शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

निवडणुकीत गुंतलेले नेते दुष्काळाकडे पाहणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 22:18 IST

खटाव - माणमध्ये १०१ गावांना १०९ टँकरद्वारे पाणी

शेखर जाधव/वडूज : खटाव - माण तालुक्यातील जनावरांसह माणसांच्या पिण्याच्या पाण्याची भीषण कमतरता जाणवू लागली आहे. सद्यस्थितीत पेयजल टंचाई निवारणार्थ १०१ गावांना १०९ टँकरद्वारे पाण्याचे वाटप सुरु आहे. तर टँकर व गावांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यामुळे संबंधित प्रशासनाला पाणी उपलब्ध करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करणे महाकठीण बनत आहे. पण, निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेल्या नेत्यांना या परिस्थितीकडे पाहण्यास वेळ नाही.

अपुऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे खटाव - माण तालुक्यात यावर्षी पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची चणचण प्रामुख्याने जाणवू लागली आहे. त्यातच सद्यस्थितीत उरमोडी, जिहे-कटापूर व तारळी पाणी साठ्याचे प्रमाण कमी आहे. खटाव - माणला वरदायिनी ठरणाऱ्या जिहे-कटापूर सिंचन योजनेचे पाणी येरळा नदी व माणगंगेला प्रवाहित केले असते तर हे पाण्याचे भीषण संकट उद्भवले नसते, असे जाणकारांमधून मत व्यक्त होत आहे. दोन्ही तालुक्यातील सिंचन योजनेद्वारे येणारे पाणी याबाबत दुजाभाव झाल्याच्या चर्चा खटाव तालुक्यात सुरु आहेत. शेतीसाठी व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी खटाव तालुका पाणी संघर्ष समितीने आवाज उठवून प्रशासनाला वेठीस धरले होते. या आंदोलनाचे फलित म्हणून उशिरा का होईना खटाव तालुक्यात अत्यल्प पाणी सोडण्यात आले.पाण्याअभावी शेतीपिके करपून गेली. तर सध्या जनावरे व माणसांच्या पाण्यासाठी दोन्ही तालुक्यांतील जनतेची भटकंती सुरु आहे.

खटाव तालुक्यातील ६८ हजार लोकांना पाणीबाणीखटाव तालुक्यातील ४१ गावे आणि १०७ वाड्या-वस्त्यांमध्ये ६७ हजार ९६४ बाधित लोकसंख्या व १२ हजार ८९२ बाधित पशुधन असल्याने २९ खासगी टँकर व दोन शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. यामध्ये मांजरवाडी , गोसाव्याचीवाडी, मांडवे, पेडगाव, गोपूज, सातेवाडी, नवलेवाडी, मोळ, राजापूर, रणसिंगवाडी, रेवलकरवाडी, पांढरवाडी, हिंगणे, तडवळे, एनकूळ, डांभेवाडी, कणसेवाडी, धारपुडी, गादेवाडी, दरुज, खटाव, गारवडी, आवळे पठार, जाखणगाव, औंध, भोसरे, लोणी, कोकराळे, अंभेरी, शिंदेवाडी, कानकात्रे, ढोकळवाडी, कलेढोण, जायगाव, कामथी, उंबरमळे, शिंदेवाडी कटगुण, कातळगेवाडी, धोंडेवाडी, पळसगाव, दातेवाडी, अनफळे, पडळ अशा गावांमध्ये दैनंदिन ६७ टँकर खेपा सुरू आहेत. तर यासाठी १९ विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत .

माण तालुक्यात १ लाख लोकसंख्येला पाणीटंचाईमाण तालुक्यात १ लाख ८ हजार ८७५ बाधित लोकसंख्या व १ लाख ६२५० बाधित पशुधन आहे. एकूण ६० गावे आणि ३७० वाड्या-वस्त्यांना ७८ टँकर द्वारे १५१ दैनंदिन टँकर खेपामधून पाणी वाटप करण्यात येत आहे. तर यासाठी २६ विहिरी आणि इंधन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. दोन्ही तालुक्यातील उन्हाचा पारा ४० शी ओलांडत चालला असून, पाण्याची पातळी मृत साठ्याच्याही खाली गेली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस दुष्काळाचे सावट गडद होत चालले आहे.

जिल्ह्यातील पाणी साठ्याचे सुयोग्य नियोजन केले असते तर ही वेळ खटाव - माण तालुक्यावर आलीच नसती, अशी टीका खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत आहे. पाण्यासाठी दाहीदिशा फिरणारी जनता तर लोकसभेच्या प्रचारासाठी स्वहित जोपासत मेळावे घेणारे राजकीय नेते असे विदारक चित्र सध्या खटाव - माण तालुक्यात दिसून येत आहे .

दुष्काळाचे गडद सावट....राजकीय नेत्यांचे दुर्लक्षखटाव व माण तालुक्यात १०१ गावे आणि ४७७ वाड्यांमधील १ लाख ७६ हजार ८३९ बाधित लोकसंख्या व १ लाख १९ हजार १८२ बाधित पशुधनासाठी १०९ टँकरद्वारे दैनदिन २४४ खेपांमधून पाणी वाटप करण्यात येत आहे. तर दोन्ही तालुक्यांत एकूण ४५ विहिरी आणि इंधन विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खटाव - माण तालुक्यावर दुष्काळाचे सावट गडद होत चालले आहे.

टॅग्स :satara-pcसाताराdroughtदुष्काळ