शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज ठाकरे २२ मे पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर, दौऱ्यामुळे मनसेत चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 16:34 IST

सामान्यांबरोबरच सर्वच स्तरातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य तसेच केंद्र शासन अपयशी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे २२ मे पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत.

ठळक मुद्देराज ठाकरेंच्या २२ मे पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावरदौऱ्यामुळे मनसेत चैतन्य

कणकवली : सामान्यांबरोबरच सर्वच स्तरातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य तसेच केंद्र शासन अपयशी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे २२ मे पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्यात ते जनतेच्या विविध समस्या जाणून घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे मनसैनिकांमध्ये निश्चितच नवचैतन्य संचारेल, असा विश्वास मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे व्यक्त केला.संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अमोल सावंत, दत्ताराम बिडवाडकर, शैलेंद्र नेरकर उपस्थित होते.परशुराम उपरकर पुढे म्हणाले, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे सिंधुदुर्गात येत आहेत. कोकणातील जनतेच्या प्रश्नांची माहिती ते या दौऱ्यात घेणार आहेत. सध्याच्या शासनकर्त्यांबद्दल जनतेत नाराजी असून त्यांच्या समस्या राज ठाकरे ऐकून घेणार आहेत.

नाणार तसेच इतर प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या लढ्याला पाठबळ देण्यासाठी ठोस निर्णय या दौऱ्यात ते घेतील. त्यामुळे जनतेलाही या दौऱ्याबाबत उत्सुकता आहे. तसेच राज ठाकरेंकडे जनता वेगळ्या अपेक्षेने बघत आहे.

२२, २३ मे रोजीचा दौरा कार्यक्रमराज ठाकरे २२ मे रोजी सायंकाळी ४ वाजता सावंतवाडी येथे दोडामार्ग, वेंगुर्ले, सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता कुडाळ येथे पत्रकार व मान्यवरांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. रात्री कुडाळ येथे मुक्काम केल्यानंतर २३ मे रोजी सकाळी ९.३० वाजता कुडाळ येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता मालवण येथे पदाधिकारी बैठक होईल.सायंकाळी ४ वाजता देवगड येथे कार्यालय उद्घाटन व देवगड पदाधिकारी बैठक होईल. सायंकाळी ५.३० वाजता कणकवली येथे वैभववाडी व कणकवली तालुक्यातील पदाधिकाऱ्याची बैठक होईल. कणकवली येथे रात्री मुक्काम केल्यानंतर २४ मे रोजी सकाळी ९ वाजता राज ठाकरे राजापूरकडे पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत, असेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेsindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर