शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

३५ वर्षांपासूनचे स्वप्न सत्यात उतरले, आरोसबाग पुलाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 20:17 IST

pwd Banda Sindhudurg : आरोसबाग तेरेखोल नदीपात्रात नागरिकांची गेली ३५ वर्षे मागणी असलेल्या पुलाचे स्वप्न अखेर सत्यात उतरले. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्यामकांत काणेकर यांच्या हस्ते या पुलाचा अनौपचारिक शुभारंभ करण्यात आला. हा पूल पूर्ण व्हावा, यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर पूल पूर्ण झाल्याने येथील नागरिकांचा होडीचा जीवघेणा प्रवास यावर्षीपासून थांबला आहे.

ठळक मुद्दे३५ वर्षांपासूनचे स्वप्न सत्यात उतरले, आरोसबाग पुलाचे उद्घाटन होडीच्या जीवघेण्या प्रवासातून मुक्तता

बांदा : आरोसबाग तेरेखोल नदीपात्रात नागरिकांची गेली ३५ वर्षे मागणी असलेल्या पुलाचे स्वप्न अखेर सत्यात उतरले. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्यामकांत काणेकर यांच्या हस्ते या पुलाचा अनौपचारिक शुभारंभ करण्यात आला. हा पूल पूर्ण व्हावा, यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर पूल पूर्ण झाल्याने येथील नागरिकांचा होडीचा जीवघेणा प्रवास यावर्षीपासून थांबला आहे.

समस्त आरोसबागवासीय आबालवृध्दांनी फटाक्यांची आतषबाजी व मिठाई वाटत पूल स्वप्नपूर्तीचा आनंद साजरा केला.आरोसबागवासीयांनी पुलाच्या पूर्ततेसाठी कित्येक आंदोलने, उपोषणे केली. पुलाचे स्वप्न भाजपच पूर्ण करू शकते, असा ठाम विश्वास आरोसबागवासीयांना होता. हा विश्वास भाजपने सार्थ करुन दाखवताना पुलाचे स्वप्न सत्यात उतरवून दाखवले.शेर्ले गावची आरोसबाग वाडी पूर्णपणे बांदा शहरावर अवलंबून आहे. शिक्षण, आरोग्य, बाजार यासाठी येथील ग्रामस्थांना दररोज बांदा शहरात यावे लागते. त्यासाठी होडी हाच एकमेव पर्याय होता. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २३ मे १९९९ रोजी या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. या पुलाचा आराखडादेखील तयार करण्यात आला होता.

युती शासन गेल्यानंतर आघाडी शासनाच्या काळात या पुलाचा प्रश्न रखडला. आरोसबाग ग्रामस्थांनी पुलाच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू केला. पुलाच्या प्रत्यक्ष कामाला दोन वर्षांपूर्वी प्रारंभ करण्यात आला. आता काम पूर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान पसरले आहे.पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्णल्ल कोरोना संकटकाळात पुलाचे काम थांबले होते. मात्र, यावर्षी पुलाचे उर्वरित काम युद्धपातळीवर पावसाळ्याच्या तोंडावर पूर्ण करण्यात आले. या पुलाचे उद्घाटन भाजप प्रांतिक सदस्य श्यामकांत काणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.ल्ल जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, उपसभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, माजी सरपंच मंदार कल्याणकर, संजय चांदेकर आदींसह आरोसबागवाडीतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या अनेक दशकांपासून पावसाळ्यात होडीतून करायला लागणारा प्रवास आता वाचणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्गbanda-pcबांदा