शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

मिरकरवाड्यातील ३५ झोपड्या केल्या उदध्वस्त

By admin | Updated: December 2, 2014 23:33 IST

बेकायदा झोपड्या शासनाच्या सागरी अधिनियमन क्षेत्रात (सीआरझेड) असून तटरक्षक दलासाठी वापरात येणाऱ्या जागेत असल्याचा शासनाचा दावा आहे

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा व भगवतीबंदर यांच्यादरम्यान किल्ल्याच्या पायथ्याजवळच पठाणवाडी येथे असलेल्या सुमारे ३५ अनधिकृत झोपड्यांवर आज जिल्हा प्रशासनाने जे.सी.बी. फिरविला. या बेकायदा झोपड्या शासनाच्या सागरी अधिनियमन क्षेत्रात (सीआरझेड) असून तटरक्षक दलासाठी वापरात येणाऱ्या जागेत असल्याचा शासनाचा दावा आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात या झोपड्या आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तोडण्यात आल्या. या कारवाईसाठी बेकायदा या झोपडपट्टीधारकांना ४८ तासांची झोपड्या हटविण्याची नोटीस तहसीलदारांनी दिली होती. अनेक ठिकाणी नोटीस चिकटविण्यात आली होती. त्यानंतर आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जिल्हा प्रशासन व नगरपरिषद यांनी या झोपड्यांवर जेसीबी फिरवून झोपड्या उदध्वस्त केल्या. त्यावेळी झोपडीधारकांनी मोठी गर्दी केली होती. काही झोेपडीधारक संतप्त झाले होते. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक त्याठिकाणी बोलावण्यात आली होती. परिणामी पठाणवाडी झोपडपट्टी परिसराला पोलीस छावणीचे रुप आले होते. गेल्या काही वर्षात याठिकाणी असलेल्या झोपड्या वारंवार तोडण्यात आल्या होत्या. मात्र पुन्हा तेथे झोपड्या उभ्या राहिल्या. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून झोपड्या तोडणे व पुन्हा उभारल्या जाणे हा प्रकार येथे सर्रास सुरू आहे. त्यामुळे आज जरी या झोपड्या तोडण्यात आल्या असल्या तरी काही दिवसात पुन्हा त्या उभ्या राहतील, अशी चर्चा सुरू होती. या कारवाईच्यावेळी रत्नागिरीचे तहसीलदर मारुती कांबळे हे हजर होते. ज्यांच्या झोपड्या बेकायदा म्हणून तोडल्या गेल्या त्या झोपडीवासियांतून संतापजनक प्रतिक्रिया उमटत होत्या. झोपड्या हटविण्याआधी तीनवेळा नोटीस दिली जाते. येथे मात्र ४८ तासांची नोटीस देण्यात आली. हा कुठला कायदा आहे, असा सवाल हे झोपडीवासीय करीत होते. तसेच ही जागा पुळणीची असून सीआरझेडमध्ये आहे. त्यामुळे या जागेवर शासकीय बांधकाम कसे होऊ शकते, असा सवालही करण्यात येत होता. (प्रतिनिधी)जागेच्या सातबारावर बंदर खाते मालकभगवती बंदराशेजारी पुळणीने भरलेल्या या जागेचा सातबारा बंदर खात्याच्या नावावर आहे. त्यामुळे ही जागा महसूलची कशी, असा सवालही निर्माण झाला आहे. या जागेची मालकी असलेल्यांनाच या जागेच्या कब्जाचा अधिकार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे हा वाद चिघळणार का, असा सवाल निर्माण झाला आहे.