शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मालवण, देवगड बंदरात ६०० खलाशांनी घेतला आसरा, वादळ शमत नाही तोपर्यंत बंदर सोडू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:37 IST

‘ओखी’ चक्रीवादळाचा परिणाम सिंधुदुर्ग किनारपट्टीवर जाणवला. समुद्र खवळलेला असल्याने केरळ, तामिळनाडूसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो नौकांनी मालवण व देवगड बंदरांचा आसरा घेतला असून ६०० खलाशी सुखरुप पोहोचले आहेत. शनिवारी दिवसभर किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण होते.

मालवण (जि. सिंधुदुर्ग) : ‘ओखी’ चक्रीवादळाचा परिणाम सिंधुदुर्ग किनारपट्टीवर जाणवला. समुद्र खवळलेला असल्याने केरळ, तामिळनाडूसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो नौकांनी मालवण व देवगड बंदरांचा आसरा घेतला असून ६०० खलाशी सुखरुप पोहोचले आहेत. शनिवारी दिवसभर किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण होते.बंदर विभागाने मच्छीमारांना समुद्रात जावू नये अशा सूचना केल्या आहेत. कुलाबा वेधशाळेने ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा दिला असून वादळ शमत नाही तोपर्यंत नौकांनी बंदर सोडू नये, अशा सूचना दिल्या आहेत.केरळ, तामिळनाडूला चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर आणि समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती जाणवू लागताच सिंधुदुर्गासह केरळ, तामिळनाडूच्या बोटींनी शुक्रवारी देवगड बंदराचा आसरा घेतला. शनिवारी वातावरण निवळल्याचे दिसताच या बोटींनी घरची वाट धरण्याचा निर्णय घेतला. परंतु अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि पोलीस तसेच वेधशाळेने दिलेल्या सूचनेमुळे या बोटी पुन्हा मालवण आणि देवगड बंदरात विसावल्या. देवगड बंदरात सुमारे १०० नौका दाखल झाल्या असून ६०० खलाशी सुखरुप पोहोचले आहेत. शनिवारी रात्री उशिरा पर्यंत मच्छीमारी नौका देवगड बंदरात दाखल होत होत्या.धोक्याचा बावटा लावणारसध्या समुद्रात ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले असून चार फूट उंचीच्या लाटा उसळतील, असे हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे धोक्याची सूचना म्हणून बंदरात दोन नंबरचा बावटा लावणार आहे.- सुषमा कुमठेकर,बंदर निरीक्षक

टॅग्स :fishermanमच्छीमार