शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

मालवण, देवगड बंदरात ६०० खलाशांनी घेतला आसरा, वादळ शमत नाही तोपर्यंत बंदर सोडू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:37 IST

‘ओखी’ चक्रीवादळाचा परिणाम सिंधुदुर्ग किनारपट्टीवर जाणवला. समुद्र खवळलेला असल्याने केरळ, तामिळनाडूसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो नौकांनी मालवण व देवगड बंदरांचा आसरा घेतला असून ६०० खलाशी सुखरुप पोहोचले आहेत. शनिवारी दिवसभर किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण होते.

मालवण (जि. सिंधुदुर्ग) : ‘ओखी’ चक्रीवादळाचा परिणाम सिंधुदुर्ग किनारपट्टीवर जाणवला. समुद्र खवळलेला असल्याने केरळ, तामिळनाडूसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो नौकांनी मालवण व देवगड बंदरांचा आसरा घेतला असून ६०० खलाशी सुखरुप पोहोचले आहेत. शनिवारी दिवसभर किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण होते.बंदर विभागाने मच्छीमारांना समुद्रात जावू नये अशा सूचना केल्या आहेत. कुलाबा वेधशाळेने ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा दिला असून वादळ शमत नाही तोपर्यंत नौकांनी बंदर सोडू नये, अशा सूचना दिल्या आहेत.केरळ, तामिळनाडूला चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर आणि समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती जाणवू लागताच सिंधुदुर्गासह केरळ, तामिळनाडूच्या बोटींनी शुक्रवारी देवगड बंदराचा आसरा घेतला. शनिवारी वातावरण निवळल्याचे दिसताच या बोटींनी घरची वाट धरण्याचा निर्णय घेतला. परंतु अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि पोलीस तसेच वेधशाळेने दिलेल्या सूचनेमुळे या बोटी पुन्हा मालवण आणि देवगड बंदरात विसावल्या. देवगड बंदरात सुमारे १०० नौका दाखल झाल्या असून ६०० खलाशी सुखरुप पोहोचले आहेत. शनिवारी रात्री उशिरा पर्यंत मच्छीमारी नौका देवगड बंदरात दाखल होत होत्या.धोक्याचा बावटा लावणारसध्या समुद्रात ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले असून चार फूट उंचीच्या लाटा उसळतील, असे हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे धोक्याची सूचना म्हणून बंदरात दोन नंबरचा बावटा लावणार आहे.- सुषमा कुमठेकर,बंदर निरीक्षक

टॅग्स :fishermanमच्छीमार