शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूस्खलन झालेल्या ‘त्या’ २० गावांवर प्रशासनाचा २४ तास वॉच

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 20, 2024 17:55 IST

उपाययोजनेसाठी ८ कोटींची मागणी

मनोज वारंगओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत भूस्खलन झालेल्या गावांवर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यात २० गावे अशी आहेत की ज्या ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता आहे. यात ४६८ कुटुंबे आणि १९७७ व्यक्ती बाधित आहेत. पावसाळ्यात या ठिकाणावर जिल्हा प्रशासनाचे २४ तास लक्ष असणार आहे. आवश्यकता भासल्यास या कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येणार असून, यासाठी निवारा व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच, या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी शासनाकडे ८ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून, त्याला प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते. दरड कोसळणे, भूस्खलन आदी प्रकार घडतात. त्यामुळे आगामी पावसाळ्यात संभाव्य आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्यात गेली दोन वर्षे भूस्खलन होणारी गावे निश्चित केली आहे. यासाठी शासनाकडून जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. या कंपनीने २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये सर्व्हे करून भूस्खलन होणारी गावे निश्चित केली आहेत.या गावांवर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यात २० गावे अशी आहेत की ज्या ठिकाणी भूस्खलन होते. यात ४६८ कुटुंबे आणि १९७७ व्यक्ती बाधित आहेत. या ठिकाणी पावसाळ्यात भूस्खलन झाल्यास तेथील नागरिकांना रेस्क्यू करणे, त्यांच्या राहण्याची, खाण्याची व्यवस्था नजीकच्या शाळा, समाजमंदिर आदी ठिकाणी करण्यात आली आहे. या गावांवर जिल्हा आणि तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन विभागाची २४ तास नजर असणार आहे. यावेळी संभाव्य भूस्खलन स्थिती निर्माण झाल्यास त्या ठिकाणी लागणारी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली.

ही आहेत भूस्खलन होणारी गावेभूस्खलन होणाऱ्या गावांमध्ये कुडाळ तालुक्यात वेताळबांबर्डे तेलीवाडी, सरंबळ देऊळवाडी, चेंदवण नाईकनगर, वेलवाडी, हळदीचे नेरूर, शिवापूर गावठाणवाडी, वेंगुर्ला तालुक्यातील तुळस पलतड, वेशीवाडी, पाल, काथरवाडी, दाभोली, कोरजाई आनंदवाडी, सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गोटवेवाडी, असनिये कणेवाडी, दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे दापटेवाडी, मांगेली फणसवाडी, सासोली गावठाणवाडी, मालवण तालुक्यातील चिंदर तेराईवाडी, देवगड तालुक्यातील पेंढरी गावठाणवाडी, मुटाट घाडीवाडी, पोंभुर्ले मलपेवाडी रोड, मणचे या गावांचा समावेश आहे.

२० गावांतील ४६८ कुटुंबे बाधितभूस्खलन होणाऱ्या २० गावांतील ४६८ कुटुंबे बाधित असून, यातील १९७७ व्यक्ती बाधित आहेत. यात कुडाळ ४१ कुटुंबे, वेंगुर्ला ३५, सावंतवाडी १८०, दोडामार्ग १५२, मालवण २, देवगड तालुक्यातील ५८ कुटुंबांचा समावेश आहे.

८ कोटी रुपयांची मागणीजिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या कंपनीने जिल्ह्यातील भूस्खलन होणारी गावे निश्चित करून या गावांमध्ये दरड सौमीकरण उपाययोजना आखण्यासाठी ८ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून, तो शासनाला सादर केला आहे. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निधीतून संरक्षक भिंत बांधणे, रस्ते दुरुस्त करणे आदी कामे केली जाणार आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गlandslidesभूस्खलन