शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
4
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
5
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
6
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
7
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
8
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
9
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
10
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
11
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
12
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
13
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
14
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
15
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
16
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
17
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
18
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
19
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
20
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला

मिरकरवाड्यातील ३५ झोपड्या केल्या उदध्वस्त

By admin | Updated: December 2, 2014 23:33 IST

बेकायदा झोपड्या शासनाच्या सागरी अधिनियमन क्षेत्रात (सीआरझेड) असून तटरक्षक दलासाठी वापरात येणाऱ्या जागेत असल्याचा शासनाचा दावा आहे

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा व भगवतीबंदर यांच्यादरम्यान किल्ल्याच्या पायथ्याजवळच पठाणवाडी येथे असलेल्या सुमारे ३५ अनधिकृत झोपड्यांवर आज जिल्हा प्रशासनाने जे.सी.बी. फिरविला. या बेकायदा झोपड्या शासनाच्या सागरी अधिनियमन क्षेत्रात (सीआरझेड) असून तटरक्षक दलासाठी वापरात येणाऱ्या जागेत असल्याचा शासनाचा दावा आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात या झोपड्या आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तोडण्यात आल्या. या कारवाईसाठी बेकायदा या झोपडपट्टीधारकांना ४८ तासांची झोपड्या हटविण्याची नोटीस तहसीलदारांनी दिली होती. अनेक ठिकाणी नोटीस चिकटविण्यात आली होती. त्यानंतर आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जिल्हा प्रशासन व नगरपरिषद यांनी या झोपड्यांवर जेसीबी फिरवून झोपड्या उदध्वस्त केल्या. त्यावेळी झोपडीधारकांनी मोठी गर्दी केली होती. काही झोेपडीधारक संतप्त झाले होते. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक त्याठिकाणी बोलावण्यात आली होती. परिणामी पठाणवाडी झोपडपट्टी परिसराला पोलीस छावणीचे रुप आले होते. गेल्या काही वर्षात याठिकाणी असलेल्या झोपड्या वारंवार तोडण्यात आल्या होत्या. मात्र पुन्हा तेथे झोपड्या उभ्या राहिल्या. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून झोपड्या तोडणे व पुन्हा उभारल्या जाणे हा प्रकार येथे सर्रास सुरू आहे. त्यामुळे आज जरी या झोपड्या तोडण्यात आल्या असल्या तरी काही दिवसात पुन्हा त्या उभ्या राहतील, अशी चर्चा सुरू होती. या कारवाईच्यावेळी रत्नागिरीचे तहसीलदर मारुती कांबळे हे हजर होते. ज्यांच्या झोपड्या बेकायदा म्हणून तोडल्या गेल्या त्या झोपडीवासियांतून संतापजनक प्रतिक्रिया उमटत होत्या. झोपड्या हटविण्याआधी तीनवेळा नोटीस दिली जाते. येथे मात्र ४८ तासांची नोटीस देण्यात आली. हा कुठला कायदा आहे, असा सवाल हे झोपडीवासीय करीत होते. तसेच ही जागा पुळणीची असून सीआरझेडमध्ये आहे. त्यामुळे या जागेवर शासकीय बांधकाम कसे होऊ शकते, असा सवालही करण्यात येत होता. (प्रतिनिधी)जागेच्या सातबारावर बंदर खाते मालकभगवती बंदराशेजारी पुळणीने भरलेल्या या जागेचा सातबारा बंदर खात्याच्या नावावर आहे. त्यामुळे ही जागा महसूलची कशी, असा सवालही निर्माण झाला आहे. या जागेची मालकी असलेल्यांनाच या जागेच्या कब्जाचा अधिकार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे हा वाद चिघळणार का, असा सवाल निर्माण झाला आहे.