शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

'आपले राज्य आज कोठे आहे?', पृथ्वीराज चव्हाणांनी कोणत्या मुद्द्यांवर बोट ठेवले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 23:54 IST

आज सरकारची आर्थिक परिस्थिती मोठी वाईट आहे. कर्ज वाढत चालले आहे. व्याज वाढत चालले आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

-प्रमोद सुकरे, कराड"आज राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला. या अर्थसंकल्पनातून सर्व वर्गाला मोठ्या आशा होत्या. मात्र यातून कोणत्याही घटकाला समाधान  मिळालेली नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे", असे मत काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले. यावेळी त्यांनी महायुतीने विधानसभेला दिलेली आश्वासने आणि राज्याच्या आर्थिक स्थितीच्या मुद्द्यावर बोट ठेवले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, या अर्थसंकल्पाकडे शेतकरी, महिला सर्वांचेच डोळे लागले होते.पण कर्जमाफीची घोषणा न केल्याने शेतकरी वर्ग निराश झाला आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीनेलाडकी बहीण योजना सुरू केली. प्रत्येक महिलेला १५०० रुपये प्रति महिना देण्याचा निर्णय राबविला. त्याचा प्रभाव निवडणुकीत दिसून आला. पण पुन्हा सत्तेत आलो तर ही रक्कम २१०० रुपये वाढवून देण्याचे दिलेले आश्वासन या सरकारने पाळलेले दिसत नाही.

आज सरकारची आर्थिक परिस्थिती मोठी वाईट आहे. कर्ज वाढत चालले आहे. व्याज वाढत चालले आहे. त्यामुळे विकासाला निधी कमी पडत आहे. फक्त मोठ्या घोषणा केल्या जात आहेत. पण ज्या विभागांना मोठ्या प्रमाणात निधी वर्ग व्हायला पाहिजे त्यांना निधी मिळताना दिसत नाही.

महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन म्हणून ओळखले जात होते. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आकार मोठा आहे. पण प्रति व्यक्ती वार्षिक उत्पन्न जर काढले तर आपले राज्य आज कोठे आहे? याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. यामध्ये इतर राज्ये पुढे गेली आहेत ही बाब ध्यानात घेण्याची गरज आहे असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMahayutiमहायुतीladki bahin yojanaलाडकी बहीण योजना