शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना खासदार रवींद्र वायकर 'शिवतीर्थ'वर; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
"मी तर वारकऱ्यांमध्ये गेलो होतो पण..."; कार्यकर्त्याने पाय धुतल्यावर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
3
लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी
4
जीम ट्रेनरच्या प्रेमात अडकली, पतीच्या हत्येची सुपारी दिली; प्लॅन A फसला, त्यानंतर...
5
इंडिया आघाडीची TDP ला ऑफर, तरीही भाजपाला चिंता नाही; लोकसभेचा असा आहे नंबर'गेम'
6
प्रियंका गांधी - स्मृती इराणी यांच्यात होणार लढत? भाजप १९९९ च्या इतिहासाची करणार पुनरावृत्ती?
7
९०% लोकांना माहीत नाही दही खाण्याची योग्य पद्धत; करतात 'या' चुका, तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
8
"वायनाडमधून लढायला या, मोदीजींना कोण रोखतंय?"; काँग्रेसचं पंतप्रधानांना ओपन चॅलेंज
9
सामान्य माणसाचं आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न, अक्षय कुमारच्या 'सरफिरा'चा रोमांचक ट्रेलर रिलीज
10
Team India सुपर-८ साठी सज्ज; रोहितने सांगितली रणनीती, म्हणाला, "शक्य तितक्या..."
11
Gautam Gambhir Interview: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरची मुलाखत; निवड जवळपास निश्चित, अधिकृत घोषणेची प्रतिक्षा
12
"माझ्यासोबत असं का केलं"; वसईत एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या
13
₹४००० पार जाऊ शकतो 'हा' शेअर; JK Cement सह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
14
मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनेच ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट; लक्ष्मण हाके यांचा सनसनाटी आरोप
15
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंकडून मराठा समाजाची फसवणूक, शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखाचा आरोप
16
गायिका अलका याग्निक यांना झालाय दुर्मिळ आजार, पोस्ट करुन केला खुलासा
17
सांगलीचा वाघ पाकिस्तानशी भिडला, ९ गोळ्या झेलूनही नाही हरला; कोण आहे रिअल चंदू चॅम्पियन?
18
Vat Purnima 2024: १९ जूनपासून होत आहे वटसावित्री व्रतारंभ; जाणून घेऊया मूळ परंपरा!
19
एअर इंडिया उघडणार पायलट ट्रेनिंग स्कूल; दरवर्षी मिळणार १८० जणांना प्रशिक्षण
20
सकाळी उठल्यावर परत परत झोपावेसे वाटते? शिवानी दीदी सांगताहेत उपाय!

वर्क फ्रॉम होम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:43 AM

- जगदीश कोष्टी, उपसंपादक, सातारा. कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर काही नवीन शब्द सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात, दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने ...

- जगदीश कोष्टी,

उपसंपादक, सातारा.

कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर काही नवीन शब्द सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात, दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने वापरले जाऊ लागले. लॉकडाऊन, संस्थात्मक विलगीकरण, गृहविलगीकरण, अँटिजन चाचणी, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिमीटर, थर्मामीटर. याबरोबरच आणखीन एक महत्त्वाचा शब्द म्हणजेच ‘वर्क फ्रॉम होम’.

कोरोनाचा संसर्ग हा प्रामुख्याने बाधित रुग्णाच्या निकट संपर्कात आल्यामुळे होतो. हे लक्षात आल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाने लोकांनी गर्दी करू नये म्हणून एकत्र येण्यावर निर्बंध लावले. त्याप्रमाणे मंदिर, शासकीय निमशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा सर्वाधिक फटका खासगी क्षेत्राला झाला. औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या, पुणे, बंगलोर, मुंबई, अहमदाबाद आदी ठिकाणी कार्यरत असणाऱ्या देश-विदेशातील आयटी कंपन्या, कार्पोरेट क्षेत्राला मोठी झळ बसली.

सातारा जिल्ह्यातील असंख्य तरुण नोकरीच्या निमित्ताने पुणे, मुंबई, बंगलोर, अहमदाबाद आदी ठिकाणी एकटे-दुकटे राहत आहेत. लॉकडाऊनमध्ये हॉटेल्स, खानावळी बंद होत्या. यामुळे तरुणांची उपासमार होऊ लागली. त्यातच कामही बंद असल्याने विनाकारण घरभाडे व इतर गोष्टींवर खर्च वाढू लागला. तसेच घराबाहेर कोरोना विषाणूचा धोका अधिक असल्याने या काळात आपल्या रक्ताच्या माणसांमध्ये जाण्याची भावना प्रत्येक माणसांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे या तरुण-तरुणींनी आपापल्या गावी जाणे पसंत केले. कालांतराने कंपन्या मर्यादित कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाल्या; मात्र साताऱ्यातील अनेक कुटुंबांनी मुंबईतील रुग्णसंख्येचा विचार करून मुंबईत जाऊन मरण्यापेक्षा नोकरी गेली तरी चालेल; पण मुलांना न पाठवण्याचा निर्णय घेतला. कंपन्या सुरू करूनही कर्मचाऱ्यांमधून मिळालेला अल्प प्रतिसाद पाहून खासगी कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉर्म होम’चा अवलंब केला.

या कार्यप्रणालीत दररोज सकाळी ऑनलाइन पद्धतीने मिटिंग होऊ लागली. त्यामध्ये कामाचे नियोजन होऊ लागले. काही ठिकाणी फिक्स काम असलेल्या ठिकाणी त्यांना मेल येऊ लागले. काम घरात बसून करण्यास कंपन्यांनी परवानगी दिल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. असंख्य मंडळींनी लागलीच स्वखर्चातून लॅपटॉप, अत्याधुनिक मोबाईल, कॅमेरे खरेदी केले. कामास प्रत्यक्षात सुरुवात केल्यानंतर यामध्ये अनेक अडचणी जाणवू लागल्या. कार्यालयांमध्ये वाय-फाय, ब्रॉडबँड असते. त्यामुळे काम करणे सहज सोपे जाते. ग्रामीण भागात ही सुविधा कुठेही नसल्याने त्यानंतर यंत्रणेतील जुळवाजुळव सुरू झाली. त्यामुळे इंटरनेटचे कनेक्शन, नेट कनेक्शनसाठी डोंगल, मोबाईल कनेक्टिव्हिटी, वेब कॅमेरे, हेडफोन्स यांना मोठी मागणी वाढली.