शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

सैनिकांसाठी पाठविल्या १० हजार राख्या, मालवणच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 14:54 IST

सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांना मालवणच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तब्बल १० हजार हाती बनविलेल्या राख्या पाठवून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रति प्रेम व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे सैनिकांसाठी पाठविल्या १० हजार राख्या, मालवणच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम विद्यार्थ्यांनी जीवनात देशसेवेच्या भावनेने कार्य करावे : जयंत जावडेकर

मालवण : सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांना मालवणच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तब्बल १० हजार हाती बनविलेल्या राख्या पाठवून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रति प्रेम व्यक्त केले आहे.

सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत या राख्या पाठविण्याचा कार्यक्रम मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. विशेष म्हणजे यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा व महाविद्यालये बंद असूनही विद्यार्थिनींनी गट करून घरीच राहून राख्या बनवून भारतीय वायुदल, नौदल व भूदल (लष्कर) या तिन्ही दलांसाठी राख्या पाठविल्या.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोरोना योद्धा म्हणून मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना सुचिता केळुसकर हिच्या हस्ते प्रतीकात्मक राखी बांधण्यात आली. या उपक्रमासाठी पवन बांदेकर यांनी नियोजन करीत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.कोरोना आजाराची पार्श्वभूमी असतानाही विद्यार्थिनींचे गट बनवून यावर्षीही दहा हजारच्यावर म्हणजेच १०,१०३ राख्या बनविण्यात आल्या. यासाठी संस्थाध्यक्ष विजय पाटकर, प्राचार्य व्ही. जी. खोत तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाचेही मार्गदर्शन व सहकार्य लाभले. राख्या पाठविण्यासाठी टेक्नोव्हा, मुंबईचे मालक मंगेश कुलकर्णी यांचे आर्थिक सहकार्य लाभले आहे.या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, सचिव साबाजी करलकर व प्राध्यापकांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. ह्यरक्ताचे नाते असलेला भाऊ फक्त बहिणीचे रक्षण करतो. मात्र, आपण भारतमातेचे रक्षण करीत आहात व देशसेवेचे पवित्र कार्य आपल्याकडून अविरत घडत राहो. हीच ईश्वरचरणी प्रार्थनाह्ण असा शुभ संदेशही राख्यांसोबत सैनिकांना देण्यात आला आहे, अशी माहिती पवन बांदेकर यांनी दिली. यावेळी पर्यवेक्षक हणमंत तिवले, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, देवेंद्र चव्हाण, गुरुदास दळवी, प्रभुदास आजगांवकर, सुनंदा वाईरकर, शिल्पा प्रभू व काही निवडक विद्यार्थिनी उपस्थित होत्या.देशसेवेतून कृतज्ञता व्यक्तयावेळी जयंत जावडेकर म्हणाले, राख्या पाठविण्याच्या उपक्रमातून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रति प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्याचा विद्यार्थिनींनी केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. देश ही केवळ भौगोलिक सीमा नसून देशातील लोकांच्या कार्यातून देश निर्माण होत असतो. म्हणूनच आपण देशासाठी काय करतो हे जास्त महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी पुढील जीवनात देशसेवेच्या भावनेने कार्य करावे.विद्यार्थिनींनी बनविलेल्या राख्या पंजाब, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, मणिपूर, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्किम, जम्मू-कश्मीर, लेह-लडाख, तसेच नौदलासाठी कारवार नेव्ही डॉक, मुंबई नेव्ही, पोरबंदर नेव्ही, कोची नेव्ही, विशाखापट्टणम, पोर्ट ब्लेअर, अंदमान व निकोबार, भारतीय वायू दलातील पठाणकोट, हरियाणा, पूलवामा, लेह-लडाख, जम्मू-काश्मिर, उधमपूर आदी ठिकाणी कार्यरत असणाऱ्या तीनही सैन्य दलातील सैनिकांना राख्या पाठविण्यात आल्या. 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनcollegeमहाविद्यालयsindhudurgसिंधुदुर्ग