शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

रिफायनरीमुळे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध : अनिल नागवेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 17:06 IST

राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पामुळे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असून या प्रकल्पामुळे पर्यावरणाला बाधा पोहोचत नाही, अशी माहिती रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाचे जनसंपर्क अधिकारी अनिल नागवेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देरिफायनरीमुळे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध : अनिल नागवेकर मुंबईपेक्षाही राजापूरला महत्त्व येणारनाणार प्रकल्पामुळे मोठी आर्थिक उलाढालही होणार

सिंधुदुर्ग : राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पामुळे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असून या प्रकल्पामुळे पर्यावरणाला बाधा पोहोचत नाही. भारतात २३ ठिकाणी रिफायनरी प्रकल्प असून कोकणात हा प्रकल्प पहिलाच आहे. या प्रकल्पामुळे राजापूर शहरात मोठी आर्थिक उलाढाल होणार असून त्याचा फायदा स्थानिकांनाच होणार आहे, अशी माहिती रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाचे जनसंपर्क अधिकारी अनिल नागवेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.अनिल नागवेकर पुढे म्हणाले, मुंबईतील चेंबूर येथे २ रिफायनरी प्रकल्प आहेत. त्या ठिकाणी कोणतेही प्रदूषण होत नाही. नाणार येथील प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. आता ज्या बागायतदारांकडे मजूर म्हणून काम करीत आहेत त्या मजुरांना किती बागायतदार पीएफ देतात व कोणती सुविधा देतात याचा विरोध करणाऱ्यांनी विचार करावा. प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा प्रकल्प काय आहे ते आधी समजून घ्यावे.शिवसेनेचे पूर्वी या प्रकल्पाला समर्थन होते. आता ते विरोध करीत आहेत. या प्रकल्पामुळे राजापुरात आर्थिक गंगा येणार आहे याचा कोणीही विचारच करीत नसल्याबद्दल अनिल नागवेकर यांची चिंता व्यक्त केली. प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा या प्रकल्पामुळे होणाऱ्या फायद्याचा विचार करायला हवा. कोकणातील अनेक पिढ्या यामुळे सुखी होणार आहेत. आता कोकणात ६० ते ७० टक्के लोकांची घरे बंद आहेत. सर्व तरुण मुंबईला नोकरीसाठी जात आहेत.जमीन मालकांना आपल्या मुलांच्या नोकरीबाबत प्रकल्प व्यवस्थापन हमी द्यायला तयार आहे. शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळेल. ज्याचे जसे शिक्षण आहे त्या प्रमाणे आयटीआयटी कोर्स देऊन सुशिक्षित बेरोजगारांना घडवण्यात येणार आहे. मात्र, स्थानिकांनी या बाबत प्रकल्प व्यवस्थापनाशी चर्चा करणे आवश्यक असल्याचे अनिल नागवेकर यांनी सांगितले.प्रकल्पाबाबत अपप्रचार!केरळ, गुजरात, चेन्नई, कलकत्ता आदी ठिकाणी रिफायनरी प्रकल्प आहेत. या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. काहीजण हा प्रकल्प कोळशावर चालणारा आहे, असे सांगून प्रकल्पाच्या विरोधात चुकीची माहिती ग्रामस्थांमध्ये पसरवित आहेत. मात्र, प्रकल्पग्रस्तांनी हा प्रकल्प काय आहे हे समजून घेऊन आपल्या मुलांना कशा प्रकारे नोकऱ्या मिळणार आहेत याची कंपनीकडून माहिती करून घेणे आवश्यक आहे.

जर आपल्या मुलांना चांगली नोकरी मिळणार असेल तर जमीन मालकांनी या प्रकल्पाचे समर्थन करणे आवश्यक आहे. या प्रकल्पात कायमस्वरूपी नोकरी असून पीएफ, ग्रॅच्युईटी आदी सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. याचा लाभ जमीन मालकांनी घेऊन आपल्या कुटुंबाच्या भवितव्याचा विचार करावा. या प्रकल्पामुळे आपल्या घरात आर्थिक सुबत्ता येणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पsindhudurgसिंधुदुर्ग