शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

तुम्ही भारताच्या झेंड्याच्या बाजूने का विरोधात ? : फडणवीस, चव्हाणांना विचारला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 2:00 PM

पृथ्वीराज चव्हाणांनी अगोदर ३७० च्या बाजूने की विरोधात, तिरंग्याच्या बाजूने की विरोधात? याचा खुलासा करावा, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देतुम्ही भारताच्या झेंड्याच्या बाजूने का विरोधात ? : देवेंद्र फडणवीस पृथ्वीराज चव्हाणांना कऱ्हाडमध्येच विचारला सवाल, पवारांचे वक्तव्य बरोबर नाही

कऱ्हाड : पंतप्रधानांनी काश्मीरमधील ३७० चे कलम रद्द करण्याची हिंमत दाखविली. त्यानंतर उदयनराजेंसारख्या अनेक स्वाभिमानी नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राजेंच्या प्रवेशानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी हा तर लोकशाहीचा खून केला, अशी टीका केली. चव्हाणांनीही अगोदर ३७० च्या बाजूने की विरोधात, तिरंग्याच्या बाजूने की विरोधात? याचा खुलासा करावा, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला.कऱ्हाड येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्र्रकांत पाटील, माजी खासदार उदयनराजे भोसले, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, मदनराव मोहिते, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अ‍ॅड. भरत पाटील, एकनाथ बागडी आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ७० वर्षांनंतर एखादा पक्ष किंवा नेता काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतो आणि अशावेळेला काँगे्रस-राष्ट्रवादीचे नेते ३७० कलमाच्या बाजूने बोलणार असतील, तर ही बाब देशहिताची नाही.पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती या सरकारने चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला. मात्र, ७००-८०० टक्के पडणारा पाऊस पाहिल्यानंतर भविष्यातील याचे नियोजन करण्यासाठी जागतिक बँकेकडे संपर्कसाधला आहे.

डिजास्टर प्रूफ इन्फ्रास्ट्रक्चर करता येईल का? हेही पाहणार आहे. त्याशिवाय धरणाच्या सांडव्यातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे कसे वळविता येईल, याबाबतही अभ्यास सुरू असून, ते पाणी दुष्काळी भागाकडे वळविल्याने पाणी वाटपाच्या लवादाचा प्रश्नच येत नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.उदयनराजे मुक्त विद्यापीठउदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश करताना कॉलर उडवली नाही. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना शिस्त लागत आहे, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत छेडले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उदयनराजे हे मुक्त विद्यापीठ आहे. त्यामुळे त्यांचा स्वतंत्र अभ्यासक्रम आहे. कुठं शिस्तीत वागायचं अन् कुठं मुक्त वागायचं, हे त्यांना चांगलं कळतं, असे ते म्हणाले. त्यावर तुम्ही त्यांना संघाच्या नियमानुसार शपथ घ्यायला लावणार काय? असा प्रश्न विचारताच त्यांना काय अडचण नाही, तुम्हाला काय अडचण आहे का? असा सवाल त्यांनी केला.पवारांचे वक्तव्य बरोबर नाहीभारतामधील मुसलमान देशाचा अभिमान बाळगणारे आहेत. पाकिस्तानचं कौतुक करून इथला मुसलमान राष्ट्रवादीला मते देणार नाही. त्यामुळे शरद पवारांनी आपल्या वक्तव्याचा पाकिस्तानला उपयोग होईल, अशी विधाने करणे योग्य नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSatara areaसातारा परिसर