शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: स्वत:च्या शेतात गवत पेटविले, आग लागली दुसऱ्याच्या उसाला; दोघांवर गुन्हा नोंद

By नितीन काळेल | Updated: March 3, 2023 14:17 IST

शेतकऱ्याचे मोठे नुकसान

सातारा : शेतातील गवत पेटविताना आवश्यक ती उपाययोजना न केल्याने शेजारील शेतकऱ्याच्या उसाला आग लागली. तसेच शेती साहित्याचेही नुकसान झाले. ही घटना माण तालुक्यातील वडगाव येथे घडली. याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी विजयकुमार दगडू ओंबासे (रा. वडगाव) या शेतकऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार रघुनाथ गणपत बोराटे, विशाल रघुनाथ बोराटे (दोघेही रा. बिदाल, ता. माण) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दि. १ मार्च रोजी सकाळच्या सुमारास वडगाव येथील खोरीचा तलाव नावाच्या शिवारात हा प्रकार घडला आहे. संशयितांनी स्वत:च्या शेतातील गवत पेटविले होते; पण आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे गवताला लागलेली आग तक्रारदाराच्या उसात गेली. तक्रारदाराचा एक वर्ष झालेला ३० गुंठे क्षेत्रात ऊस होता. तसेच ठिबक सिंचनची पाइप, केबल तसेच इतर शेती उपयोगी साहित्य आगीत सापडले. आग लागल्याने आंब्याचे झाडही होरपळले. त्याचबरोबर आग पसरत गेल्यामुळे बाजूच्या शेतकऱ्यांच्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे. हवालदार बी. एस. खांडेकर हे अधिक माहिती घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग