शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
2
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
5
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
6
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
7
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
8
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
9
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
10
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
11
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
12
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
13
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
14
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
15
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
16
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
17
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
18
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
19
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
20
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या

वन्यहद्दीत प्राण्यांची राजरोस शिकार

By admin | Updated: February 10, 2015 23:56 IST

अन्नसाखळी धोक्यात : कोळेनजीक जंगलात शिकाऱ्यांचा वावर वाढला, हिंस्त्र श्वापदांचा मोर्चा लोकवस्तीकडे

कुसूर : वनविभागाच्या कोळे येथील क्षेत्रात शिकाऱ्यांचा वावर वाढला आहे. रानडुक्कर, मोर, ससे, साळींदर आदि वन्यप्राण्यांची शिकार होत आहे. या शिकारीमुळे बिबट्यांसारख्या हिंस्त्र श्वापदांच्या भक्ष्यांमध्ये कमालीची घट झाली आहे. परिणामी बिबट्यांचा वावर वस्त्या आणि गावांमधूनही होऊ लागल्याच्या घटना घडत आहेत. तारूख, बामणवाडी, वानरवाडीसह कोळे क्षेत्रातील अन्य काही क्षेत्रात मोठया प्रमाणात वृक्ष लागवड आहे. वन्यप्राण्यांना पोषक वातावरण असल्यामुळे प्राण्यांची संख्या जास्त आहे. मात्र या प्राण्यांची शिकार होत आहे. बाहेरून आलेले शिकारी या परिसरात शिकारीसाठी फिरताना दिसत आहेत. मोर, ससे, रानडुक्कर, साळींदर या प्राण्यांची शिकार केली जात आहे. या घटनांमुळे नैसर्गिक साखळी तुटली जात असून त्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर लोकवस्तीपर्यंत होऊ लागला आहे. साखळीमधील बहुतांश प्राण्यांची संख्या कमालीची कमी झाली आहे. शिकाऱ्यांचा उपद्रप, डोंगरात लागणारे वणवे आणि सरपणासाठी होणाऱ्या वृक्षतोडीमुळे वन्यप्राण्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. हिंस्त्र प्राण्यांना साखळीमधील सावज मिळत नसल्यामुळे या प्राण्यांनी लोकवस्ती मधील पाळीव प्राण्यांना लक्ष्य केले आहे. बिबट्यांकडून होणाऱ्या हल्यांमुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. उजाड पडलेल्या डोंगरांमुळे बिबट्याने थेट शिवारातील ऊसाच्या शेतात आपला तळ ठोकला आहे. वन्यप्राण्यांना त्रास देत असलेल्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)जाळीसह बंदुकीचाही वापरशिकारी शिकार करण्यासाठी येताना आवश्यक असणारे साहित्य सोबतच घेऊन येत आहेत. शिकार करण्यासाठी त्यांच्याकडून जाळी, भाला, बंदूक आणि इलेक्ट्रीक करंटचा वापर केला जात आहे. मात्र, वनखात्यांकडून कधीही त्यांची तपासणी केली जात नाहीवीजप्रवाहाचा प्रयोग जीवघेणारानडुक्करांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने काही शेतकऱ्यांकडून शेताकडेने तार फिरवली जाते. त्या तारेमध्ये वीज प्रवाह सोडला जातो. रानडुक्कर पिकामध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत असताना वीजेचा धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू होतो. हा प्रकार भयानक असून अशा प्रकारामुळे एखाद्या व्यक्तीचा जिव जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.नुकसान लाखांत, भरपाई हजारांतबिबट्याच्या हल्ल्यात पाळीव जनावरे मारली गेल्यास वनविभागाकडून नुकसान भरपाई दिली जाते. मात्र, ही भरपाई अतीशय तोकडी असते. एखाद्या शेतकऱ्याचे लाख रूपयाचे नुकसान झाले असेल तर त्याला मिळणारी भरपाई काही हजारातच असते. या तुटपुंज्या भरपाईमुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून येत नाही.