शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

स्वच्छता स्पर्धेत कोकणातील २५ शहरे सहभागी, स्वच्छ शहरांना राज्य सरकारकडून बक्षीस : सुधाकर जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 16:57 IST

केंद्र सरकारने आयोजित केलेल्या शहर स्वच्छता स्पर्धेत कोकणातील २५ शहरांनी सहभाग घेतला असून, यातील विजेत्यांचे केंद्र सरकार वर्गीकरण करणार आहे. तर राज्य सरकार या शहरांना खास बक्षीस देऊन गौरविणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी शासन त्यावर सकारात्मक असल्याचे विभागीय कोकण उपायुक्त सुधाकर जगताप यांनी सांगितले.

ठळक मुद्देस्वच्छता स्पर्धेत कोकणातील २५ शहरे सहभागी : विभागीय कोकण उपायुक्त सुधाकर जगताप सर्व नगरपालिकांचे स्वच्छतेत चांगले काम : जगताप सिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण, कणकवली शहरांत स्वच्छता अ‍ॅप

सावंतवाडी : केंद्र सरकारने आयोजित केलेल्या शहर स्वच्छता स्पर्धेत कोकणातील २५ शहरांनी सहभाग घेतला असून, यातील विजेत्यांचे केंद्र सरकार वर्गीकरण करणार आहे. तर राज्य सरकार या शहरांना खास बक्षीस देऊन गौरविणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी शासन त्यावर सकारात्मक असल्याचे विभागीय कोकण उपायुक्त सुधाकर जगताप यांनी सांगितले.

जगताप यांनी सावंतवाडी शहर स्वच्छतेबाबत गुरुवारी नगरसेवकांची खास बैठक येथील लोकमान्य टिळक सभागृहात घेतली. त्यानंतर ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे आदी उपस्थित होते.

यावेळी जगताप म्हणाले, केंद्र सरकारने महाराष्ट्राचा समावेश हा पश्चिम विभागात केला आहे. या विभागात महाराष्ट्राप्रमाणे गोवा व गुजरात तसेच केंद्रशासित प्रदेश आहेत.

या विभागात १०३१ शहरे असून त्यातील पहिल्या २० शहरांना केंद्र सरकार गौरविणार आहे. तर महाराष्ट्र सरकारही केंंद्र सरकारच्या वर्गीकरणाप्रमाणे एक विशेष बक्षीस देणार आहे. या बक्षिसांची रक्कम अद्याप ठरली नाही. बक्षीस देणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामध्ये कोकणातील २५ शहरांचा समावेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शहर स्वच्छतेसाठी एकूण ४ हजार गुणांची ही स्पर्धां असणार आहे. त्यातून वेगवेगळ्या कामांसाठी गुणांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. यात स्वच्छता अ‍ॅप तसेच स्वच्छतेबाबतची माहिती तसेच प्रत्यक्षात काम, नागरिकांमधील जनजागृती आदींचा समावेश करण्यात आला आहे.

४ जानेवारीपासून प्रत्यक्ष केंद्रीय समिती प्रत्येक शहरात जाऊन नागरिकांशी चर्चा करणार आहे. तसेच स्वच्छतेबाबतही माहिती घेणार आहे. त्यामुळे ही सर्व कामे लवकरात लवकर करणे गरजेची असल्याचे जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले.

सर्व नगरपालिकांचे स्वच्छतेत चांगले कामसिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण व कणकवली या चार शहरांनी भाग घेतला आहे. सर्व नगरपालिका आपल्यापरीने स्वच्छतेत चांगले काम करीत आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती सुरू आहे. सावंतवाडीतही मी स्वत: पालिका अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेतली. त्यानंतर गुरुवारी नगराध्यक्ष व नगरसेवकांसोबत चर्चा केली आहे. सर्वजण स्वच्छतेबाबत गंभीर आहेत.

नागरिकांमध्येही उत्साह निर्माण केला आहे. या सर्व मोहिमेत माहिती तयार करणे तसेच अ‍ॅप जास्तीतजास्त नागरिकांपर्यत पोहोचवणे हेच महत्त्वाचे असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानsindhudurgसिंधुदुर्ग