शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वन्यहद्दीत प्राण्यांची राजरोस शिकार

By admin | Updated: February 10, 2015 23:56 IST

अन्नसाखळी धोक्यात : कोळेनजीक जंगलात शिकाऱ्यांचा वावर वाढला, हिंस्त्र श्वापदांचा मोर्चा लोकवस्तीकडे

कुसूर : वनविभागाच्या कोळे येथील क्षेत्रात शिकाऱ्यांचा वावर वाढला आहे. रानडुक्कर, मोर, ससे, साळींदर आदि वन्यप्राण्यांची शिकार होत आहे. या शिकारीमुळे बिबट्यांसारख्या हिंस्त्र श्वापदांच्या भक्ष्यांमध्ये कमालीची घट झाली आहे. परिणामी बिबट्यांचा वावर वस्त्या आणि गावांमधूनही होऊ लागल्याच्या घटना घडत आहेत. तारूख, बामणवाडी, वानरवाडीसह कोळे क्षेत्रातील अन्य काही क्षेत्रात मोठया प्रमाणात वृक्ष लागवड आहे. वन्यप्राण्यांना पोषक वातावरण असल्यामुळे प्राण्यांची संख्या जास्त आहे. मात्र या प्राण्यांची शिकार होत आहे. बाहेरून आलेले शिकारी या परिसरात शिकारीसाठी फिरताना दिसत आहेत. मोर, ससे, रानडुक्कर, साळींदर या प्राण्यांची शिकार केली जात आहे. या घटनांमुळे नैसर्गिक साखळी तुटली जात असून त्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर लोकवस्तीपर्यंत होऊ लागला आहे. साखळीमधील बहुतांश प्राण्यांची संख्या कमालीची कमी झाली आहे. शिकाऱ्यांचा उपद्रप, डोंगरात लागणारे वणवे आणि सरपणासाठी होणाऱ्या वृक्षतोडीमुळे वन्यप्राण्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. हिंस्त्र प्राण्यांना साखळीमधील सावज मिळत नसल्यामुळे या प्राण्यांनी लोकवस्ती मधील पाळीव प्राण्यांना लक्ष्य केले आहे. बिबट्यांकडून होणाऱ्या हल्यांमुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. उजाड पडलेल्या डोंगरांमुळे बिबट्याने थेट शिवारातील ऊसाच्या शेतात आपला तळ ठोकला आहे. वन्यप्राण्यांना त्रास देत असलेल्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)जाळीसह बंदुकीचाही वापरशिकारी शिकार करण्यासाठी येताना आवश्यक असणारे साहित्य सोबतच घेऊन येत आहेत. शिकार करण्यासाठी त्यांच्याकडून जाळी, भाला, बंदूक आणि इलेक्ट्रीक करंटचा वापर केला जात आहे. मात्र, वनखात्यांकडून कधीही त्यांची तपासणी केली जात नाहीवीजप्रवाहाचा प्रयोग जीवघेणारानडुक्करांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने काही शेतकऱ्यांकडून शेताकडेने तार फिरवली जाते. त्या तारेमध्ये वीज प्रवाह सोडला जातो. रानडुक्कर पिकामध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत असताना वीजेचा धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू होतो. हा प्रकार भयानक असून अशा प्रकारामुळे एखाद्या व्यक्तीचा जिव जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.नुकसान लाखांत, भरपाई हजारांतबिबट्याच्या हल्ल्यात पाळीव जनावरे मारली गेल्यास वनविभागाकडून नुकसान भरपाई दिली जाते. मात्र, ही भरपाई अतीशय तोकडी असते. एखाद्या शेतकऱ्याचे लाख रूपयाचे नुकसान झाले असेल तर त्याला मिळणारी भरपाई काही हजारातच असते. या तुटपुंज्या भरपाईमुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून येत नाही.