शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

vidhan sabha-कार्यकर्त्यांनी पकडले नेत्यांचे कान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 10:45 IST

मागील चुका सुधारून आगामी निवडणुकीत जिद्दीने लढा, असे आवाहन यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांनी पकडले नेत्यांचे कानमागील चुका सुधारून जिद्दीने लढा : राजन भोसले यांचे कुडाळात मार्गदर्शन

कुडाळ : निवडणुका जवळ आल्या म्हणून केवळ मेळावे, बैठका न घेता पक्ष संघटनावाढीसाठी कार्यरत रहा. प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील मतदारांना सांभाळा, असा सल्ला जिल्हा काँग्रेसच्या सभेत कार्यकर्त्यांनी देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.  मागील चुका सुधारून आगामी निवडणुकीत जिद्दीने लढा, असे आवाहन यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा येथील महालक्ष्मी सभागृहात जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार पुष्पसेन सावंत, नवीनचंद्र बांदिवडेकर, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, राजू मसुरकर, दादा परब, प्रकाश जैतापकर, आबा मुंज, विद्याप्रसाद बांदेकर, मंदार शिरसाट, बाळा गावडे, बाळू अंधारी, विजय प्रभू, दिलीप नार्वेकर तसेच काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना पक्ष संघटनावाढीकडे नेते आणि पदाधिकाऱ्यांचा दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप केला. पक्षसंघटना वाढीकडे लक्ष द्या. जे गेले त्यांना जाऊ द्या, पण आहेत त्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येक कार्यकर्त्याचे मत जाणून घेऊन पक्षसंघटना वाढवा, अशा भावना व्यक्त केल्या.अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांनी जिल्ह्यात येणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांचे स्वागत करायला आम्ही हजारो रुपये खर्च करतो. मात्र, हे नेते नंतर दुसऱ्या पक्षात जातात. मग त्याचा उपयोग काय? असा सवाल उपस्थित केला. आता ईडीच्या भीतीने बहुतेक जण भाजपकडे प्रवेशासाठी धडपडत आहेत. मात्र, हा कायदा काँग्रेसच्याच काळात बनविलेला आहे. त्यामुळे काँग्रेसचे सरकार आल्यानंतर जे पक्ष सोडून गेले आहेत किंवा आताच्या भाजप नेत्यांना नक्कीच ईडीचे चटके नक्कीच बसतील, असा इशाराही त्यांनी दिला.पुष्पसेन सावंत यांनी खासदार विनायक राऊत हे मालवणमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप्पा पराडकरसारख्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घेऊन फिरत असल्याचा आरोप केला. आता हा दहशतवाद गृहमंत्र्यांना दिसत नाही का? असा टोलाही त्यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना लगावला.काँग्रेसचे स्पिरीट सांगू नये : विकास सावंतजिल्हाध्यक्ष विकास सावंत म्हणाले, काँग्रेससाठी मी नेहमीच कार्यरत आहे. मला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधानसभेची आॅफर दिली होती. मात्र, मी कधीही पक्ष सोडून गेलो नाही. त्यामुळे काँग्रेसचे स्पिरीट मला कोणी सांगू नये. काँग्रेस हा बुडणारा पक्ष अशी टीका करणारे सुधीर सावंतही पक्षात येत आहेत. वरिष्ठ नेते योग्य उमेदवार देतील आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आपली सर्वांची असेल, असेही त्यांनी सांगितले.काँग्रेसकडे कार्यालय नसल्याची शोकांतिकाआतापर्यंत काँग्रेसचे अनेक मंत्री येऊन गेले. मात्र, या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात काँग्रेसचे एकही कार्यालय नाही किंवा जिल्ह्यात काँग्रेसकडे पाच इंचाही जागाही नाही. ही काँग्रेसची शोकांतिका असल्याची खंत आबा मुंज यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांची पक्षनिष्ठा कायम आहे, पण नेत्यांनीच पक्षांतराचा सपाटा चालविल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :kudal-acकुडालsindhudurgसिंधुदुर्गvidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेस