शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच रेशन धान्य वाहतूक ठेकेदाराचे ३ कोटी थकीत, परशुराम उपरकर यांचा आरोप

By सुधीर राणे | Updated: June 24, 2024 15:51 IST

ऑनलाईल जमीन मोजणी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत जनतेची लूट 

कणकवली: लोकसभा निवडणूक आता झाल्यामुळे जनतेच्या प्रश्नांकडे सत्ताधारी मंडळी दुर्लक्ष करत आहेत. रेशन दुकानदारांकडे मोफत धान्यासाठी लोक जावून परत येत आहेत. कारण रेशन धान्य वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराचे सुमारे ३ कोटी रुपयांचे बिल शासनाकडे थकीत आहे. त्यामुळे रेशन दुकानावर धान्य उपलब्ध नाही. सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. कणकवली येथील संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते  बोलत होते. उपरकर म्हणाले, रेशन धान्य पुरवठादारांना गेल्या ३ महिन्यांपासून बिल मिळालेले नाही. याबाबत विचारणा केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी ते बिल वरिष्ठ स्तरावर पाठवले आहे असे सांगितले. तर जिल्हा पुरवठा अधिकारी आपली बदली करून घेण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांना जनतेच्या समस्यांकडे पहायला वेळ नाही.  महत्त्वाच्या पदावर असलेली व्यक्ती कार्यालयात उशीरा येत असेल तर त्याला जबाबदार कोण आहे ?

राज्य शासनाने मोफत धान्याची घोषणा केली. मात्र, सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अनेक मतदार हे मतांसाठी पैसे घेत असतात. त्यामुळे आता त्यांना धान्य मिळत नसले तरी राजकारण्यांना  बोलता येत नाही. त्यामुळे यापुढील काळात मतदारांनी मतांसाठी पैसे न घेता लोकशाही बळकट करावी. असे आवाहन उपरकर यांनी केले. भूमिअभिलेखकडे ऑनलाईन जमीन मोजणी अर्ज भरताना सर्व्हरडाऊन होणे, कागदपत्र फाईल उडून जाणे असे घडत आहे. भूमी अभिलेख विभागातील कारभार पारदर्शक  करण्यासाठी शासनाने  योजना आणली. मात्र, सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होत आहे. पूर्वी चाकरमानी गावी आले की, एका दिवसात जमीन मोजणी अर्ज भरण्याचे काम होत होते.आता तो अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी ऑनलाईन केंद्रांकडून १ ते २ हजार रुपये घेतले जात आहेत. याबाबत भूमी अभिलेख संचालक निकम यांची आम्ही भेट घेतली. तेव्हा त्यांनीही जनतेची होणारी अडचण मान्य केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची लूट थांबविण्यासाठी कंत्राटी कर्मचारी भूमिअभिलेख कार्यालयात बसवावा. किंवा सेतू सुविधा केंद्राकडे अर्ज भरण्याचे काम द्यावे. त्याचा दर निश्चित करावा अशी मागणी केल्याचे  उपरकर यांनी सांगितले. सावंतवाडी प्रांत कार्यालयात अनेक विद्यार्थी आणि नागरिकांचे दाखल्यांसाठीचे १२७अर्ज पेंडींग आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे. पालक, विद्यार्थी कार्यालयात जात आहेत, मात्र त्याठिकाणी आर्थिक मागणी करणारे एजंट तयार झाले आहेत. यासगळ्या प्रकाराची चर्चा सध्या सुरू आहे असेही उपरकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर