शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीला यशवंतरावांच्या विचारांचा वारसा

By admin | Updated: March 2, 2016 23:57 IST

पृथ्वीराज चव्हाण : कऱ्हाडला यशवंतराव चव्हाण सभागृहाचे नूतनीकरण; पंचायत समिती संकेतस्थळाचे लोकार्पण

कऱ्हाड : ‘कऱ्हाडला यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा लाभलेला आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्याचे काम पंचायत समितीच्या माध्यमातून केले जाते. पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकास करण्याचा प्रयत्न केला जातो,’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.कऱ्हाड पंचायत समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहाचे नूतनीकरण व संकेतस्थळाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, सभापती देवराज पाटील, मलकापूर नगरपंचायत उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव, डॉ. राजकुमार पवार, जिल्हा परिषद सदस्या विद्या थोरवडे, नीलम पाटील, पंचायत समिती सदस्य सुरेश माने, प्रकाश वास्के, राजेंद्र बामणे सदस्या जबिता बगाडे, अश्विनी लवटे, अनिता निकम, पुष्पावती पाटील, रूपाली यादव, ज्योती गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.राज्यात नावलौकिक असलेल्या येथील पंचायत समितीने सर्व प्रकारची माहिती लोकांसाठी खुली व्हावी, या हेतूने कऱ्हाड पंचायत समितीचे स्वतंत्र संकेतस्थळाचे लोकार्पण व यशवंतराव चव्हाण नवीन सभागृहाचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.आमदार चव्हाण म्हणाले, ‘राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. केंद्राबद्दल सांगायचे झाल्यास कच्च्या तेलांच्या किमती कमी झाल्याने सरकारला एकप्रकारची लॉटरी लागली आहे. त्यातून राज्यातील ग्रामीण भागात सुधारणा करणे अपेक्षित आहे,’ असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.यावेळी सभापती देवराज पाटील, आमदार आनंदराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पंचायत समिती गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी स्वागत केले. सदस्य भाऊसाहेब चव्हाण यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)पाणी बचतीबरोबर आरोग्य सुधारणेचे आव्हानपृथ्वीराज चव्हाण म्हणाले. राज्यातील ग्रामपंचायतीच्या विकासासाठी अर्थसंकल्पात १४ व्या वित्तआयोगाने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यातून ग्रामपंचायतींचा विकास करण्यात येणार आहे. मात्र, यावर्षी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी बचतीबरोबरच शिक्षण व आरोग्याच्या सुधारणेचे मोठे आव्हान राज्यासमोर आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.