शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दोषी कर्मचाऱ्यांवर सखोल चौकशीअंती कारवाई करणार -समीर नलावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 16:27 IST

Kankavli, muncipaltyCarporation, sindhudurgnews शहरातील नेते व नगरसेवक यांनी जो हलगर्जीपणाचा आरोप केला त्याची नगरपंचायतीचे सत्ताधारी म्हणून आम्ही गांभीर्याने दखल घेतली आहे. असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देकणकवलीतील आग प्रकरणदोषी कर्मचाऱ्यांवर सखोल चौकशीअंती कारवाई करणार -समीर नलावडे

कणकवली : कणकवली शहरातील बाणे किराणा दुकानाला रविवारी आग लागली . त्यावेळी अग्निशामक बंब पाण्याशिवाय घटनास्थळी नेणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर सखोल चौकशी करून निश्चितच कारवाई करण्यात येणार आहे . याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही . याप्रकरणी शहरातील नेते व नगरसेवक यांनी जो हलगर्जीपणाचा आरोप केला त्याची नगरपंचायतीचे सत्ताधारी म्हणून आम्ही गांभीर्याने दखल घेतली आहे. असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्पष्ट केले.येथील नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . यावेळी उपनगराध्यक्ष बंधू हर्णे , आरोग्य सभापती अभिजीत मुसळे , संदीप नलावडे , किशोर राणे, महेश सावंत, राजू गवाणकर आदी उपस्थित होते .समीर नलावडे म्हणाले , रविवारी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त आपण जिल्ह्याबाहेर होतो. आगी बाबत माहिती समजताच उपनगराध्यक्ष तसेच नगरसेवक व कर्मचाऱ्यांना सर्व सूचना दिल्या होत्या. दिलीप बिल्डकॉन या महामार्ग ठेकेदार कंपनीचा पाण्याचा टँकर घटनास्थळी मीच बोलावून घेतला होता .

टँकर यायला उशीर झाल्याने वाटेत टँकर थांबवून अग्निशामक बंबा मध्ये कर्मचाऱ्यांनी पाणी भरून घेतले . मात्र, या साऱ्या प्रकारात बंब घटनास्थळी पोहोचायला उशीर झाल्यामुळे दुकानदार बाणे यांचे अधिक नुकसान झाले. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो . मात्र, त्यानंतर नगरपंचायत बंबामुळेच संबधित आग आटोक्यात आणण्यात आली .या घटनेवेळी कणकवलीतील नागरिक, नगरसेवक यांनी स्वयंस्फूर्तीने जी मदत केली त्याबद्दल त्यांचे मी नगराध्यक्ष म्हणून आभार व्यक्त करतो . याप्रकरणी सबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत . तसेच यापुढे असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून अग्निशामक बंबाच्या व्यवस्थेकडे आपण व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे आणि नगरसेवक जातीनिशी लक्ष देणार आहोत .

या घटनेनंतर अग्निशमन बंबाच्या दैनंदिन कामकाजाची नोंदवही ठेवण्यात आली आहे . त्यामाध्यमातून नियमित डिझेल , पाणी व बंबाचा मेंटेनन्स चेक केला जाईल . त्यामुळे या घटनेत कुणीही विनाकारण राजकारण करू नये . असेही समीर नलावडे यावेळी म्हणाले.ती चूक अक्षम्य !नगरपंचायतीचा अग्निशामक बंब सुसज्ज असणे आवश्यक आहे. त्यामुळे कणकवलीत लागलेल्या आगीच्यावेळी बंबात पाणी नसणे ही कर्मचाऱ्यांची अक्षम्य चूक आहे. त्यांच्याकडून अजाणतेपणी ही चूक झाली आहे. त्याबाबत कारवाई होईलच. पण , याच कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत अनेकवेळा आग आटोक्यात आणून नागरिकांना दिलासा दिला आहे. हे विसरून चालणार नाही.

अग्निशामक बंबाच्या टाकीची क्षमता सहा हजार लिटर पाणी साठविण्याची आहे. त्या बंबाच्या टाकीला लिकेज असले तरी ते वरच्या बाजूला असून त्यामुळे पाच हजार लिटर पाणी बंबात भरले जाते. ते लिकेज काढण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती , उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :KankavliकणकवलीMuncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग