शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

जिल्ह्यातील १९६५ शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 15:30 IST

कर्जमाफीची तिसरी यादी शासनाने अद्याप जाहीर केलेली नाही. ३१ मार्च २०२० पर्यंत जिल्ह्यातील ८ हजार ७७ शेतकऱ्यांना ३२ कोटी ६९ लाख एवढी कर्जमाफी त्यांच्या खात्यात जमा झाली होती. त्यानंतर एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांत आणखी केवळ ८५ शेतकऱ्यांच्या खात्यात ही कर्जमाफी रक्कम जमा झाली आहे. ३८ लाख २५ हजार ३१५ रुपये एवढी ही रक्कम आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील १९६५ शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचितआतापर्यंत ८ हजार १५२ शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा

ओरोस : कर्जमाफीची तिसरी यादी शासनाने अद्याप जाहीर केलेली नाही. ३१ मार्च २०२० पर्यंत जिल्ह्यातील ८ हजार ७७ शेतकऱ्यांना ३२ कोटी ६९ लाख एवढी कर्जमाफी त्यांच्या खात्यात जमा झाली होती. त्यानंतर एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांत आणखी केवळ ८५ शेतकऱ्यांच्या खात्यात ही कर्जमाफी रक्कम जमा झाली आहे. ३८ लाख २५ हजार ३१५ रुपये एवढी ही रक्कम आहे.परिणामी आतापर्यंत ८ हजार १५२ शेतकऱ्यांच्या खात्यात ३३ कोटी ७ लाख २५ हजार ३१५ रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे. तर यादीत नाव न आलेले १ हजार १८३ आणि यादीत नाव येऊन आधार प्रमाणीकरण न झालेले ७८२ असे एकूण १ हजार ९६५ शेतकरी कर्जमाफीपासून अजूनही वंचित आहेत.आॅगस्ट ते सप्टेंबर २०१९ या दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना २०१९ जाहीर केली होती. त्याचा अध्यादेश २७ डिसेंबर २०१९ रोजी काढण्यात आला. पहिली यादी २८ फेब्रुवारी २०२० रोजी काढण्यात आली. त्यानंतर दुसरी यादी जाहीर केली. जिल्ह्यात या योजनेत ११ हजार ३ शेतकरी पात्र ठरले होते. यातील पहिल्या दोन याद्यांत मिळून ९८२० शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली होती. ११८३ नावे प्रसिद्ध झाली नव्हती. उर्वरित नावे तिसºया यादीत असतील असे शासनाने जाहीर केले होते.अल्प मुदतीचे शेती कर्ज घेत व्याजासह २ लाख रुपयांची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांही कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. पहिल्या व दुसऱ्या यादीत मिळून नावे प्रसिद्ध झालेल्या शेतकऱ्यांना महा-ई सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करण्याचे बंधन घातले आहे. जिल्ह्यात पहिल्या दोन प्रसिद्ध याद्यांमध्ये मिळून ९ हजार ८२० शेतकऱ्यांपैकी ९ हजार ५१ शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे. तर ७८२ शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही.मात्र, यातील ८ हजार १५२ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी रक्कम जमा झालेली आहे. तर यादीत नाव येऊनही आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने ७८२ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे ते या रकमेकडे डोळे लावून आहेत.महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी योजनेची तिसरी यादी तीन महिन्यांपासून रखडलीमहात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना २०१९ ची तिसरी यादी तीन महिन्यांहून अधिक काळ रखडली आहे. परिणामी जिल्ह्यातील १ हजार १८३ लाभार्थी कर्जमाफी यादीत नाव येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यादीत नाव येऊन आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने ७८२ शेतकऱ्यांना खात्यात कर्जमाफी रक्कम जमा होऊ शकली नाही.

मार्च महिन्यात दुसरी यादी आली. मात्र, त्यानंतर तीन महिने उलटले तरी प्रसिद्ध ७८२ शेतकरी प्रतीक्षेत आहेत. याच काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाले. त्यानंतर लॉकडाऊन शिथिल झालेतरी आधार केंद्रात जाण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रमाणीकरण रखडले. परिणामी शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग