शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

साहित्यिकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात राहावे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:20 IST

वाईत दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन उत्साहात

वाई : ‘विद्यार्थी दशेत चांगलं ऐकलं, लिहिलं पाहिजं. तर नवीन पिढी विचाराने समृद्ध होईल. सध्या महाराष्ट्राची वैचारिक अधोगती झाली आहे. जागृत राहून मतदान केलं पाहिजं. साहित्यिकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधातच राहिलं पाहिजं. तर ते सरळ चालतात. जोखीम आणि जबाबदारी घेऊन जाणाऱ्या साहित्यिकांच्या मागे जनता उभी राहते,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक, संमेलनाध्यक्ष डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले.वाई येथे रविवारी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि कलासागर ॲकॅडमी, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात ते बोलत होते. सदानंद देशमुख यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.यावेळी स्वागताध्यक्ष प्रा. लहुराज पांढरे, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ, रवींद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी, सरपंच सागर जमदाडे, उपसरपंच किरणकुमार जमदाडे, डॉ. नितीन कदम, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, रवींद्र घोडराज, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळुबुळू, डॉ. विनोद कांबळे, अरुण आदलिंगे उपस्थित होते.

लवटे म्हणाले, ‘वाईमध्ये मराठी विश्वकोश आहे. वाईही पूर्वीपासून मराठी साहित्याची राजधानी आहे. प्रज्ञापाठ शाळेत ज्ञानाचे भांडार आहे. इंग्रजी शाळांवर बंदी आणल्याशिवाय मराठी शाळांचा विकास होणार नाही. २०२५ मध्ये हे टेक्नॉलॉजीचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. मराठी समृद्ध होण्यासाठी तंत्रज्ञान अंगीकृत केले पाहिजे. साहित्याची स्पर्धा जगातील साहित्याशी असली पाहिजे.प्रा. लहुराज पांढरे म्हणाले, ‘वाईमध्ये होत असलेले संमेलन अभिमानाची साहित्य घटना आहे. अभिजात मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी नवी पिढी घडविण्याची जबाबदारी शैक्षणिक क्षेत्रातील लोकांसह नवसाहित्यिकांची आहे.’

किशोर बेडकिहाळ म्हणाले, ‘विचाराची बैठक असणाऱ्या महाराष्ट्राचा ऱ्हास होत चालला आहे. बौद्धिक ऱ्हासाला आपणच जबाबदार आहोत. लेखकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्यावर काम करू शकत नाही. साहित्याची वाटचाल अडचणीतून सुरू आहे. बदलत्या विचारात वाचकांच्या अभिरुचीप्रमाणे लेखन केले पाहिजे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भाषेला समृद्ध करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. लेखकांच्या मागे साहित्य संस्थांनी खंबीरपणे उभे राहील पाहिजे.’ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, दिनकर झिंब्रे, प्रा. डॉ. पंडित टापरे, लेखिका प्रा. डॉ. रामकली पावसकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. हेमंत काळोखे यांनी आभार मानले.

अरविंद जगताप यांची प्रकट मुलाखत अन् कविसंमेलनया संमेलनात दुपारी लेखक, पटकथाकार अरविंद जगताप यांची सरोजकुमार मिठारी व डॉ. दत्ता जगताप यांनी प्रकट मुलाखत घेतली. यामध्ये युवा पिढीला उत्तम मार्गदर्शन करण्यात आले.कवी संमेलनामध्ये डॉ. कविता मुरूमकर, डॉ. चंद्रकांत पोतदार, विलास माळी, अजय कांडर, रमजान मुल्ला, ज्ञानेश सूर्यवंशी, रवी बावडेकर, लक्ष्मीकांत रांजणे, योगिता राजकर, सुस्मिता खुटाळे, वसंत शिंदे, डॉ. सुभाष वाघमारे, डॉ. राजेंद्र माने, प्रदीप कांबळे, चंद्रकांत कांबिरे, डॉ. आदिती काळमेख, कांता भोसले, मनीष शिरतवडे यांनी सहभाग घेतला.

उपप्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कथा कथन झाले. यामध्ये हिंमत पाटील, जोतीराम फडतरे व डॉ. अर्जुन व्हटकर यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwai-acवाई