शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

वन्यहद्दीत प्राण्यांची राजरोस शिकार

By admin | Updated: February 10, 2015 23:56 IST

अन्नसाखळी धोक्यात : कोळेनजीक जंगलात शिकाऱ्यांचा वावर वाढला, हिंस्त्र श्वापदांचा मोर्चा लोकवस्तीकडे

कुसूर : वनविभागाच्या कोळे येथील क्षेत्रात शिकाऱ्यांचा वावर वाढला आहे. रानडुक्कर, मोर, ससे, साळींदर आदि वन्यप्राण्यांची शिकार होत आहे. या शिकारीमुळे बिबट्यांसारख्या हिंस्त्र श्वापदांच्या भक्ष्यांमध्ये कमालीची घट झाली आहे. परिणामी बिबट्यांचा वावर वस्त्या आणि गावांमधूनही होऊ लागल्याच्या घटना घडत आहेत. तारूख, बामणवाडी, वानरवाडीसह कोळे क्षेत्रातील अन्य काही क्षेत्रात मोठया प्रमाणात वृक्ष लागवड आहे. वन्यप्राण्यांना पोषक वातावरण असल्यामुळे प्राण्यांची संख्या जास्त आहे. मात्र या प्राण्यांची शिकार होत आहे. बाहेरून आलेले शिकारी या परिसरात शिकारीसाठी फिरताना दिसत आहेत. मोर, ससे, रानडुक्कर, साळींदर या प्राण्यांची शिकार केली जात आहे. या घटनांमुळे नैसर्गिक साखळी तुटली जात असून त्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर लोकवस्तीपर्यंत होऊ लागला आहे. साखळीमधील बहुतांश प्राण्यांची संख्या कमालीची कमी झाली आहे. शिकाऱ्यांचा उपद्रप, डोंगरात लागणारे वणवे आणि सरपणासाठी होणाऱ्या वृक्षतोडीमुळे वन्यप्राण्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. हिंस्त्र प्राण्यांना साखळीमधील सावज मिळत नसल्यामुळे या प्राण्यांनी लोकवस्ती मधील पाळीव प्राण्यांना लक्ष्य केले आहे. बिबट्यांकडून होणाऱ्या हल्यांमुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. उजाड पडलेल्या डोंगरांमुळे बिबट्याने थेट शिवारातील ऊसाच्या शेतात आपला तळ ठोकला आहे. वन्यप्राण्यांना त्रास देत असलेल्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)जाळीसह बंदुकीचाही वापरशिकारी शिकार करण्यासाठी येताना आवश्यक असणारे साहित्य सोबतच घेऊन येत आहेत. शिकार करण्यासाठी त्यांच्याकडून जाळी, भाला, बंदूक आणि इलेक्ट्रीक करंटचा वापर केला जात आहे. मात्र, वनखात्यांकडून कधीही त्यांची तपासणी केली जात नाहीवीजप्रवाहाचा प्रयोग जीवघेणारानडुक्करांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने काही शेतकऱ्यांकडून शेताकडेने तार फिरवली जाते. त्या तारेमध्ये वीज प्रवाह सोडला जातो. रानडुक्कर पिकामध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत असताना वीजेचा धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू होतो. हा प्रकार भयानक असून अशा प्रकारामुळे एखाद्या व्यक्तीचा जिव जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.नुकसान लाखांत, भरपाई हजारांतबिबट्याच्या हल्ल्यात पाळीव जनावरे मारली गेल्यास वनविभागाकडून नुकसान भरपाई दिली जाते. मात्र, ही भरपाई अतीशय तोकडी असते. एखाद्या शेतकऱ्याचे लाख रूपयाचे नुकसान झाले असेल तर त्याला मिळणारी भरपाई काही हजारातच असते. या तुटपुंज्या भरपाईमुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून येत नाही.