शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

वर्क फ्रॉम होम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:43 IST

- जगदीश कोष्टी, उपसंपादक, सातारा. कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर काही नवीन शब्द सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात, दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने ...

- जगदीश कोष्टी,

उपसंपादक, सातारा.

कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर काही नवीन शब्द सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात, दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने वापरले जाऊ लागले. लॉकडाऊन, संस्थात्मक विलगीकरण, गृहविलगीकरण, अँटिजन चाचणी, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिमीटर, थर्मामीटर. याबरोबरच आणखीन एक महत्त्वाचा शब्द म्हणजेच ‘वर्क फ्रॉम होम’.

कोरोनाचा संसर्ग हा प्रामुख्याने बाधित रुग्णाच्या निकट संपर्कात आल्यामुळे होतो. हे लक्षात आल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाने लोकांनी गर्दी करू नये म्हणून एकत्र येण्यावर निर्बंध लावले. त्याप्रमाणे मंदिर, शासकीय निमशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा सर्वाधिक फटका खासगी क्षेत्राला झाला. औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या, पुणे, बंगलोर, मुंबई, अहमदाबाद आदी ठिकाणी कार्यरत असणाऱ्या देश-विदेशातील आयटी कंपन्या, कार्पोरेट क्षेत्राला मोठी झळ बसली.

सातारा जिल्ह्यातील असंख्य तरुण नोकरीच्या निमित्ताने पुणे, मुंबई, बंगलोर, अहमदाबाद आदी ठिकाणी एकटे-दुकटे राहत आहेत. लॉकडाऊनमध्ये हॉटेल्स, खानावळी बंद होत्या. यामुळे तरुणांची उपासमार होऊ लागली. त्यातच कामही बंद असल्याने विनाकारण घरभाडे व इतर गोष्टींवर खर्च वाढू लागला. तसेच घराबाहेर कोरोना विषाणूचा धोका अधिक असल्याने या काळात आपल्या रक्ताच्या माणसांमध्ये जाण्याची भावना प्रत्येक माणसांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे या तरुण-तरुणींनी आपापल्या गावी जाणे पसंत केले. कालांतराने कंपन्या मर्यादित कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाल्या; मात्र साताऱ्यातील अनेक कुटुंबांनी मुंबईतील रुग्णसंख्येचा विचार करून मुंबईत जाऊन मरण्यापेक्षा नोकरी गेली तरी चालेल; पण मुलांना न पाठवण्याचा निर्णय घेतला. कंपन्या सुरू करूनही कर्मचाऱ्यांमधून मिळालेला अल्प प्रतिसाद पाहून खासगी कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉर्म होम’चा अवलंब केला.

या कार्यप्रणालीत दररोज सकाळी ऑनलाइन पद्धतीने मिटिंग होऊ लागली. त्यामध्ये कामाचे नियोजन होऊ लागले. काही ठिकाणी फिक्स काम असलेल्या ठिकाणी त्यांना मेल येऊ लागले. काम घरात बसून करण्यास कंपन्यांनी परवानगी दिल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. असंख्य मंडळींनी लागलीच स्वखर्चातून लॅपटॉप, अत्याधुनिक मोबाईल, कॅमेरे खरेदी केले. कामास प्रत्यक्षात सुरुवात केल्यानंतर यामध्ये अनेक अडचणी जाणवू लागल्या. कार्यालयांमध्ये वाय-फाय, ब्रॉडबँड असते. त्यामुळे काम करणे सहज सोपे जाते. ग्रामीण भागात ही सुविधा कुठेही नसल्याने त्यानंतर यंत्रणेतील जुळवाजुळव सुरू झाली. त्यामुळे इंटरनेटचे कनेक्शन, नेट कनेक्शनसाठी डोंगल, मोबाईल कनेक्टिव्हिटी, वेब कॅमेरे, हेडफोन्स यांना मोठी मागणी वाढली.