शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

मालवण, देवगड बंदरात ६०० खलाशांनी घेतला आसरा, वादळ शमत नाही तोपर्यंत बंदर सोडू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:37 IST

‘ओखी’ चक्रीवादळाचा परिणाम सिंधुदुर्ग किनारपट्टीवर जाणवला. समुद्र खवळलेला असल्याने केरळ, तामिळनाडूसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो नौकांनी मालवण व देवगड बंदरांचा आसरा घेतला असून ६०० खलाशी सुखरुप पोहोचले आहेत. शनिवारी दिवसभर किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण होते.

मालवण (जि. सिंधुदुर्ग) : ‘ओखी’ चक्रीवादळाचा परिणाम सिंधुदुर्ग किनारपट्टीवर जाणवला. समुद्र खवळलेला असल्याने केरळ, तामिळनाडूसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो नौकांनी मालवण व देवगड बंदरांचा आसरा घेतला असून ६०० खलाशी सुखरुप पोहोचले आहेत. शनिवारी दिवसभर किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण होते.बंदर विभागाने मच्छीमारांना समुद्रात जावू नये अशा सूचना केल्या आहेत. कुलाबा वेधशाळेने ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा दिला असून वादळ शमत नाही तोपर्यंत नौकांनी बंदर सोडू नये, अशा सूचना दिल्या आहेत.केरळ, तामिळनाडूला चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर आणि समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती जाणवू लागताच सिंधुदुर्गासह केरळ, तामिळनाडूच्या बोटींनी शुक्रवारी देवगड बंदराचा आसरा घेतला. शनिवारी वातावरण निवळल्याचे दिसताच या बोटींनी घरची वाट धरण्याचा निर्णय घेतला. परंतु अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि पोलीस तसेच वेधशाळेने दिलेल्या सूचनेमुळे या बोटी पुन्हा मालवण आणि देवगड बंदरात विसावल्या. देवगड बंदरात सुमारे १०० नौका दाखल झाल्या असून ६०० खलाशी सुखरुप पोहोचले आहेत. शनिवारी रात्री उशिरा पर्यंत मच्छीमारी नौका देवगड बंदरात दाखल होत होत्या.धोक्याचा बावटा लावणारसध्या समुद्रात ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले असून चार फूट उंचीच्या लाटा उसळतील, असे हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे धोक्याची सूचना म्हणून बंदरात दोन नंबरचा बावटा लावणार आहे.- सुषमा कुमठेकर,बंदर निरीक्षक

टॅग्स :fishermanमच्छीमार