शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
4
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
5
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
6
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
7
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
8
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
9
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
10
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
11
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
12
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
13
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
14
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
15
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
16
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
17
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
18
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
19
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
20
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...

साताऱ्यातील डीपी बोले तो ‘डेथ पास’!

By admin | Updated: October 30, 2015 23:40 IST

गल्लोगल्ली मृत्यूचा सापळा : मांजा काढताना विजेचा झटका बसल्याने विद्यार्थी जखमी तरीही फ्युजपेट्या उघड्याच

सातारा : वाढलेली झाडी, कचरा कुंडी म्हणून होणारा वापर, मृत जनावरे आणून टाकण्याचे ठिकाण म्हणून अलीकडे डीपी बॉक्स ठेवलेल्या जागांचा वापर होताना दिसत आहे. वीजवितरण कंपनीच्या अक्षम्य दुर्लक्षमुळे गेल्या काही दिवसांत हे डीपी मृत्यूचा शॉर्टकट ‘आ’ वासून उभे असल्याचे धक्कादायक वास्तव शहरात पाहायला मिळाले. डीपी म्हणजे मृत्यूच्या जवळ नेणारे ‘डेथ पास’ असे म्हणण्याची वेळ सातारकरांवर आली आहे. मंगळवारी शहरातील मंगळवार तळे परिसरात सोमनाथ ढेबे या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलाला विजेचा धक्का बसल्याने तो गंभीर स्वरूपात जखमी झाला. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील डीपी आणि सामान्यांची सुरक्षितता याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या परिसरातील नागरिकांच्या मते, गेल्या अनेक महिन्यांपासून येथील डीपीचे दार लावण्याचीही तसदी कोणी घेत नव्हते. या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील विविध भागांतील डीपींची अवस्था पाहताना अंगावर शहारे आले. कोणत्याही सुरक्षा यंत्रणेशिवाय वीजवितरण कंपनीने या डीपींची उभारणी केली आहे. शालेय वयात मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर खोडकरपणा असतो. आपल्या मित्रांमध्ये आपण ‘हिरो’ ठरावे, यासाठी त्यांची धडपड असते. त्यामुळे पालकांनीही मुलांना धोक्याची समज देणे आवश्यक आहे. नित्यनियमाने मुलांचे होणाऱ्या अपघातांविषयी घरात मुलांशी चर्चा होणे आवश्यक असते. हा अपघात का घडला, त्यातील धोके काय होते, ते कसे टाळता आले, असते याविषयी जेवतानाही बोलणे शक्य आहे. घरांमध्ये मुलांना समजायला नको म्हणून अशा चर्चा होत नाहीत, त्यामुळे पुढील अनेक धोके संभवतात. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कृती केल्यानंतर त्याचे होणारे परिणाम मुलांना सांगितले तर अनेक अपघात टाळता येऊ शकतात. पालकांनीही बोलते झाले पाहिजे. (प्रतिनिधी) चक्क जाहिरातींसाठी वापर सातारा शहरात जुना आरटीओ रस्त्यावर एक वीजवितरणचा डीपी आहे. त्यावर चक्क जाहिराती लावण्यात आल्या आहेत. दुकानात काही आणण्याच्या निमित्ताने फूटपाथवरून जाणाऱ्या चिमुरड्यांच्या हाताला हा डीपी सहज येतो. डीपी वर चिटकवलेल्या जाहिरातीचा कागद फाडण्याच्या नादात जर लहानग्यांनी त्याला हात लावला तर मोठा अनर्थ घडू शकतो, असे येथील स्थानिक सांगतात. त्यामुळे येथे जाहिराती चिटकविण्यापेक्षा धोक्याची सूचना लिहिण्यात यावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. उघड्या फ्युजपेट्या शहरातील बहुतांश फ्युजपेट्या पत्र्याच्या आहेत. त्यांना कडी-कोयंडा नाहीत. या पेट्यांचा वापर चित्रपटांचे पोस्टर, जाहिराती चिटकविण्यासाठी केला जात आहे. हे चिटकवत असताना मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाला आहे. त्यामुळे या पेट्या बदलून त्याठिकाणी जाहिराती चिटकविण्यास मज्जाव करणे गरजेचे आहे, असे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.