शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

२५ ठिकाणे आपत्तीप्रवण क्षेत्रात...

By admin | Updated: June 6, 2015 00:24 IST

चिपळूण तालुका : आवश्यक उपाय योजण्यावर भर देण्याचा प्रयत्न

अडरे : पावसाळा जवळ आल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून, चिपळूण तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. आपत्तीप्रवण क्षेत्रात चिपळूण शहरातील १५ ठिकाणे, तर ग्रामीण भागातील १० गावात पाणी भरण्याचा संभाव्य धोका असल्याने येथे आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार आहे. चिपळूण शहरातून वाशिष्ठी नदी व शीव नदी वाहाते. शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या नद्यामुळे अतिवृष्टीच्या काळात पूर आल्यास शंकरवाडी नलावडा बंधारा फुटून शंकरवाडी, मुरादपूर, चिंचनाका, भोगाळे या परिसरात पाणी भरते. याच वेळी शीव नदीला पूर आल्याने कापसाळ, कामथे धरणातून ओसंडून वाहणारे पाणी पागमळा भागातून शहरातील बाजारपेठ, भोगाळे भागात भरते. अतिवृष्टीमुळे शहराच्या दक्षिण दिशेला असलेल्या डोंगरावरुन मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. शिवाय वाशिष्ठी नदीला गोवळकोटपासून सुरु होणाऱ्या दाभोळ खाडीपात्रामध्ये भरती ओहोटीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठून राहाते. यामुळे शहरात पूरजन्य स्थिती निर्माण होते. ग्रामीण भागात स्थिती वेगळी आहे. येथील नद्या, नाले दुथडी भरु वाहतात. खेर्डी, मजरेकाशी, मिरजोळी, जुवाड, पेढे-फरशी, चिंचघरी-सतीपूल पिंपळी समर्थनगर, नवीन कोळकेवाडी, दळवटणे, डेरवण, कुटरे बाजारपेठ येथे पाणी भरते. त्यामुळे दळणवळण विस्कळीत होते. अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागते. शेतीची कामे खोळंबतात. या पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगर परिषद भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देते. पाण्याची पातळी वाढल्यास व शहरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास तालुक्यात धोका आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. शोध व बचाव गट तयार करण्यात आला आहे. पाण्यात अडकलेल्या गरजू नागरिकांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी नगर परिषदेतर्फे बोटींची व्यवस्था करण्यात येणार आहे. अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास सीआरपीएफ व एनडीआरएफची तुकडी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत बोलवण्यात येईल. विविध संकटांचा सामना करण्यासाठी प्रशासन आपल्या परीने सज्ज आहे. याबाबतचे प्रशिक्षण व बैठका पूर्ण झाल्या आहेत. उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार वृषाली पाटील, निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत, गटविकास अधिकारी प्रकाश भोसले व विविध खात्यांचे अधिकारी नियोजन करीत आहे. (वार्ताहर)