शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

१२0 जण दगावले

By admin | Updated: March 24, 2015 00:17 IST

पाच वर्षातील स्थिती : जिल्ह्यात ५५१५ क्षयरोगाने रूग्ण बाधित

गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गत पाच वर्षात १२० क्षयरूग्णांचा मृत्यू झाला असल्याचे क्षयरोग विभागाच्या अहवालादरम्यान उघड झाले आहे. सन २०११ मध्ये सर्वाधिक म्हणजेच ३८ क्षयरूग्णांचा मृत्यू झाला आहे. गत पाच वर्षात एकूण ५५१५ क्षयरोगबाधीत रूग्ण आढळले असून त्यापैकी १ हजार ६७४ रूग्ण हे औषधोपचाराअंती बरे झाले आहेत.क्षयरोग हा एक जीवघेणा आजार म्हणून प्राचीन काळापासून प्रचलित आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात या जीवघेण्या आजारावर प्रभावी औषधे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता क्षयरोगाने मृत्यू होणाऱ्या रूग्णांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. या रोगाने मृत्यू होण्याचे आणखीन एक कारण म्हणजे जनतेमध्ये या आजाराबाबत झालेली जनजागृती. तसेच क्षयरोग विभागामार्फत करण्यात येणाऱ्या यशस्वी कामकाजाच्या जोरावर आज काही प्रमाणात या रोगाने मृत्यू होणाऱ्या रूग्णांच्या संख्येवर आळा बसला आहे. जिल्ह्यात सन २००२ पासून सुधारीत क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला. या अंतर्गत थुंकी नमुने तपासून संबंधित रूग्णांवर औषधोपचार करण्यात येतात. ही तपासणी मोफत असते. क्षयरोग आजाराविषयी मागील पाच वर्षांची आकडेवारी लक्षात घेता सन २०११ मध्ये ४३७ नवीन थुंकी दुषित रूग्ण आढळले होते. त्यात तब्बल ३८ रूग्णांचा आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत्यूचे प्रमाण हे २०१२ नंतर कमी कमी होत गेले. सन २०१४ मध्ये ३७५ रूग्णांना क्षयरोग हा आजार जडला होता. त्यात १८ जणांचा मृत्यू झाला होता.लोकमत विशेषक्षयरोग कसा होतो ?क्षयरोग हा संसर्गजन्य रोग आहे. तो ‘मायक्रो बॅक्टेरिअम ट्युबर क्युलोसिस’ या अतिसुक्ष्म जंतुंमुळे होतो. फुफ्फुसाचा क्षयरोग झालेली रोगी जेव्हा खोकतो, त्यावेळी त्याच्या शरीरातील जंतू हवेत फेकले जातात व ते हवेत तरंगत राहतात. अशी हवा श्वसनामार्फत अन्य निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेल्यास त्याला क्षयरोग होऊ शकतो. फुफ्फुसातील क्षयाचे जंतु शरीरात अन्य ठिकाणी गेल्यास इतर अवयवांचाही क्षयरोग होतो.क्षयरोग आता बऱ्यापैकी आटोक्यात आला असून रूग्णाला कमी प्रमाणात आढळू लागले आहेत ही निश्चितच चांगली बाब असली तरी भविष्यात क्षयरोगाने एकाही रूग्णाचा मृत्यू होणार नाही यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यावर मात करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. संबंधित क्षयरोग बाधित रूग्णांनीही सहकार्य करावे.- डॉ. बी.डी. खाडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी२१ सुक्ष्मदर्शी केंद्रेक्षयरोगबाधीत किंवा संशयित रूग्णाला क्षयरोग निदान चाचणी करण्यासाठी सोपे जावे यासाठी शासनाने मान्यताप्राप्त २१ सूक्ष्मदर्शी केंद्राची स्थापना केली आहे.ही केंद्रे सर्व ग्रामीण रूणालयात, उपजिल्हा रूग्णालयात, काही प्राथमिक आरोग्य केंद्रात व ३ खासगी डॉक्टरांकडे स्थापन करण्यात आली आहेत.यात संशयित रूग्णांची थुंकी तपासणे, एक्स- रे काढणे, औषधोपचार करणे आदी मोफत सुविधा या केंद्रांमार्फत पुरविण्यात येतात.जागतिक क्षयरोग दिनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्षयरोगबाधीत रूग्णांची शोधमोहीम सप्ताह सुरू झाला असून त्याची सुरूवात वैभववाडी तालुक्यातून करण्यात आली आहे.टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्हाभर हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. रूग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर औषधोपचार सुरू होणार आहेत.या दिनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी वेंगुर्ले तालुक्यातील होडावडे येथे जनजागृतीपर रॅली काढण्यात येणार आहे.तसेच जिल्हा रूग्णालयाच्या टीबी वॉर्डमधील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना या आजाराबाबत माहिती देऊन त्यांना कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे हे सांगण्यात येणार आहे.दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला.वजन कमी होणेछातीत दुखणेदम लागणेताप येणेभूक कमी लागणेरोगाचे प्रमाण वाढल्यास बेडक्यातून रक्त पडणेऔषधोपचारएम.डी.आर.टी.बी.चे रोगनिदान निश्चित झाल्यास संबंधित रूग्णास डॉट्स प्लस साईटकडे पाठविले जाते. सर्व तपास केल्यानंतरच रूग्णास कॅट-४ चा औषधोपचार सुरू केला जातो व ६ ते ९ महिन्यात या रोगाचा रूग्ण बरा होतो. आजाराच्या गंभीर अवस्थेत त्वचेखाली, मेंदूत रक्तस्त्राव होतो.