शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

येरळवाडी अन् नेर प्रकल्पाने उन्हाळ्यात मिटविली चिंता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : खटाव तालुक्यात गतवर्षी वरुणराजाची कृपादृष्टी समाधानकारक झाली असल्याने पाणी प्रकल्पात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीसाठा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : खटाव तालुक्यात गतवर्षी वरुणराजाची कृपादृष्टी समाधानकारक झाली असल्याने पाणी प्रकल्पात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीसाठा पन्नास‌ टक्क्यांवर आहे. त्यामुळे परिणामी सर्व गावे आणि वाड्या-वस्त्या टँकरमुक्त राहणार आहेत. कोरोना महामारी आणि मिनी लाॅकडाऊनच्या काळात नागरिकांना किमान पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही.

खटाव तालुक्यातील भूगर्भातील पाणीपातळी टिकून असल्याने शेतकरीवर्ग समाधानी आहे. उपलब्ध पाण्यावर उन्हाळी पिके हाती घेतली जात आहेत. यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही इतका पाणीसाठा येरळवाडी तलाव आणि तालुक्यातील प्रमुख पाझर तलाव्यात साठून आहे. येरळवाडी तलाव्यावरील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला पाण्याची कमतरता जाणवणार नाही. इतका मुबलक पाणीसाठा आहे. येरळवाडी तलावात सध्या पन्नास टक्के पाणीसाठा आहे तर नेर तलाव्यामध्ये ४२.७५ टक्के, मायणी तलाव्यात ५८.२२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सरासरी सर्व प्रकल्पांत चाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर खटाव तालुक्यात पिण्याचा पाण्यासह शेती पाण्याचा प्रश्न गंभीर होत असतो. परिणामी प्रशासनाला पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागत होते. शेती पाण्यासाठी उरमोडी व तारळी प्रकल्पातील अतिरिक्त आवर्तंनावर अवलंबून राहावे लागत होते. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर टँकर मागणी प्रस्तावांना प्रवास करावा लागत असे. मात्र, यावर्षी टँकर मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे आलेला नाही. आगामी काळातही पिण्याच्या तुटवडा भासणार नसल्याचे चित्र यावर्षी तालुक्यात दिसून येत आहे. खटाव तालुक्यात पाणी फौंडेशनच्या काम कमी प्रमाणात झाले असले तरी दुष्काळी परिस्थितीच्या कालावधीत काही मोजक्याच गावांतील ग्रामस्थांनी अगदी आबालवृद्धांसह एकजुटीने श्रमदानातून काम केले होते. गावागावांत श्रमपंढरी फुलली अन्‌ मोठ्या प्रमाणात श्रमदानातून कामे झाली होती. या कामांवर

गतवर्षी निसर्गाने कृपाछत्र धरले आणि सर्व जलस्रोत भरून गेले. त्याचा परिणाम ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाहायला मिळत आहे. अनेक गावांमध्ये शिवारातील विहिरींची पाणी पातळी अवघ्या पाच फुटांवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

चाैकट : उरमोडी धरणातून पाण्याचे आर्वतन सुरू

मध्यम प्रकल्पाचा शेती सिंचनासाठी फायदा होत असून यामध्ये प्रामुख्याने नेर, दरूज, येळीव, सातेवाडी, मायणी व कानकात्रे गावासाठी शेती पाण्यासाठी प्रसंगी उपयोग होतो आहे. खटाव तालुक्यात १६ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत तारळी व उरमोडीचे कॅनाॅलद्वारे पाणी आवर्तन सुरू आहे.‌ उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन हे पाणी सलग ठेवण्यासाठी शेतकरीवर्गातून मागणी होऊ शकते.

चाैकट :

सध्याचा पाणीसाठा दशलक्ष घनमीटरमध्ये

१) नेर - ५.०४,

२) दरूज - १.४०

३) सातेवाडी - ०.४०

४) मायणी - ०.८५

५) कानकात्रे - १.५९

-------------------

फोटो आहे :

फोटो : पावसाळ्यातील येरळवाडी तलावाचे विहंगम दृश्य (शेखर जाधव)