शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

डिंगणे-बांबरवाडीत भर दिवसा काजू बागेत गव्यांचा कळप, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 17:31 IST

काजू हंगाम सुरू झाल्याने शेतकरी सध्या काजू बी गोळा करण्यासाठी बागायतीत जात आहेत.

बांदा : डिंगणे-बांबरवाडी येथे भर दिवसा काजू बागेत गव्या रेड्यांचा कळप दृष्टीस पडल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी विलास मांजरेकर यांच्या काजू बागेत तब्बल १५ हुन अधिक गव्यांच्या कळपाचा वावर होता.काजू हंगाम सुरू झाल्याने शेतकरी सध्या काजू बी गोळा करण्यासाठी बागायतीत जात आहेत. आज नेहमीप्रमाणे मांजरेकर हे डिंगणे-बांबरवाडी येथील आपल्या काजू बागेत काजू बी गोळा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना तब्बल १५ हुन गव्यांच्या कळपाचा बिनधास्त वावर असल्याचे दिसून आले.त्यांनी प्रसंगावधान दाखवत गव्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र गव्यांची संख्या अधिक असल्याने त्यांनी बागायतीतून काढता पाय घेतला. भर दिवसा गव्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काजू हंगाम सुरुवात झाल्याने गव्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रकार देखील भविष्यात होऊ शकतात. यासाठी या गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.सायंकाळी उपसरपंच जयेश सावंत, बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांनी काजू बागायतीत जाऊन पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांना काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या.डिंगणे गावात जंगलमय भागात गव्यांची संख्या ही प्रचंड वाढली आहे. बांदा-डिंगणे रस्त्यावर देखील कित्येकदा भर दिवसा गव्यांचा कळप दृष्टीस पडला आहे. कित्येकवेळा हे गवे रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होतो. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे देखील जीवावर बेतणारे ठरू शकते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग