शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

१२0 जण दगावले

By admin | Updated: March 24, 2015 00:17 IST

पाच वर्षातील स्थिती : जिल्ह्यात ५५१५ क्षयरोगाने रूग्ण बाधित

गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गत पाच वर्षात १२० क्षयरूग्णांचा मृत्यू झाला असल्याचे क्षयरोग विभागाच्या अहवालादरम्यान उघड झाले आहे. सन २०११ मध्ये सर्वाधिक म्हणजेच ३८ क्षयरूग्णांचा मृत्यू झाला आहे. गत पाच वर्षात एकूण ५५१५ क्षयरोगबाधीत रूग्ण आढळले असून त्यापैकी १ हजार ६७४ रूग्ण हे औषधोपचाराअंती बरे झाले आहेत.क्षयरोग हा एक जीवघेणा आजार म्हणून प्राचीन काळापासून प्रचलित आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात या जीवघेण्या आजारावर प्रभावी औषधे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता क्षयरोगाने मृत्यू होणाऱ्या रूग्णांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. या रोगाने मृत्यू होण्याचे आणखीन एक कारण म्हणजे जनतेमध्ये या आजाराबाबत झालेली जनजागृती. तसेच क्षयरोग विभागामार्फत करण्यात येणाऱ्या यशस्वी कामकाजाच्या जोरावर आज काही प्रमाणात या रोगाने मृत्यू होणाऱ्या रूग्णांच्या संख्येवर आळा बसला आहे. जिल्ह्यात सन २००२ पासून सुधारीत क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला. या अंतर्गत थुंकी नमुने तपासून संबंधित रूग्णांवर औषधोपचार करण्यात येतात. ही तपासणी मोफत असते. क्षयरोग आजाराविषयी मागील पाच वर्षांची आकडेवारी लक्षात घेता सन २०११ मध्ये ४३७ नवीन थुंकी दुषित रूग्ण आढळले होते. त्यात तब्बल ३८ रूग्णांचा आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत्यूचे प्रमाण हे २०१२ नंतर कमी कमी होत गेले. सन २०१४ मध्ये ३७५ रूग्णांना क्षयरोग हा आजार जडला होता. त्यात १८ जणांचा मृत्यू झाला होता.लोकमत विशेषक्षयरोग कसा होतो ?क्षयरोग हा संसर्गजन्य रोग आहे. तो ‘मायक्रो बॅक्टेरिअम ट्युबर क्युलोसिस’ या अतिसुक्ष्म जंतुंमुळे होतो. फुफ्फुसाचा क्षयरोग झालेली रोगी जेव्हा खोकतो, त्यावेळी त्याच्या शरीरातील जंतू हवेत फेकले जातात व ते हवेत तरंगत राहतात. अशी हवा श्वसनामार्फत अन्य निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेल्यास त्याला क्षयरोग होऊ शकतो. फुफ्फुसातील क्षयाचे जंतु शरीरात अन्य ठिकाणी गेल्यास इतर अवयवांचाही क्षयरोग होतो.क्षयरोग आता बऱ्यापैकी आटोक्यात आला असून रूग्णाला कमी प्रमाणात आढळू लागले आहेत ही निश्चितच चांगली बाब असली तरी भविष्यात क्षयरोगाने एकाही रूग्णाचा मृत्यू होणार नाही यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यावर मात करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. संबंधित क्षयरोग बाधित रूग्णांनीही सहकार्य करावे.- डॉ. बी.डी. खाडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी२१ सुक्ष्मदर्शी केंद्रेक्षयरोगबाधीत किंवा संशयित रूग्णाला क्षयरोग निदान चाचणी करण्यासाठी सोपे जावे यासाठी शासनाने मान्यताप्राप्त २१ सूक्ष्मदर्शी केंद्राची स्थापना केली आहे.ही केंद्रे सर्व ग्रामीण रूणालयात, उपजिल्हा रूग्णालयात, काही प्राथमिक आरोग्य केंद्रात व ३ खासगी डॉक्टरांकडे स्थापन करण्यात आली आहेत.यात संशयित रूग्णांची थुंकी तपासणे, एक्स- रे काढणे, औषधोपचार करणे आदी मोफत सुविधा या केंद्रांमार्फत पुरविण्यात येतात.जागतिक क्षयरोग दिनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्षयरोगबाधीत रूग्णांची शोधमोहीम सप्ताह सुरू झाला असून त्याची सुरूवात वैभववाडी तालुक्यातून करण्यात आली आहे.टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्हाभर हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. रूग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर औषधोपचार सुरू होणार आहेत.या दिनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे येथे जनजागृतीपर रॅली काढण्यात येणार आहे.तसेच जिल्हा रूग्णालयाच्या टीबी वॉर्डमधील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना या आजाराबाबत माहिती देऊन त्यांना कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे हे सांगण्यात येणार आहे.दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला.वजन कमी होणेछातीत दुखणेदम लागणेताप येणेभूक कमी लागणेरोगाचे प्रमाण वाढल्यास बेडक्यातून रक्त पडणेऔषधोपचारएम.डी.आर.टी.बी.चे रोगनिदान निश्चित झाल्यास संबंधित रूग्णास डॉट्स प्लस साईटकडे पाठविले जाते. सर्व तपास केल्यानंतरच रूग्णास कॅट-४ चा औषधोपचार सुरू केला जातो व ६ ते ९ महिन्यात या रोगाचा रूग्ण बरा होतो. आजाराच्या गंभीर अवस्थेत त्वचेखाली, मेंदूत रक्तस्त्राव होतो.