शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

पाटणला पुन्हा खासदारकी मिळणार का ? : श्रीनिवास पाटील, नरेंद्र पाटील यांच्या नावाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:01 IST

अनेक वर्षांपासून पाटण तालुक्याने केंद्रात केलेल्या नेतृत्वाला मतदार संघ विभाजनाचा फटका बसला आणि तालुक्याची खासदारकीची परंपरा दहा वर्षांपूर्वी खंडित झाली. कोणाला कोणत्या पक्षातून

ठळक मुद्देपुन्हा नेतृत्व मिळणार का? ; केंद्राच्या राजकारणातही होता दबदबा

रवींद्र माने ।ढेबेवाडी : अनेक वर्षांपासून पाटण तालुक्याने केंद्रात केलेल्या नेतृत्वाला मतदार संघ विभाजनाचा फटका बसला आणि तालुक्याची खासदारकीची परंपरा दहा वर्षांपूर्वी खंडित झाली. कोणाला कोणत्या पक्षातून संधी मिळणार? याहीपेक्षा पुन्हा तालुक्याला नेतृत्व मिळणार का, या आशेने मतदारांसह कार्यकर्तेही लढाईसाठी सज्ज झाले आहेत.

पाटण तालुक्यातील दिवंगत आनंदराव चव्हाण, दिवंगत प्रेमलाकाकी चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आदींनी सातारा, सांगली जिल्ह्याचे नेतृत्व केंद्रात केले. आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून याच तालुक्यातील माथाडी चळवळीचे नेते नरेंद्र पाटील अथवा राष्ट्रवादीतून श्रीनिवास पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

दरम्यान, यावेळी राजकीय पक्षाऐवजी किमान कºहाड, पाटणकर मंडळी घरच्या उमेदवारालाच जास्त पसंती देतील, असे चित्र दोन्ही तालुक्यांत दिसत आहे. आपल्या तालुक्यातील उमेदवार हाय का? या एकाच विषयावर अलीकडे चर्चा रंगू लागल्या आहेत.कºहाडचे रहिवासी असले तरी पाटणसारख्या दुर्गम तालुक्यातील कुंभारगावच्या चव्हाण आणि मारुल हवेलीच्या पाटील कुटुंबातील मातब्बरांनी देशाच्या राजकीय क्षेत्रात दिशादर्शकाची यशस्वी भूमिका पार पाडली आहे. जवळपास संसदेच्या स्थापनेपासूनच म्हणजे १९५७ पासून दिवंगत खासदार आनंदराव ऊर्फ दाजीसाहेब रामराव चव्हाण यांनी शेतकरी कामगार पक्षातून कºहाड लोकसभा मतदार संघाची धुरा खांद्यावर घेतली. त्यावेळचे मातब्बर असलेल्या रामानंद भारती यांचा पराभव झाला होता.

सन १९६० मध्ये खासदार दाजीसाहेब यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पुन्हा ते १९६२ मध्ये याच मतदार संघातून निवडून येऊन खासदार झाले. दाजीसाहेबांनी १९५७ मध्ये खांद्यावर घेतलेली खासदारकीची पताका सन १९७३ पर्यंत म्हणजेच त्यांच्या देहावसानापर्यंत अखंडितपणे फडकत ठेवली. त्यांच्या मृत्यूनंतर या मतदार संघातील मतदारांनी पुन्हा त्यांच्या पत्नी प्रेमलाकाकी यांना बिनविरोध निवडून देऊन काम करण्याची संधी दिली. काकी खासदार झाल्या आणि पुन्हा एकदा दुर्गम असलेल्या पाटण तालुक्यातील महिला दिल्लीमध्ये या मतदार संघाचे नेतृत्व करू लागली.

सन १९७९ ते १९८४ याच कालावधीमध्ये या मतदार संघाचे नेतृत्व कºहाड तालुक्याकडे म्हणजेच दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्याकडे मतदारांनी सोपवले. मात्र याही कालावधीमध्ये पक्षनेतृत्वाने खासदार काकींना राज्यसभेवर घेऊन त्यांच्या कामाचा सन्मान केला. सन १९८४ ते १९९१ पर्यंत अखंडपणे काकींनी आपल्या कुशल बुद्धीने हा मतदार संघ ताब्यात ठेवला होता. त्यानंतर सन १९९१ मध्ये त्यांचे सुपुत्र पृथ्वीराज चव्हाण यांनी या मतदार संघातून आपले नशीब अजमावले. माता-पित्यांनी या मतदार संघात सुमारे पस्तीस वर्षे केलेल्या कामाच्या जोरावर पृथ्वीराज चव्हाणही खासदार झाले आणि पाटण तालुका पुन्हा एकदा सन्मानाने उजळला.

