शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

तुम्ही भारताच्या झेंड्याच्या बाजूने का विरोधात ? : फडणवीस, चव्हाणांना विचारला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 14:09 IST

पृथ्वीराज चव्हाणांनी अगोदर ३७० च्या बाजूने की विरोधात, तिरंग्याच्या बाजूने की विरोधात? याचा खुलासा करावा, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देतुम्ही भारताच्या झेंड्याच्या बाजूने का विरोधात ? : देवेंद्र फडणवीस पृथ्वीराज चव्हाणांना कऱ्हाडमध्येच विचारला सवाल, पवारांचे वक्तव्य बरोबर नाही

कऱ्हाड : पंतप्रधानांनी काश्मीरमधील ३७० चे कलम रद्द करण्याची हिंमत दाखविली. त्यानंतर उदयनराजेंसारख्या अनेक स्वाभिमानी नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राजेंच्या प्रवेशानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी हा तर लोकशाहीचा खून केला, अशी टीका केली. चव्हाणांनीही अगोदर ३७० च्या बाजूने की विरोधात, तिरंग्याच्या बाजूने की विरोधात? याचा खुलासा करावा, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला.कऱ्हाड येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्र्रकांत पाटील, माजी खासदार उदयनराजे भोसले, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, मदनराव मोहिते, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अ‍ॅड. भरत पाटील, एकनाथ बागडी आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ७० वर्षांनंतर एखादा पक्ष किंवा नेता काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतो आणि अशावेळेला काँगे्रस-राष्ट्रवादीचे नेते ३७० कलमाच्या बाजूने बोलणार असतील, तर ही बाब देशहिताची नाही.पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती या सरकारने चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला. मात्र, ७००-८०० टक्के पडणारा पाऊस पाहिल्यानंतर भविष्यातील याचे नियोजन करण्यासाठी जागतिक बँकेकडे संपर्कसाधला आहे.

डिजास्टर प्रूफ इन्फ्रास्ट्रक्चर करता येईल का? हेही पाहणार आहे. त्याशिवाय धरणाच्या सांडव्यातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे कसे वळविता येईल, याबाबतही अभ्यास सुरू असून, ते पाणी दुष्काळी भागाकडे वळविल्याने पाणी वाटपाच्या लवादाचा प्रश्नच येत नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.उदयनराजे मुक्त विद्यापीठउदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश करताना कॉलर उडवली नाही. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना शिस्त लागत आहे, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत छेडले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, उदयनराजे हे मुक्त विद्यापीठ आहे. त्यामुळे त्यांचा स्वतंत्र अभ्यासक्रम आहे. कुठं शिस्तीत वागायचं अन् कुठं मुक्त वागायचं, हे त्यांना चांगलं कळतं, असे ते म्हणाले. त्यावर तुम्ही त्यांना संघाच्या नियमानुसार शपथ घ्यायला लावणार काय? असा प्रश्न विचारताच त्यांना काय अडचण नाही, तुम्हाला काय अडचण आहे का? असा सवाल त्यांनी केला.पवारांचे वक्तव्य बरोबर नाहीभारतामधील मुसलमान देशाचा अभिमान बाळगणारे आहेत. पाकिस्तानचं कौतुक करून इथला मुसलमान राष्ट्रवादीला मते देणार नाही. त्यामुळे शरद पवारांनी आपल्या वक्तव्याचा पाकिस्तानला उपयोग होईल, अशी विधाने करणे योग्य नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSatara areaसातारा परिसर