शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

रिफायनरीमुळे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध : अनिल नागवेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 17:06 IST

राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पामुळे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असून या प्रकल्पामुळे पर्यावरणाला बाधा पोहोचत नाही, अशी माहिती रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाचे जनसंपर्क अधिकारी अनिल नागवेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देरिफायनरीमुळे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध : अनिल नागवेकर मुंबईपेक्षाही राजापूरला महत्त्व येणारनाणार प्रकल्पामुळे मोठी आर्थिक उलाढालही होणार

सिंधुदुर्ग : राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पामुळे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असून या प्रकल्पामुळे पर्यावरणाला बाधा पोहोचत नाही. भारतात २३ ठिकाणी रिफायनरी प्रकल्प असून कोकणात हा प्रकल्प पहिलाच आहे. या प्रकल्पामुळे राजापूर शहरात मोठी आर्थिक उलाढाल होणार असून त्याचा फायदा स्थानिकांनाच होणार आहे, अशी माहिती रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाचे जनसंपर्क अधिकारी अनिल नागवेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.अनिल नागवेकर पुढे म्हणाले, मुंबईतील चेंबूर येथे २ रिफायनरी प्रकल्प आहेत. त्या ठिकाणी कोणतेही प्रदूषण होत नाही. नाणार येथील प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. आता ज्या बागायतदारांकडे मजूर म्हणून काम करीत आहेत त्या मजुरांना किती बागायतदार पीएफ देतात व कोणती सुविधा देतात याचा विरोध करणाऱ्यांनी विचार करावा. प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा प्रकल्प काय आहे ते आधी समजून घ्यावे.शिवसेनेचे पूर्वी या प्रकल्पाला समर्थन होते. आता ते विरोध करीत आहेत. या प्रकल्पामुळे राजापुरात आर्थिक गंगा येणार आहे याचा कोणीही विचारच करीत नसल्याबद्दल अनिल नागवेकर यांची चिंता व्यक्त केली. प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा या प्रकल्पामुळे होणाऱ्या फायद्याचा विचार करायला हवा. कोकणातील अनेक पिढ्या यामुळे सुखी होणार आहेत. आता कोकणात ६० ते ७० टक्के लोकांची घरे बंद आहेत. सर्व तरुण मुंबईला नोकरीसाठी जात आहेत.जमीन मालकांना आपल्या मुलांच्या नोकरीबाबत प्रकल्प व्यवस्थापन हमी द्यायला तयार आहे. शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळेल. ज्याचे जसे शिक्षण आहे त्या प्रमाणे आयटीआयटी कोर्स देऊन सुशिक्षित बेरोजगारांना घडवण्यात येणार आहे. मात्र, स्थानिकांनी या बाबत प्रकल्प व्यवस्थापनाशी चर्चा करणे आवश्यक असल्याचे अनिल नागवेकर यांनी सांगितले.प्रकल्पाबाबत अपप्रचार!केरळ, गुजरात, चेन्नई, कलकत्ता आदी ठिकाणी रिफायनरी प्रकल्प आहेत. या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. काहीजण हा प्रकल्प कोळशावर चालणारा आहे, असे सांगून प्रकल्पाच्या विरोधात चुकीची माहिती ग्रामस्थांमध्ये पसरवित आहेत. मात्र, प्रकल्पग्रस्तांनी हा प्रकल्प काय आहे हे समजून घेऊन आपल्या मुलांना कशा प्रकारे नोकऱ्या मिळणार आहेत याची कंपनीकडून माहिती करून घेणे आवश्यक आहे.

जर आपल्या मुलांना चांगली नोकरी मिळणार असेल तर जमीन मालकांनी या प्रकल्पाचे समर्थन करणे आवश्यक आहे. या प्रकल्पात कायमस्वरूपी नोकरी असून पीएफ, ग्रॅच्युईटी आदी सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. याचा लाभ जमीन मालकांनी घेऊन आपल्या कुटुंबाच्या भवितव्याचा विचार करावा. या प्रकल्पामुळे आपल्या घरात आर्थिक सुबत्ता येणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पsindhudurgसिंधुदुर्ग