सन १९९४ मध्ये काँग्रेसमधील काही नेत्यांनी वेगळी चूल मांडली. तरीही चव्हाण घराणे राष्ट्रीय काँग्रेस सोबतच कायम राहिले. यावेळी मात्र या घराण्याची खासदारकीची परंपरा खंडित झाली; पण याचवेळी याच तालुक्यातील श्रीनिवास पाटील यांच्या रुपाने मारुल हवेलीचे एक नवे नेतृत्व उदयास आले. सनदी अधिकारी म्हणून केलेले काम आणि शरद पवारांचे मार्गदर्शन याच्या जोरावर या मतदार संघात श्रीनिवास पाटील यांनी विकासाचा आलेख नेहमीच चढता ठेवला.

श्रीनिवास पाटील यांच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण यांना जरी हार मानावी लागली तरी झालेले खासदार हे पाटणचेच होते. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या हुशारीवर त्यांना पक्षाने पुन्हा राज्यसभेवर घेऊन सन्मान केला. यामुळे पाटण तालुक्याला एकाच वेळी दोन-दोन खासदार मिळाले. त्यानंतर मात्र या मतदार संघाची पुनर्रचना झाली आणि पाटणची पकड निसटली. त्यामुळे तसा विचार केला तर आणि तुलना करता अलीकडे पाटण आणि कºहाड तालुक्यात विकासाचा गाडा पूर्णत: थांबला. विद्यमान खासदारांवर जरी जनतेचे प्रेम निष्ठा असली तरी त्यांच्यासोबत असणाऱ्या मंडळींवर मतदार आणि जनता खूपच नाराज असल्याचे जाणवते.

एकूणच आता या मतदार संघात उमेदवारांची चाचपणी चालू आहे. राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे. तर भाजपाकडून पाटणच्याच नरेंद्र पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, उमेदवारीबाबत पाटण तालुक्यातीलच जनतेला मोठी उत्सुकता लागली आहे. कोणत्या पक्षातून उमेदवारी कोणाला मिळेल, याहीपेक्षा तालुक्यातील कोणाला उमेदवारी मिळेल. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, खासदार पाटणचाच करायचा. या मानसिकतेमध्ये तालुक्यातील जनता असल्याने निर्माण झालेल्या या वातावरणाचा भाग्यवान कोण? नरेंद्र पाटील की श्रीनिवास पाटील, हे उमेदवारीवरूनच ठरेल, हे निश्चित.

इतिहास पाटणचा... खासदार परंपरेचा...आनंदराव ऊर्फ दाजीसाहेब चव्हाणसन १९५७ ते १९६२ : कºहाड लोकसभा खासदारसन १९६२ ते १९६४ : संरक्षण राज्यमंत्रीसन १९६४ ते १९६६ : अन्न व कृषी मंत्रीसन १९६७ ते १९६९ : कामगार पुनर्वसन मंत्रीसन १९६९ ते १९७१ : पेट्रोलियम मंत्रीदिवंगत खासदार प्रेमिलाकाकी चव्हाणसन १९७३ : कºहाड लोकसभा बिनविरोध निवडसन १९७७ ते १९७९ : कºहाड लोकसभा खासदार म्हणून फेरनिवडसन १९८० ते १९८४ : राज्यसभेवर निवडसन १९८४ ते १९८९ : खासदारसन १९८९ ते १९९१ : खासदारपृथ्वीराज चव्हाणसन १९९१ ते १९९९ : कºहाड लोकसभा खासदारसन २००५ ते २०१३ : राज्यसभा सदस्य व केंद्र्रातील विविध खात्यांचे मंत्रीश्रीनिवास पाटीलसन १९९९ ते २००४ : कºहाड लोकसभा खासदारसन २००४ ते २००९ : कºहाड लोकसभा खासदार

आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून याच तालुक्यातीलमाथाडी चळवळीचे नेते नरेंद्र पाटील अथवा राष्ट्रवादीतून श्रीनिवास पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.