शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

स्वच्छता स्पर्धेत कोकणातील २५ शहरे सहभागी, स्वच्छ शहरांना राज्य सरकारकडून बक्षीस : सुधाकर जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 16:57 IST

केंद्र सरकारने आयोजित केलेल्या शहर स्वच्छता स्पर्धेत कोकणातील २५ शहरांनी सहभाग घेतला असून, यातील विजेत्यांचे केंद्र सरकार वर्गीकरण करणार आहे. तर राज्य सरकार या शहरांना खास बक्षीस देऊन गौरविणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी शासन त्यावर सकारात्मक असल्याचे विभागीय कोकण उपायुक्त सुधाकर जगताप यांनी सांगितले.

ठळक मुद्देस्वच्छता स्पर्धेत कोकणातील २५ शहरे सहभागी : विभागीय कोकण उपायुक्त सुधाकर जगताप सर्व नगरपालिकांचे स्वच्छतेत चांगले काम : जगताप सिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण, कणकवली शहरांत स्वच्छता अ‍ॅप

सावंतवाडी : केंद्र सरकारने आयोजित केलेल्या शहर स्वच्छता स्पर्धेत कोकणातील २५ शहरांनी सहभाग घेतला असून, यातील विजेत्यांचे केंद्र सरकार वर्गीकरण करणार आहे. तर राज्य सरकार या शहरांना खास बक्षीस देऊन गौरविणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी शासन त्यावर सकारात्मक असल्याचे विभागीय कोकण उपायुक्त सुधाकर जगताप यांनी सांगितले.

जगताप यांनी सावंतवाडी शहर स्वच्छतेबाबत गुरुवारी नगरसेवकांची खास बैठक येथील लोकमान्य टिळक सभागृहात घेतली. त्यानंतर ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे आदी उपस्थित होते.

यावेळी जगताप म्हणाले, केंद्र सरकारने महाराष्ट्राचा समावेश हा पश्चिम विभागात केला आहे. या विभागात महाराष्ट्राप्रमाणे गोवा व गुजरात तसेच केंद्रशासित प्रदेश आहेत.

या विभागात १०३१ शहरे असून त्यातील पहिल्या २० शहरांना केंद्र सरकार गौरविणार आहे. तर महाराष्ट्र सरकारही केंंद्र सरकारच्या वर्गीकरणाप्रमाणे एक विशेष बक्षीस देणार आहे. या बक्षिसांची रक्कम अद्याप ठरली नाही. बक्षीस देणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामध्ये कोकणातील २५ शहरांचा समावेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शहर स्वच्छतेसाठी एकूण ४ हजार गुणांची ही स्पर्धां असणार आहे. त्यातून वेगवेगळ्या कामांसाठी गुणांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. यात स्वच्छता अ‍ॅप तसेच स्वच्छतेबाबतची माहिती तसेच प्रत्यक्षात काम, नागरिकांमधील जनजागृती आदींचा समावेश करण्यात आला आहे.

४ जानेवारीपासून प्रत्यक्ष केंद्रीय समिती प्रत्येक शहरात जाऊन नागरिकांशी चर्चा करणार आहे. तसेच स्वच्छतेबाबतही माहिती घेणार आहे. त्यामुळे ही सर्व कामे लवकरात लवकर करणे गरजेची असल्याचे जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले.

सर्व नगरपालिकांचे स्वच्छतेत चांगले कामसिंधुदुर्गमध्ये वेंगुर्ले, सावंतवाडी, मालवण व कणकवली या चार शहरांनी भाग घेतला आहे. सर्व नगरपालिका आपल्यापरीने स्वच्छतेत चांगले काम करीत आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती सुरू आहे. सावंतवाडीतही मी स्वत: पालिका अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेतली. त्यानंतर गुरुवारी नगराध्यक्ष व नगरसेवकांसोबत चर्चा केली आहे. सर्वजण स्वच्छतेबाबत गंभीर आहेत.

नागरिकांमध्येही उत्साह निर्माण केला आहे. या सर्व मोहिमेत माहिती तयार करणे तसेच अ‍ॅप जास्तीतजास्त नागरिकांपर्यत पोहोचवणे हेच महत्त्वाचे असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानsindhudurgसिंधुदुर्ग