शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

नव्या मैत्रिपर्वाला वेध विजयाच्या ‘हॅट्ट्रिक’चे !

By admin | Updated: June 26, 2015 22:02 IST

कऱ्हाडची बदलती राजकीय समीकरणे : जिल्हा बँक, ‘कृष्णा’ कारखान्यानंतर आता लक्ष बाजार समितीवर

प्रमोद सुकरे - कऱ्हाड -काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून उंडाळकर व भोसले या दोघांचाही पराभव झाला. आपल्या मतविभागणीचा फायदा दुसऱ्यालाच होतोय, हे कळून चुकल्यानंतर ‘कोयने’चे पेढे अन् ‘जयवंत शुगर’ची साखर एकमेकांना भरवत नव्या मैत्रिपर्वाला सुरुवात झाली. जिल्हा मध्यवर्ती बँक व कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत मैत्रिपर्वाला यशही मिळालंय. त्यामुळे या दोन्ही गटांनी आता येऊ घातलेल्या बाजार समिती निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असून, विजयाची हॅट्ट्रिक मारण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे.दिवंगत जयवंतराव भोसले व माजी आमदार विलासराव पाटील यांचे सख्ख्य तसे खूप जुनेच ! या दोन्ही गटांनी अपवाद वगळता अनेकदा अनेक निवडणुकींत परस्परांना मदतीचा हात दिला आहे; पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच या दोन्ही कुटुंबांतील व्यक्ती एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्या; पण तिरंगी लढतीत या दोघांनाही पराभव स्वीकारावा लागला.राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो, या तत्त्वानुसार झाले गेले सर्व विसरून डॉ. अतुल भोसले व अ‍ॅड. उदय पाटील या दोन युवा नेत्यांच्यात नव्या मैत्रिपर्वाला सुरुवात झाली. या मैत्रिपर्वाने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची पहिली परीक्षा दिली. विलासराव पाटील-उंडाळकर या परीक्षेत दहाव्यांदा चांगल्या गुणांनी पास झाले. त्यानंतर कृष्णा साखर कारखान्याची रणधुमाळी सुरू झाली. त्यात उंडाळकरांनी भोसलेंना बिनशर्त पाठिंबा देऊ केला. अटीतटीच्या या तिरंगी लढतीतही मैत्रिपर्वाने बाजी मारली. विधानसभेतील पराभवानंतर या दोन्ही गटांना मिळालेला एक-एक विजय कार्यकर्त्यांना सुखावणारा आहे. त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच चार्ज झाल्याचे दिसतात. ‘इरादा पक्का अन् दे धक्का’ असे फ्लेक्स आता झळकू लागले असून, त्यावर ‘आता लक्ष बाजार समिती..!’ असा आवर्जून उल्लेख केलेला दिसतो. त्यामुळे हे दोन्ही नेते विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी फिल्डिंग लावून बसलेत, हे नक्की !उंडाळकरांची संघटना पुन्हा एकवटणार ?उंडाळकर-भोसले या दोन नेत्यांनी नव्या मैत्रिपर्वाला सुरुवात केली खरी; पण हे मैत्रिपर्व सर्वच उंडाळकर समर्थकांना पचनी पडल्याचे दिसले नाही. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत उंडाळकरांची संघटना काहीशी विस्कळीत झाल्याची दिसली; पण बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही संघटना पुन्हा एकवटणार का ? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.वडिलांच्या विजयासाठी मुलांची धडपडजिल्हा बँक निवडणुकीसाठी विलासराव पाटील उभे होते. तर कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत डॉ. सुरेश भोसले उभे होते. त्यामुळे आपल्या वडिलांच्या विजयासाठी अ‍ॅड. उदय पाटील व डॉ. अतुल भोसले यांनी प्रयत्नांची पराकष्ठा केली. त्याचीच चर्चा कार्यकर्त्यांच्यात आहे.‘सह्याद्री’ची निवडणूक पथ्यावरसह्याद्री सहकारी साखर कारखान्याची यंदा निवडणूक झाली. खरं तर धूर्त असणाऱ्या उंडाळकरांनीच ती पडद्यामागे राहून लावली. त्यात विरोधकांचा पराभव झाला. आमदार बाळासाहेब पाटील यांचे पॅनेलच विजयी झाले. मात्र ही निवडणूक लागणेच उंडाळकरांच्या पथ्यावर पडले. जिल्हा बँक निवडणुकीतही त्याचा उंडाळकरांना फायदा झाला. बाजार समितीच्या निवडणुकीतही त्याचा या नव्या मैत्रिपर्वाला फायदा होईल, असे मानले जाते.