शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

येरळवाडी अन् नेर प्रकल्पाने उन्हाळ्यात मिटविली चिंता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडूज : खटाव तालुक्यात गतवर्षी वरुणराजाची कृपादृष्टी समाधानकारक झाली असल्याने पाणी प्रकल्पात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीसाठा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडूज : खटाव तालुक्यात गतवर्षी वरुणराजाची कृपादृष्टी समाधानकारक झाली असल्याने पाणी प्रकल्पात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीसाठा पन्नास‌ टक्क्यांवर आहे. त्यामुळे परिणामी सर्व गावे आणि वाड्या-वस्त्या टँकरमुक्त राहणार आहेत. कोरोना महामारी आणि मिनी लाॅकडाऊनच्या काळात नागरिकांना किमान पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही.

खटाव तालुक्यातील भूगर्भातील पाणीपातळी टिकून असल्याने शेतकरीवर्ग समाधानी आहे. उपलब्ध पाण्यावर उन्हाळी पिके हाती घेतली जात आहेत. यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही इतका पाणीसाठा येरळवाडी तलाव आणि तालुक्यातील प्रमुख पाझर तलाव्यात साठून आहे. येरळवाडी तलाव्यावरील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला पाण्याची कमतरता जाणवणार नाही. इतका मुबलक पाणीसाठा आहे. येरळवाडी तलावात सध्या पन्नास टक्के पाणीसाठा आहे तर नेर तलाव्यामध्ये ४२.७५ टक्के, मायणी तलाव्यात ५८.२२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सरासरी सर्व प्रकल्पांत चाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर खटाव तालुक्यात पिण्याचा पाण्यासह शेती पाण्याचा प्रश्न गंभीर होत असतो. परिणामी प्रशासनाला पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागत होते. शेती पाण्यासाठी उरमोडी व तारळी प्रकल्पातील अतिरिक्त आवर्तंनावर अवलंबून राहावे लागत होते. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर टँकर मागणी प्रस्तावांना प्रवास करावा लागत असे. मात्र, यावर्षी टँकर मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे आलेला नाही. आगामी काळातही पिण्याच्या तुटवडा भासणार नसल्याचे चित्र यावर्षी तालुक्यात दिसून येत आहे. खटाव तालुक्यात पाणी फौंडेशनच्या काम कमी प्रमाणात झाले असले तरी दुष्काळी परिस्थितीच्या कालावधीत काही मोजक्याच गावांतील ग्रामस्थांनी अगदी आबालवृद्धांसह एकजुटीने श्रमदानातून काम केले होते. गावागावांत श्रमपंढरी फुलली अन्‌ मोठ्या प्रमाणात श्रमदानातून कामे झाली होती. या कामांवर

गतवर्षी निसर्गाने कृपाछत्र धरले आणि सर्व जलस्रोत भरून गेले. त्याचा परिणाम ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाहायला मिळत आहे. अनेक गावांमध्ये शिवारातील विहिरींची पाणी पातळी अवघ्या पाच फुटांवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

चाैकट : उरमोडी धरणातून पाण्याचे आर्वतन सुरू

मध्यम प्रकल्पाचा शेती सिंचनासाठी फायदा होत असून यामध्ये प्रामुख्याने नेर, दरूज, येळीव, सातेवाडी, मायणी व कानकात्रे गावासाठी शेती पाण्यासाठी प्रसंगी उपयोग होतो आहे. खटाव तालुक्यात १६ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत तारळी व उरमोडीचे कॅनाॅलद्वारे पाणी आवर्तन सुरू आहे.‌ उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन हे पाणी सलग ठेवण्यासाठी शेतकरीवर्गातून मागणी होऊ शकते.

चाैकट :

सध्याचा पाणीसाठा दशलक्ष घनमीटरमध्ये

१) नेर - ५.०४,

२) दरूज - १.४०

३) सातेवाडी - ०.४०

४) मायणी - ०.८५

५) कानकात्रे - १.५९

-------------------

फोटो आहे :

फोटो : पावसाळ्यातील येरळवाडी तलावाचे विहंगम दृश्य (शेखर जाधव)