शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सिंधुदुर्गात १,०६२ ग्राहकांची वीज जोडणी तोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 11:24 IST

mahavitaran Sindhudurg- सिंधुदुर्गातील १ लाख ७ हजार २४० ग्राहकांकडे ५५.५७ कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे . यामध्ये कणकवली विभागातील ५२ हजार ६२० ग्राहकांकडे २८.४८ कोटी तर कुडाळ विभागातील ५४ हजार ६२० ग्राहकांकडे २७.०८ कोटी रूपयांची थकबाकी आहे .१ ते १२ मार्चपर्यंत थकबाकी असलेल्या सिंधुदुर्गातील १०६२ ग्राहकांची वीज जोडणी महावितरणने तोडली आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात १,०६२ ग्राहकांची वीज जोडणी तोडलीवीज बील थकबाकी ५५.२७ कोटी,  महावितरणचा बील भरण्यास तगादा

कणकवली : सिंधुदुर्गातील १ लाख ७ हजार २४० ग्राहकांकडे ५५.५७ कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे . यामध्ये कणकवली विभागातील ५२ हजार ६२० ग्राहकांकडे २८.४८ कोटी तर कुडाळ विभागातील ५४ हजार ६२० ग्राहकांकडे २७.०८ कोटी रूपयांची थकबाकी आहे .१ ते १२ मार्चपर्यंत थकबाकी असलेल्या सिंधुदुर्गातील १०६२ ग्राहकांची वीज जोडणी महावितरणने तोडली आहे.यामध्ये कणकवली विभागातील २१७ आणि कुडाळ विभागातील ८४५ थकीत वीजग्राहकांचा समावेश आहे . १ ते १० मार्चपर्यंत केवळ वाणिज्य ग्राहकांवरच कारवाई करण्यात आली होती . ११ मार्च पासून सर्व प्रकारच्या थकीत ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे .कोरोना प्रादुर्भावामुळे सन २०२० या वर्षात अर्थव्यवस्था कोलमडली . मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन सुरू झाले आणि फेब्रुवारी २०२० पासून अनेक ग्राहकांनी वीजबिल भरणे बंद केले . त्यामुळे ३१ मार्च २०२० पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ हजार ४८३ ग्राहक थकबाकीदार झाले . त्यांनी २८.४७ कोटी रुपयांची रक्कम थकीत ठेवली .महावितरण कंपनीने प्राधान्याने या थकीत ग्राहकांकडे बील भरण्यास तगादा लावला आणि १३ मार्च २०२१ पर्यंत त्यापैकी आता १४,९८२ ग्राहकांकडे १०.९१ कोटी रुपये येणे रक्कम शिल्लक राहिली आहे . १३ मार्च २०२१ पर्यंत सिंधुदुर्गातील वीज बील थकबाकी ५५.२७ कोटी आहे . त्यामुळे महावितरणने थकीत वीज बिल असलेल्या ग्राहकांची जोडणी तोडण्यास सुरूवात केली आहे . १ मार्चपासून १० मार्चपर्यंत केवळ वाणिज्य ग्राहकांवर कारवाई झाली .कणकवली विभागातील थकीत असलेल्या ११२ व कुडाळ विभागातील ५१६ वीज बिल थकीत ग्राहकांची वीज ११ व १२ मार्च या दोन दिवसात तोडण्यात आली . अद्याप या महिन्याची देयके अदा करणे बाकी आहे . मुळात प्रतिवर्षी मार्च महिना अखेरीस वीज ग्राहकांच्या हिशोबाची पूर्तता होत असते. मात्र, मागील मार्च महिन्यातच कोरोनामुळे हिशोब करणे राहून गेले .तरीही शासनाने हप्ते , विलंब आकार माफ , अतिरिक्त सवलत ग्राहकांना देण्याचा प्रयत्न केला. अद्यापही महावितरणने ग्राहकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली आहे . परंतु आता थकबाकीचा बोजा महावितरणच्या डोईजड झाला आहे .थकीत ग्राहकांची वीज सुरू ठेवणे म्हणजे बील भरणाऱ्या ग्राहकांवर अन्याय करण्यासारखेच आहे . अनेकजण आम्ही वीज बिल भरले पण ज्यांनी भरले नाही , त्यांची वीज का नाही तोडत ? असे प्रश्न विचारत आहेत . त्यामुळे महावितरणकडून यापुढील काळात वीज बिल वसुलीची मोहीम तीव्र केली जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्ग