शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

पंचायत समितीला यशवंतरावांच्या विचारांचा वारसा

By admin | Updated: March 2, 2016 23:57 IST

पृथ्वीराज चव्हाण : कऱ्हाडला यशवंतराव चव्हाण सभागृहाचे नूतनीकरण; पंचायत समिती संकेतस्थळाचे लोकार्पण

कऱ्हाड : ‘कऱ्हाडला यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा लाभलेला आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्याचे काम पंचायत समितीच्या माध्यमातून केले जाते. पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकास करण्याचा प्रयत्न केला जातो,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.कऱ्हाड पंचायत समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहाचे नूतनीकरण व संकेतस्थळाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, सभापती देवराज पाटील, मलकापूर नगरपंचायत उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव, डॉ. राजकुमार पवार, जिल्हा परिषद सदस्या विद्या थोरवडे, नीलम पाटील, पंचायत समिती सदस्य सुरेश माने, प्रकाश वास्के, राजेंद्र बामणे सदस्या जबिता बगाडे, अश्विनी लवटे, अनिता निकम, पुष्पावती पाटील, रूपाली यादव, ज्योती गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.राज्यात नावलौकिक असलेल्या येथील पंचायत समितीने सर्व प्रकारची माहिती लोकांसाठी खुली व्हावी, या हेतूने कऱ्हाड पंचायत समितीचे स्वतंत्र संकेतस्थळाचे लोकार्पण व यशवंतराव चव्हाण नवीन सभागृहाचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.आमदार चव्हाण म्हणाले, ‘राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. केंद्राबद्दल सांगायचे झाल्यास कच्च्या तेलांच्या किमती कमी झाल्याने सरकारला एकप्रकारची लॉटरी लागली आहे. त्यातून राज्यातील ग्रामीण भागात सुधारणा करणे अपेक्षित आहे,’ असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.यावेळी सभापती देवराज पाटील, आमदार आनंदराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पंचायत समिती गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी स्वागत केले. सदस्य भाऊसाहेब चव्हाण यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)पाणी बचतीबरोबर आरोग्य सुधारणेचे आव्हानपृथ्वीराज चव्हाण म्हणाले. राज्यातील ग्रामपंचायतीच्या विकासासाठी अर्थसंकल्पात १४ व्या वित्तआयोगाने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यातून ग्रामपंचायतींचा विकास करण्यात येणार आहे. मात्र, यावर्षी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी बचतीबरोबरच शिक्षण व आरोग्याच्या सुधारणेचे मोठे आव्हान राज्यासमोर आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.