शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान धन कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:36 IST

सातारा : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये १५ हजार ६७३ शासकीय कर्मचारी तसेच निमशासकीय कर्मचारी राबले परंतु अद्याप त्यांना ...

सातारा : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये १५ हजार ६७३ शासकीय कर्मचारी तसेच निमशासकीय कर्मचारी राबले परंतु अद्याप त्यांना निवडणुकीतील भत्ता मिळालेला नाही, त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत नुसताच मान धन कधी मिळणार असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यामध्ये २२३ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली उर्वरित ६५२ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, ए आर ओ, क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान कर्मचारी, शिपाई, पोलीस कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ग्रामपंचायतीवर नेण्याची सोय वाहनाद्वारे केली होती मात्र संपूर्ण दिवस या कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावर काम केले तसेच रात्री उशिरापर्यंत मतदान पेट्या करून तयार करून मोजणी ठिकाणापर्यंत आणण्याचे काम देखील या कर्मचाऱ्यांनी केले आणि दुसऱ्या दिवशी मतमोजणीचे काम देखील मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांच्या वर होते. मात्र या निवडणुकीचा भत्ता त्यांना मिळाला नसल्याने नाराजी आहे.

पॉइंटर

जिल्ह्यात निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती : ६५२

निवडणुकीत कर्तव्य बजावलेले अधिकारी : ३१६१

निवडणुकीत कर्तव्य बजावलेले कर्मचारी : १२५१२

तालुकानिहाय आढावा

सातारा : ग्रामपंचायती ८९, कर्मचारी २४०३

जावली : ग्रामपंचायती ३७, कर्मचारी ५८७

कोरेगाव : ग्रामपंचायती ४९, कर्मचारी १११५

वाई : ग्रामपंचायती ५७, कर्मचारी ११८३

महाबळेश्वर : ग्रामपंचायती १४, कर्मचारी २३१

खंडाळा : ग्रामपंचायती ५०, कर्मचारी ९९६

फलटण : ग्रामपंचायती ७४, कर्मचारी १९३४

माण : ग्रामपंचायती ४७, कर्मचारी ११३०

खटाव : ग्रामपंचायती ७६, कर्मचारी २०२२

कऱ्हाड : ग्रामपंचायती ८७, कर्मचारी २५९७

पाटण : ग्रामपंचायती ७२, कर्मचारी : १४९५

निधीची अडचण काय

ग्रामपंचायतींचा कारभार ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून चालतो. ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया मात्र महसूल खात्याच्या माध्यमातून राबविण्यात येते. त्यासाठी ग्रामविकास विभागाकडून महसूल खात्याला जो निधी मिळतो, त्यातूनच निवडणुकीचा संपूर्ण खर्च करावा लागतो. हा निधी अत्यल्प असल्याने काटकसर करून महसूल विभाग निवडणुका पार पाडतो.