शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाराष्ट्रपुत्राला वीरमरण, जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 17:38 IST

जवान संदीप रघुनाथ सावंत जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शहीद झाले होते.

सातारा - जम्मू आणि काश्मीरमध्ये देशसेवेचं कर्तव्य बजावत असताना साताऱ्यातील जवान ज्ञानेश्वर जाधव यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. ज्ञानेश्वर हे खटाव तालुक्यातील धकटवाडी या मूळ गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या निधनाची बातमी कळताच, गावासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. सन 2015 मध्ये ते बीएसएफमध्ये भरती झाले होते. साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनीही आपल्या ट्विटरवरुन ज्ञानेश्वर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील जवान संदीप रघुनाथ सावंत जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शहीद झाले होते. गेल्याच आठवड्यात शुक्रवारी सकाळी कऱ्हाडमध्ये त्यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यानंतर, शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी, सैन्य दलातील अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या घटनेच्या 8 दिवसांतच साताऱ्यातील आणखी एका जवानाने देशासाठी आपलं बलिदान दिलंय. उद्या त्यांचे पार्थिव मूळ गावी येणार असल्याचे समजते. 

शहीद ज्ञानेश्वर जाधव हे सन 2015 मध्ये बीएसएफमध्ये भरती झाले होते. खटाव येथून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ते सैन्य दलात भरती झाले. गेल्या 5 वर्षांपासून ते देशसेवा करत. दोन वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते, त्यांना सहा महिन्यांचा मुलगाही आहे. वडूज पोलीस ठाण्यातून अधिकृतपणे त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. या घटनेनं जाधव कुटुंबासह गावात शोककळा पसरली आहे. तसेच, भाजपा नेते माजी खासदार उदयनराजेंनीही ट्विटर व फेसबुकवरुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBSFसीमा सुरक्षा दलJammu Kashmirजम्मू-काश्मीरMartyrशहीद