शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
8
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
9
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

तुटक्या बुंध्यांना जेव्हा भाले फुटतात...

By admin | Updated: January 19, 2017 00:29 IST

पांढरवाडी वृक्षतोडी प्रकरण : ग्रामस्थांमधून कडाडून निषेध; मुंबईत धरणे तर पांढरवाडीत आज ग्रामसभा

दहिवडी : पांढरवाडी, ता. माण येथे माथेफिरूने झाडाची कत्तल केली असून, दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक झाली नाही. त्यानंतर या तुटक्या बुंध्यांना जणू भाले फुटले असून संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, पांढरवाडी ग्रामस्थांनी या घटनेचा कडाडून निषेध केला असून गुरुवार, दि. १९ रोजी सकाळी ग्रामसभेचे आयोजन केले आहे. अशी माहिती सरपंच पुष्पलता सूर्यवंशी यांनी दिली.तर दुसरीकडे या घटनेच्या निषेधार्थ मुंबई येथे स्थायिक असलेल्या पांढरवाडीसह चार गावातील ग्रामस्थांनी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.सिने अभिनेते सयाजी शिंदे, सुभाष घाडगे महाराज, तुषार खरात प्रशासकीय विभाग यांच्या पुढाकाराने व लोकसहभागाने पांढरवाडी, दिवडी, कोळेवाडी, गोडसेवाडी या ठिकाणी २५ हजार झाडांची लागवड केली आहे. तर दहिवडी-सातारा रस्त्यावरील पांढरवाडी बसस्टॉप ते जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी दुतर्फा वृक्षांची लागवड केली होती. मात्र, पण काही विकृत मनोवृत्तीच्या नतद्रष्टाने यातील ५० झाडे सोमवारी मध्यरात्री तोडून टाकली. या घटेनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.त्यानंतर पोलिस विभागीय अधिकारी यशवंत काळे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, सहायक पोलिस उपनिरीक्षक युवराज हांडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती. या घटनेला ४८ तास उलटले तरी कोणालाही अटक झाली नाही. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण ६३ क्रमांकाचा असून, या झाडांची देखभाल ग्रामपंचायतीकडे आहे. बुधवारी चार वनक्षेत्रपाल, अधिकारी राजेंद्र धुमाळ, वनपाल काश्मीर शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मुख्यमंत्र्यांनी घटनेची दखल घ्यावीजलयुक्त शिवार अभियानाच्या चळवळीअंतर्गत ही झाडे लावली होती. या चार गावांतील लोकांनी अभूतपूर्व अशी एकजूट करून महाराष्ट्रात आदर्शवत ठरतील, अशी कामे केली आहेत; पण अशा सामाजिक कार्यात अडथळे आणणाऱ्या समाजकंटकांवर पोलिस काहीच कारवाई करणार नसतील तर चांगल्या भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल खचले जाईल. या चार गावांतील जलयुक्त शिवार अभियानातील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.