शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

हमीभावाने सोयाबीन खरेदीचा निर्णय, फायदा होणार ?; शेतकऱ्यांमध्ये साशंकता 

By नितीन काळेल | Updated: September 9, 2024 18:48 IST

तर क्विंटलला ३०० रुपये तरी जादा मिळणार 

सातारा : सोयाबीनला कमी दर मिळत असल्याने केंद्र शासनाने राज्यात हमीभावाने खरेदीला मान्यता दिली आहे. यामुळे सध्याच्या दरानुसार ३०० रुपये तरी क्विंटलला जादा मिळतील. याचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. परंतु, मागील अनुभव पाहता नियमामुळे आणि सक्षम यंत्रणा नसल्याने शेतकऱ्यांचा खरंच फायदा होणार का? याबाबत साशंकता आहे.राज्यात मागील काही वर्षांत सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यात तर यावर्षी ९६ हजार हेक्टरवर सोयाबीन आहे. पण वर्षभरात क्विंटलचा दर साडेचार हजार रुपयांदरम्यानच राहिला. यामुळे शेतकऱ्यांवर घरात सोयाबीन ठेवण्याची वेळ आली. सध्या खरिपातील सोयाबीन काढणीची वेळ आली तरी हमीभावाएवढाही दर मिळत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी मान्यता दिली आहे.

सोयाबीन उत्पादकांना मदत व्हावी आणि बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये, यासाठी खरेदी केंद्रे सुरू होणार आहे. पण याचा फायदा शेतकऱ्यांना होणार का? याविषयी साशंकता आहे. अशा केंद्रांमुळे निराशा होत आहे. शासकीय यंत्रणा कमकुवत ठरत आहे. केंद्रावर सोयाबीन नेल्यास दर्जा नाही, घाण-माती आहे, ग्रेडमध्ये बसत नाही, अशी कारणे सांगून हमीभावही टाळला जातो, असे शेतकरी सांगतात.

  • जिल्ह्यात सोयाबीन क्षेत्र - ९६ हजार हेक्टर
  • सध्या मिळणारा क्विंटलचा दर - सरासरी ४५०० ते ४६००
  • हमीभाव - ४८९२

केंद्र शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदीचा निर्णय घेतला तरी केंद्रांवर व्यापारीधार्जिणे धोरण असते. नियम आणि विविध कारणे सांगून दर मिळत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन कोठेही विकले आणि पक्की पावती आणली तर हमीभावाएवढा दर मिळण्यासाठी वरील फरकाची रक्कम द्यावी. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी