शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

रिफायनरीमुळे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध : अनिल नागवेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 17:06 IST

राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पामुळे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असून या प्रकल्पामुळे पर्यावरणाला बाधा पोहोचत नाही, अशी माहिती रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाचे जनसंपर्क अधिकारी अनिल नागवेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देरिफायनरीमुळे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध : अनिल नागवेकर मुंबईपेक्षाही राजापूरला महत्त्व येणारनाणार प्रकल्पामुळे मोठी आर्थिक उलाढालही होणार

सिंधुदुर्ग : राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पामुळे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असून या प्रकल्पामुळे पर्यावरणाला बाधा पोहोचत नाही. भारतात २३ ठिकाणी रिफायनरी प्रकल्प असून कोकणात हा प्रकल्प पहिलाच आहे. या प्रकल्पामुळे राजापूर शहरात मोठी आर्थिक उलाढाल होणार असून त्याचा फायदा स्थानिकांनाच होणार आहे, अशी माहिती रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाचे जनसंपर्क अधिकारी अनिल नागवेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.अनिल नागवेकर पुढे म्हणाले, मुंबईतील चेंबूर येथे २ रिफायनरी प्रकल्प आहेत. त्या ठिकाणी कोणतेही प्रदूषण होत नाही. नाणार येथील प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. आता ज्या बागायतदारांकडे मजूर म्हणून काम करीत आहेत त्या मजुरांना किती बागायतदार पीएफ देतात व कोणती सुविधा देतात याचा विरोध करणाऱ्यांनी विचार करावा. प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा प्रकल्प काय आहे ते आधी समजून घ्यावे.शिवसेनेचे पूर्वी या प्रकल्पाला समर्थन होते. आता ते विरोध करीत आहेत. या प्रकल्पामुळे राजापुरात आर्थिक गंगा येणार आहे याचा कोणीही विचारच करीत नसल्याबद्दल अनिल नागवेकर यांची चिंता व्यक्त केली. प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा या प्रकल्पामुळे होणाऱ्या फायद्याचा विचार करायला हवा. कोकणातील अनेक पिढ्या यामुळे सुखी होणार आहेत. आता कोकणात ६० ते ७० टक्के लोकांची घरे बंद आहेत. सर्व तरुण मुंबईला नोकरीसाठी जात आहेत.जमीन मालकांना आपल्या मुलांच्या नोकरीबाबत प्रकल्प व्यवस्थापन हमी द्यायला तयार आहे. शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळेल. ज्याचे जसे शिक्षण आहे त्या प्रमाणे आयटीआयटी कोर्स देऊन सुशिक्षित बेरोजगारांना घडवण्यात येणार आहे. मात्र, स्थानिकांनी या बाबत प्रकल्प व्यवस्थापनाशी चर्चा करणे आवश्यक असल्याचे अनिल नागवेकर यांनी सांगितले.प्रकल्पाबाबत अपप्रचार!केरळ, गुजरात, चेन्नई, कलकत्ता आदी ठिकाणी रिफायनरी प्रकल्प आहेत. या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. काहीजण हा प्रकल्प कोळशावर चालणारा आहे, असे सांगून प्रकल्पाच्या विरोधात चुकीची माहिती ग्रामस्थांमध्ये पसरवित आहेत. मात्र, प्रकल्पग्रस्तांनी हा प्रकल्प काय आहे हे समजून घेऊन आपल्या मुलांना कशा प्रकारे नोकऱ्या मिळणार आहेत याची कंपनीकडून माहिती करून घेणे आवश्यक आहे.

जर आपल्या मुलांना चांगली नोकरी मिळणार असेल तर जमीन मालकांनी या प्रकल्पाचे समर्थन करणे आवश्यक आहे. या प्रकल्पात कायमस्वरूपी नोकरी असून पीएफ, ग्रॅच्युईटी आदी सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. याचा लाभ जमीन मालकांनी घेऊन आपल्या कुटुंबाच्या भवितव्याचा विचार करावा. या प्रकल्पामुळे आपल्या घरात आर्थिक सुबत्ता येणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पsindhudurgसिंधुदुर्ग