शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
2
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
3
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
4
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
5
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
6
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
8
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
9
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
10
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
11
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
12
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
13
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
14
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
15
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
16
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
17
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
18
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
19
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
20
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात

सातारा जिल्ह्यातील दीड लाख बेरोजगारांना नोकऱ्या कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 11:39 PM

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये तब्बल दीड लाख युवक-युवती बेरोजगार आहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये तब्बल दीड लाख युवक-युवती बेरोजगार आहेत. त्यांच्या भविष्याबाबत काय धोरण आखणार आहे? असा प्रश्न भारतीय समाजवादी रिपब्लिकन पक्षाने उपस्थित केला असून, सरकारी नोकºया तत्काळ सुरु कराव्यात, या प्रमुख मागणीसह इतर १० मागण्यांसाठी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे विविध संघटनांच्या वतीने चक्री उपोषण करण्यात आले. जिल्ह्यामध्ये रोजगार निर्माण करणारे कार्यालय आहे, त्यात बेकारांची ८० हजार इतकी संख्या नोंदणीकृत आहे. नोंदकृत नसणारे बेकारांची संख्या मिळालेल्या माहितीनुसार ७० हजार इतकी आहे. या युवक-युवतींच्या भविष्याचे काय? याचे उत्तर मिळाले पाहिजे. सामाजिक परिस्थिती चिंताजनक आहे, अशी खंत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्यापुढे व्यक्त करण्यात आली.

सरकारी नोकरांच्या पेन्शन २००५ पासून सर्वांना सुरू करावी, भटके विमुक्त, धनगर, वंजारी व विशेष मागास प्रवर्ग यांचा समावेश अनुसूचित जमातीत करावा, कंत्राटी पद्धती बंद करावी, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी खासगीकरण केलेल्या सर्व उद्योगधंद्यांना, सेवा उद्योगांना लागू करावी, खासगी सेवा उद्योगातील कर्मचाºयांना कायद्याने संरक्षण द्या, अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जमाती, विशेष प्रवर्ग सहकारी संस्थांचे खासगीकरण थांबवा व तिथे तत्काळ नोकर भरती सुरू करावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.

या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, त्या केल्या नाहीत तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी भारिपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, भारतीय समाजवादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष लक्ष्मण माने, दगडू सस्ते, नेताजी गुरव, बाळासाहेब शिरसाट, दादासाहेब ओव्हाळ, भालचंद्र माळी, मच्छिंद्र जाधव यांच्या सहीचे निवेदन देण्यात आले.नोटाबंदी निर्णयात जनता अंधारातनोटाबंदीचा निर्णय घेताना जनतेला विश्वासात घेतले नाही. बेकारी, बेरोजगारी, गरिबी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तरुणांच्या हाताला काम नाही, शिक्षण मोफत नाही, कर्ज काढून शिक्षण घ्यायचे आणि बेरोजगार व्हायचे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.