शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

पोलीस होण्याचे आर्याचे स्वप्न दृष्टिक्षेपात, तृतीयपंथीयांना सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न

By प्रगती पाटील | Updated: December 1, 2023 19:50 IST

या आदेशाची अंमलबजावणी सहा आठवड्यांत करण्याचे निर्देशही करण्यात आले आहेत. यामुळे साताऱ्यातील आर्या पुजारी हिचे पोलीस होण्याचे स्वप्न दृष्टिक्षेपात आले आहे.

सातारा : पोलीस भरतीसाठी तृतीयपंथी म्हणून अर्ज करणाऱ्या अर्जदारांना कट ऑफ गुणांपर्यंत पोचण्यासाठी आवश्यक ग्रेस गुण द्यावेत किंवा एकूण गुणांच्या ५० टक्क्यांपर्यंत जे अर्जदार पोचले असतील त्यांचा संबंधित पदांवरील निवडीबाबत विचार करावा. या अर्जदारांपैकी ४५ टक्के गुणांपर्यंत पोचलेल्या अर्जदाराने वयोमर्यादा ओलांडली असल्यास त्याबाबत सवलत देऊन त्याला आणखी एक संधी द्यावी’, असे आदेश ‘मॅट’च्या अध्यक्ष मृदुला भाटकर व सदस्य मेधा गाडगीळ यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी सहा आठवड्यांत करण्याचे निर्देशही करण्यात आले आहेत. यामुळे साताऱ्यातील आर्या पुजारी हिचे पोलीस होण्याचे स्वप्न दृष्टिक्षेपात आले आहे.

साताऱ्यातील आर्या पुजारी व विनायक काशिद यांनी पोलिस कॉन्स्टेबलच्या पदासाठी आणि यशवंत भिसे यांनी तलाठी पदासाठी निवड होण्यासाठी प्रयत्न केले होते. ‘खंडपीठाने पूर्वी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे ‘तृतीयपंथी’ म्हणून स्पर्धेत सहभागी होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, हे उमेदवार निवड प्रक्रियेतील प्रयत्नांत कमी पडले. सर्वोच्च न्यायालयाने ‘नालसा’ निवाड्यात आरक्षण देण्याचा आदेश दिलेला असल्याने तृतीयपंथींसाठी आरक्षण देण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा, अशीही विनंती या तीन तृतीयपंथींनी अॅड. क्रांती एल.सी व अॅड. कौस्तुभ गीध यांच्यामार्फत केली होती. त्याबाबतच्या अंतिम सुनावणीअंती २६ ऑक्टोबर रोजी राखून ठेवलेला निर्णय खंडपीठाने बुधवारी जाहीर केला.

सरकारी नोकऱ्या व शिक्षण संस्थांमधील प्रवेशाबाबतच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ५० टक्क्यांची मर्यादा असल्याने तृतीयपंथींना आरक्षण पुरवण्याचा आदेश देण्याबाबत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने बुधवारी असमर्थता दर्शवली. मात्र, त्याचवेळी ‘तृतीयपंथींना केवळ त्यांची स्वतंत्र ओळख देऊन आणि त्यांच्या हक्कांबाबत जाणीव ठेवून भागणार नसून त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी देऊनच कायद्याचा हेतू साध्य होईल. त्यासाठी सरकारने कल्याणकारी उपायांनी हा मार्ग मोकळा करायला हवा’, असे निरीक्षण नोंदवत तीन तृतीयपंथी उमेदवारांना संधी निर्माण करणारा आदेशही ‘मॅट’ने दिला. १. तीन तृतीयपंथी उमेदवारांना संधीचा आदेशसरकारी नोकऱ्या व शिक्षण संस्थांमधील प्रवेशाबाबतच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ५० टक्क्यांची मर्यादा असल्याने तृतीयपंथींना आरक्षण पुरवण्याचा आदेश देण्याबाबत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) असमर्थता दर्शवली. ‘तृतीयपंथीयांना केवळ त्यांची ओळख देऊन आणि त्यांच्या हक्कांबाबत जाणीव ठेवून भागणार नसून त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी देऊनच कायद्याचा हेतू साध्य होईल. त्यासाठी सरकारने कल्याणकारी उपायांनी हा मार्ग मोकळा करायला हवा’, असे निरीक्षण नोंदवत तीन तृतीयपंथी उमेदवारांना संधी निर्माण करणारा आदेशही ‘मॅट’ने दिला.

२. मॅट ने नोंदविली निरिक्षणे‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही तृतीयपंथींना त्यांची स्वत:ची ओळख देऊन त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि सर्व प्रकारच्या भेदभावापासून सुरक्षित ठेवण्यासाठी तृतीयपंथी व्यक्ती कायदा करण्यासाठी केंद्राने साडेचार वर्षे घेतली. तृतीयपंथींना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांचा सक्रिय सहभाग, हेच सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याप्रमाणे व कायद्याने अभिप्रेत आहे. त्याअनुषंगानेच कायद्यात कलम ३ व ८ची तरतूद आहे. तरीही आजतागायत एकाही तृतीयपंथीला सरकारी नोकरी नाही, हे सरकारने दिलेल्या माहितीतूनच स्पष्ट होते. समाजात महिला वर्गाचेच अनंत काळापासून शोषण झाले. अनादि काळापासून अस्तित्वात असलेल्या आणि अल्पसंख्याक असलेल्या तृतीयपंथींचेही शोषण होत आले आहे. सरकार हे बहुसंख्याकांकडून स्थापन होत असले तरी त्यांच्याकडून वंचितांचे हक्क मारले जाऊ शकत नाही. त्यामुळे आरक्षण नसले तरी तृतीयपंथींना सरकारी नोकऱ्या मिळाव्यात यादृष्टीने सकारात्मक भेदभाव करत सरकारने विविध उपायांनी त्यांना संधी उपलब्ध करणे गरजेचे आहे’, असे निरीक्षण ‘मॅट’ने आपल्या २६ पानी निर्णयात नोंदवले आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसTransgenderट्रान्सजेंडर