखोर आमदारांवर तोफ डागली. आमच्या पाठिंत खंजीर खुपसण्याचं काम यांनी केल्याचंही ते म्हणाले. ''डिसेंबर महिन्यात कोविडचा काळ वाढत होता, त्यावेळी उद्धव ठाकरे हॉस्पीटलमधून संवाद साधत होते, व्हॉट्सअपद्वारे संपर्कात होते. शिवसेना जिल्हा प्रमुखांशी, शासन-प्रशासन, जिल्हाधिकारी, एसपी यांच्याशी ते कोविडमधून लोकांना कसं वाचवायचं यासंदर्भातच बोलत होते. मंत्रीमंडळाच्या बैठकाही व्हीसीमधून घेत होते. एकीकडे हे सगळं सुरू असताना, दुसरीकडे गद्दारांचे नेते पक्ष फोडायला सुरुवात करत होते. आमदारांना विचारत होते, माझ्यासोबत येतो का, माझ्यासोबत येतो का...'' अशी टिका आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता केली. 

तसेच, आज बोलायची वेळ आली म्हणून बोलत आहे, आम्हाला वाटायचं ही 40 लोकं आपलीच आहेत. आम्हाला परिवार म्हणून सांभाळून घेतील. आपल्यासोबतच राहतील, पण याच गद्दारांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. केवळ आमच्याच नाही तर माणूसकीच्या पाठीत खंजीर खुपसला. अहो, हे गद्दार स्वत:च्या घरातल्यांचे झाले नाहीत, परिवाराचे नाहीत झाले, कुटुंबांचे नाहीत झाले, ते महाराष्ट्राचे काय होणार? अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह बंडखोर 40 आमदारांवर टिका केली. 

राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावा

आदित्य ठाकरें म्हणाले, बंड आणि उठाव करायला हिंमत लागते. ती हिंमत या गद्दारांमध्ये नाही. हिंमत असती तर या गद्दारांनी इथं राहून बंड केले असते. त्यासाठी सुरत, गुवाहाटीकडे जायची गरज नव्हती. महाराष्ट्राची वृत्ती असी नाही असे खडसावत राजीनामा देवून निवडणुकीला सामोरे या असे थेट आव्हानच त्यांनी यावेळी बंडखोर आमदारांना दिले.

ही गद्दारी माणुसकीसोबत

बंडखोरांनी केलेली गद्दारी ही फक्त शिवसेना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत नसून ही गद्दारी माणुसकीसोबत असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले. या बंडखोर नेत्यांवर विश्वास ठेवून त्यांना सर्वकाही दिले. पण त्यांनी गद्दारी केली. इतक घाणेरडे राजकारण मी कधीही पाहिले नाही. महाराष्ट्राची ही संस्कृती नव्हती की पक्ष फोडा, गद्दारी करा. ज्या माणसाने घडवले, ओळख दिली त्याच माणसाच्या पाठित या बंडखोरांनी खंचीर खुपसला. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे