शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

येरळवाडी अन् नेर प्रकल्पाने उन्हाळ्यात मिटविली चिंता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : खटाव तालुक्यात गतवर्षी वरुणराजाची कृपादृष्टी समाधानकारक झाली असल्याने पाणी प्रकल्पात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीसाठा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : खटाव तालुक्यात गतवर्षी वरुणराजाची कृपादृष्टी समाधानकारक झाली असल्याने पाणी प्रकल्पात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीसाठा पन्नास‌ टक्क्यांवर आहे. त्यामुळे परिणामी सर्व गावे आणि वाड्या-वस्त्या टँकरमुक्त राहणार आहेत. कोरोना महामारी आणि मिनी लाॅकडाऊनच्या काळात नागरिकांना किमान पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही.

खटाव तालुक्यातील भूगर्भातील पाणीपातळी टिकून असल्याने शेतकरीवर्ग समाधानी आहे. उपलब्ध पाण्यावर उन्हाळी पिके हाती घेतली जात आहेत. यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही इतका पाणीसाठा येरळवाडी तलाव आणि तालुक्यातील प्रमुख पाझर तलाव्यात साठून आहे. येरळवाडी तलाव्यावरील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला पाण्याची कमतरता जाणवणार नाही. इतका मुबलक पाणीसाठा आहे. येरळवाडी तलावात सध्या पन्नास टक्के पाणीसाठा आहे तर नेर तलाव्यामध्ये ४२.७५ टक्के, मायणी तलाव्यात ५८.२२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सरासरी सर्व प्रकल्पांत चाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर खटाव तालुक्यात पिण्याचा पाण्यासह शेती पाण्याचा प्रश्न गंभीर होत असतो. परिणामी प्रशासनाला पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागत होते. शेती पाण्यासाठी उरमोडी व तारळी प्रकल्पातील अतिरिक्त आवर्तंनावर अवलंबून राहावे लागत होते. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर टँकर मागणी प्रस्तावांना प्रवास करावा लागत असे. मात्र, यावर्षी टँकर मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे आलेला नाही. आगामी काळातही पिण्याच्या तुटवडा भासणार नसल्याचे चित्र यावर्षी तालुक्यात दिसून येत आहे. खटाव तालुक्यात पाणी फौंडेशनच्या काम कमी प्रमाणात झाले असले तरी दुष्काळी परिस्थितीच्या कालावधीत काही मोजक्याच गावांतील ग्रामस्थांनी अगदी आबालवृद्धांसह एकजुटीने श्रमदानातून काम केले होते. गावागावांत श्रमपंढरी फुलली अन्‌ मोठ्या प्रमाणात श्रमदानातून कामे झाली होती. या कामांवर

गतवर्षी निसर्गाने कृपाछत्र धरले आणि सर्व जलस्रोत भरून गेले. त्याचा परिणाम ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाहायला मिळत आहे. अनेक गावांमध्ये शिवारातील विहिरींची पाणी पातळी अवघ्या पाच फुटांवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

चाैकट : उरमोडी धरणातून पाण्याचे आर्वतन सुरू

मध्यम प्रकल्पाचा शेती सिंचनासाठी फायदा होत असून यामध्ये प्रामुख्याने नेर, दरूज, येळीव, सातेवाडी, मायणी व कानकात्रे गावासाठी शेती पाण्यासाठी प्रसंगी उपयोग होतो आहे. खटाव तालुक्यात १६ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत तारळी व उरमोडीचे कॅनाॅलद्वारे पाणी आवर्तन सुरू आहे.‌ उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन हे पाणी सलग ठेवण्यासाठी शेतकरीवर्गातून मागणी होऊ शकते.

चाैकट :

सध्याचा पाणीसाठा दशलक्ष घनमीटरमध्ये

१) नेर - ५.०४,

२) दरूज - १.४०

३) सातेवाडी - ०.४०

४) मायणी - ०.८५

५) कानकात्रे - १.५९

-------------------

फोटो आहे :

फोटो : पावसाळ्यातील येरळवाडी तलावाचे विहंगम दृश्य (शेखर जाधव)