शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

सैनिकांसाठी पाठविल्या १० हजार राख्या, मालवणच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 14:54 IST

सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांना मालवणच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तब्बल १० हजार हाती बनविलेल्या राख्या पाठवून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रति प्रेम व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे सैनिकांसाठी पाठविल्या १० हजार राख्या, मालवणच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम विद्यार्थ्यांनी जीवनात देशसेवेच्या भावनेने कार्य करावे : जयंत जावडेकर

मालवण : सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांना मालवणच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तब्बल १० हजार हाती बनविलेल्या राख्या पाठवून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रति प्रेम व्यक्त केले आहे.

सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत या राख्या पाठविण्याचा कार्यक्रम मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. विशेष म्हणजे यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा व महाविद्यालये बंद असूनही विद्यार्थिनींनी गट करून घरीच राहून राख्या बनवून भारतीय वायुदल, नौदल व भूदल (लष्कर) या तिन्ही दलांसाठी राख्या पाठविल्या.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोरोना योद्धा म्हणून मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना सुचिता केळुसकर हिच्या हस्ते प्रतीकात्मक राखी बांधण्यात आली. या उपक्रमासाठी पवन बांदेकर यांनी नियोजन करीत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.कोरोना आजाराची पार्श्वभूमी असतानाही विद्यार्थिनींचे गट बनवून यावर्षीही दहा हजारच्यावर म्हणजेच १०,१०३ राख्या बनविण्यात आल्या. यासाठी संस्थाध्यक्ष विजय पाटकर, प्राचार्य व्ही. जी. खोत तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाचेही मार्गदर्शन व सहकार्य लाभले. राख्या पाठविण्यासाठी टेक्नोव्हा, मुंबईचे मालक मंगेश कुलकर्णी यांचे आर्थिक सहकार्य लाभले आहे.या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, सचिव साबाजी करलकर व प्राध्यापकांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. ह्यरक्ताचे नाते असलेला भाऊ फक्त बहिणीचे रक्षण करतो. मात्र, आपण भारतमातेचे रक्षण करीत आहात व देशसेवेचे पवित्र कार्य आपल्याकडून अविरत घडत राहो. हीच ईश्वरचरणी प्रार्थनाह्ण असा शुभ संदेशही राख्यांसोबत सैनिकांना देण्यात आला आहे, अशी माहिती पवन बांदेकर यांनी दिली. यावेळी पर्यवेक्षक हणमंत तिवले, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, देवेंद्र चव्हाण, गुरुदास दळवी, प्रभुदास आजगांवकर, सुनंदा वाईरकर, शिल्पा प्रभू व काही निवडक विद्यार्थिनी उपस्थित होत्या.देशसेवेतून कृतज्ञता व्यक्तयावेळी जयंत जावडेकर म्हणाले, राख्या पाठविण्याच्या उपक्रमातून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रति प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्याचा विद्यार्थिनींनी केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. देश ही केवळ भौगोलिक सीमा नसून देशातील लोकांच्या कार्यातून देश निर्माण होत असतो. म्हणूनच आपण देशासाठी काय करतो हे जास्त महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी पुढील जीवनात देशसेवेच्या भावनेने कार्य करावे.विद्यार्थिनींनी बनविलेल्या राख्या पंजाब, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, मणिपूर, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्किम, जम्मू-कश्मीर, लेह-लडाख, तसेच नौदलासाठी कारवार नेव्ही डॉक, मुंबई नेव्ही, पोरबंदर नेव्ही, कोची नेव्ही, विशाखापट्टणम, पोर्ट ब्लेअर, अंदमान व निकोबार, भारतीय वायू दलातील पठाणकोट, हरियाणा, पूलवामा, लेह-लडाख, जम्मू-काश्मिर, उधमपूर आदी ठिकाणी कार्यरत असणाऱ्या तीनही सैन्य दलातील सैनिकांना राख्या पाठविण्यात आल्या. 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनcollegeमहाविद्यालयsindhudurgसिंधुदुर्ग