शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शतप्रतिशत भाजप मग कुडाळात काय झाले?

By admin | Updated: November 15, 2016 00:22 IST

दीपक केसरकर : पैसे वाटणाऱ्यांविरोधात गृहखात्याचा वापर, सावंतवाडीत शिवसेनेच्या प्रचारास प्रारंभ

सावंतवाडी : माझ्यामुळे युती तुटल्याचा अप्रचार सध्या सावंतवाडीत सुरू आहे. मात्र, ही युती माझ्यामुळे तुटली नसून याची कल्पना भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वालाही आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर शतप्रतिशत भाजप नारा देणाऱ्यांनी कुडाळात काय झाले त्याचा विचार करावा, असा टोला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी भाजपला लगावला. निवडणुकीत पैसे वाटणाऱ्यांविरोधात गृहखात्याचा वापर केला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला. यावेळी विद्यमान नगराध्यक्ष बबन साळगावकर, अ‍ॅड. सुभाष पणदूरकर, प्रचारप्रमुख राजन पोकळे, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, माजी नगराध्यक्षा अनारोजीन लोबो, शहरप्रमुख शब्बीर मणियार, बाबू कुडतरकर, संजय पेडणेकर, विलास जाधव, कीर्ती बोंद्रे, मुन्ना कोरगावकर, महिला आघाडीप्रमुख रश्मी माळवदे, सुरेंद्र बांदेकर, सुरेश भोगटे, प्रकाश परब आदी यावेळी उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, सावंतवाडीत माझ्याबद्दल विरोधी पक्ष अप्रचार करीत आहे. मात्र, या अप्रचारात काही तथ्य नाही. युती तुटली त्याला मला जबाबदार धरले जाते. पण प्रत्यक्षात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना ही युती कोणामुळे तुटली याची माहिती आहे. जिल्ह्यात सावंतवाडी व वेंगुर्ले येथेच युती झाली नाही. शिवसेनेकडून सर्व सहकार्य भाजपला देण्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांनीच प्रतिसाद दिला नसल्याचा खुलासा यावेळी मंत्री केसरकर यांनी केला. तसेच शतप्रतिशत भाजपचा नारा देता त्यावेळी कुडाळ येथे काय झाले याचाही भाजपने विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता युती झाली नसली तरी चांगल्या वातावरणात लढाई जिंकूया, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. आमच्याकडे कार्यकर्ते कमी असले तरी मतदार मोठे आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मला जेवढी मते पडली होती, तेवढीच मते नगराध्यक्षपदाचे उमेदवार बबन साळगावकर यांना पडली पाहिजेत. प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात जाऊन मतदारांना विश्वास द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मी माझा संपूर्ण वेळ हा सावंतवाडीकरांसाठी देणार असून, प्रत्यक्ष प्रचारातही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीेच्या नगरसेवकांनी आपले स्वच्छ चारित्र्य व पारदर्शक व्यवहार कायम राखला. यावेळी ११ नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, त्यांनी जुन्या सहा जणांकडून शिकून घ्यावे. नगरपालिकेत चांगला कारभार करा आणि शहराचे नाव उंचवा, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष राजन पोकळे म्हणाले, कोणी कितीही खालच्या पातळीवर येऊन प्रचार करू दे. आपण शांत वातावरणात प्रचार करून नगराध्यक्षांसह नगरसेवकांना जिंकून आणूया. शहरात केलेल्या विकासकामांमुळे जनतेचे आपल्यावर प्रेम असून, ते प्रेम या निवडणुकीतही दिसून येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रकाश परब, शब्बीर मणियार आदींनी विचार मांडले. केसरकर यांच्या हस्ते सुंदरवाडीचा सर्वांगीण विकास या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी समीरा खलील, दीपाली सावंत, देवेंद्र टेमकर, समता सूर्याजी, नगरसेविका साक्षी कुडतरकर, महेंद्र पटेकर, भारती मोरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जिल्ह्यात बदनाम झालेले सावंतवाडीतसावंतवाडीत सध्या फूट पाडण्याचे काम सुरू आहे. काही जिल्ह्यातील नेते येऊन आमच्यात फूट पाडत आहेत. त्यांनी आपल्या मतदार संघात लक्ष घालावा, असे सांगत बदनाम पुढाऱ्यांमुळे जिल्ह्याचे नाव खराब झाले आहे. त्यांना सावंतवाडीत थारा देऊ नका. अन्यथा, ते सावंतवाडीत फूट पाडतील, असेही त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी गेल्या पाच वर्षांत शहरात केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. यापुढे असाच विकास करणार असून, मोठ्या प्रमाणात निधी शहराचा कायापालट करणार असल्याचेही बबन साळगावकर यांनी सांगितले.