शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

३५ वर्षांपासूनचे स्वप्न सत्यात उतरले, आरोसबाग पुलाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 20:17 IST

pwd Banda Sindhudurg : आरोसबाग तेरेखोल नदीपात्रात नागरिकांची गेली ३५ वर्षे मागणी असलेल्या पुलाचे स्वप्न अखेर सत्यात उतरले. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्यामकांत काणेकर यांच्या हस्ते या पुलाचा अनौपचारिक शुभारंभ करण्यात आला. हा पूल पूर्ण व्हावा, यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर पूल पूर्ण झाल्याने येथील नागरिकांचा होडीचा जीवघेणा प्रवास यावर्षीपासून थांबला आहे.

ठळक मुद्दे३५ वर्षांपासूनचे स्वप्न सत्यात उतरले, आरोसबाग पुलाचे उद्घाटन होडीच्या जीवघेण्या प्रवासातून मुक्तता

बांदा : आरोसबाग तेरेखोल नदीपात्रात नागरिकांची गेली ३५ वर्षे मागणी असलेल्या पुलाचे स्वप्न अखेर सत्यात उतरले. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्यामकांत काणेकर यांच्या हस्ते या पुलाचा अनौपचारिक शुभारंभ करण्यात आला. हा पूल पूर्ण व्हावा, यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर पूल पूर्ण झाल्याने येथील नागरिकांचा होडीचा जीवघेणा प्रवास यावर्षीपासून थांबला आहे.

समस्त आरोसबागवासीय आबालवृध्दांनी फटाक्यांची आतषबाजी व मिठाई वाटत पूल स्वप्नपूर्तीचा आनंद साजरा केला.आरोसबागवासीयांनी पुलाच्या पूर्ततेसाठी कित्येक आंदोलने, उपोषणे केली. पुलाचे स्वप्न भाजपच पूर्ण करू शकते, असा ठाम विश्वास आरोसबागवासीयांना होता. हा विश्वास भाजपने सार्थ करुन दाखवताना पुलाचे स्वप्न सत्यात उतरवून दाखवले.शेर्ले गावची आरोसबाग वाडी पूर्णपणे बांदा शहरावर अवलंबून आहे. शिक्षण, आरोग्य, बाजार यासाठी येथील ग्रामस्थांना दररोज बांदा शहरात यावे लागते. त्यासाठी होडी हाच एकमेव पर्याय होता. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २३ मे १९९९ रोजी या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. या पुलाचा आराखडादेखील तयार करण्यात आला होता.

युती शासन गेल्यानंतर आघाडी शासनाच्या काळात या पुलाचा प्रश्न रखडला. आरोसबाग ग्रामस्थांनी पुलाच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू केला. पुलाच्या प्रत्यक्ष कामाला दोन वर्षांपूर्वी प्रारंभ करण्यात आला. आता काम पूर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान पसरले आहे.पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्णल्ल कोरोना संकटकाळात पुलाचे काम थांबले होते. मात्र, यावर्षी पुलाचे उर्वरित काम युद्धपातळीवर पावसाळ्याच्या तोंडावर पूर्ण करण्यात आले. या पुलाचे उद्घाटन भाजप प्रांतिक सदस्य श्यामकांत काणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.ल्ल जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, उपसभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, माजी सरपंच मंदार कल्याणकर, संजय चांदेकर आदींसह आरोसबागवाडीतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या अनेक दशकांपासून पावसाळ्यात होडीतून करायला लागणारा प्रवास आता वाचणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्गbanda-pcबांदा