शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

तुटक्या बुंध्यांना जेव्हा भाले फुटतात...

By admin | Updated: January 19, 2017 00:29 IST

पांढरवाडी वृक्षतोडी प्रकरण : ग्रामस्थांमधून कडाडून निषेध; मुंबईत धरणे तर पांढरवाडीत आज ग्रामसभा

दहिवडी : पांढरवाडी, ता. माण येथे माथेफिरूने झाडाची कत्तल केली असून, दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक झाली नाही. त्यानंतर या तुटक्या बुंध्यांना जणू भाले फुटले असून संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, पांढरवाडी ग्रामस्थांनी या घटनेचा कडाडून निषेध केला असून गुरुवार, दि. १९ रोजी सकाळी ग्रामसभेचे आयोजन केले आहे. अशी माहिती सरपंच पुष्पलता सूर्यवंशी यांनी दिली.तर दुसरीकडे या घटनेच्या निषेधार्थ मुंबई येथे स्थायिक असलेल्या पांढरवाडीसह चार गावातील ग्रामस्थांनी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.सिने अभिनेते सयाजी शिंदे, सुभाष घाडगे महाराज, तुषार खरात प्रशासकीय विभाग यांच्या पुढाकाराने व लोकसहभागाने पांढरवाडी, दिवडी, कोळेवाडी, गोडसेवाडी या ठिकाणी २५ हजार झाडांची लागवड केली आहे. तर दहिवडी-सातारा रस्त्यावरील पांढरवाडी बसस्टॉप ते जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी दुतर्फा वृक्षांची लागवड केली होती. मात्र, पण काही विकृत मनोवृत्तीच्या नतद्रष्टाने यातील ५० झाडे सोमवारी मध्यरात्री तोडून टाकली. या घटेनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.त्यानंतर पोलिस विभागीय अधिकारी यशवंत काळे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, सहायक पोलिस उपनिरीक्षक युवराज हांडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती. या घटनेला ४८ तास उलटले तरी कोणालाही अटक झाली नाही. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण ६३ क्रमांकाचा असून, या झाडांची देखभाल ग्रामपंचायतीकडे आहे. बुधवारी चार वनक्षेत्रपाल, अधिकारी राजेंद्र धुमाळ, वनपाल काश्मीर शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मुख्यमंत्र्यांनी घटनेची दखल घ्यावीजलयुक्त शिवार अभियानाच्या चळवळीअंतर्गत ही झाडे लावली होती. या चार गावांतील लोकांनी अभूतपूर्व अशी एकजूट करून महाराष्ट्रात आदर्शवत ठरतील, अशी कामे केली आहेत; पण अशा सामाजिक कार्यात अडथळे आणणाऱ्या समाजकंटकांवर पोलिस काहीच कारवाई करणार नसतील तर चांगल्या भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल खचले जाईल. या चार गावांतील जलयुक्त शिवार अभियानातील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.