शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तुटक्या बुंध्यांना जेव्हा भाले फुटतात...

By admin | Updated: January 19, 2017 00:29 IST

पांढरवाडी वृक्षतोडी प्रकरण : ग्रामस्थांमधून कडाडून निषेध; मुंबईत धरणे तर पांढरवाडीत आज ग्रामसभा

दहिवडी : पांढरवाडी, ता. माण येथे माथेफिरूने झाडाची कत्तल केली असून, दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक झाली नाही. त्यानंतर या तुटक्या बुंध्यांना जणू भाले फुटले असून संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, पांढरवाडी ग्रामस्थांनी या घटनेचा कडाडून निषेध केला असून गुरुवार, दि. १९ रोजी सकाळी ग्रामसभेचे आयोजन केले आहे. अशी माहिती सरपंच पुष्पलता सूर्यवंशी यांनी दिली.तर दुसरीकडे या घटनेच्या निषेधार्थ मुंबई येथे स्थायिक असलेल्या पांढरवाडीसह चार गावातील ग्रामस्थांनी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.सिने अभिनेते सयाजी शिंदे, सुभाष घाडगे महाराज, तुषार खरात प्रशासकीय विभाग यांच्या पुढाकाराने व लोकसहभागाने पांढरवाडी, दिवडी, कोळेवाडी, गोडसेवाडी या ठिकाणी २५ हजार झाडांची लागवड केली आहे. तर दहिवडी-सातारा रस्त्यावरील पांढरवाडी बसस्टॉप ते जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी दुतर्फा वृक्षांची लागवड केली होती. मात्र, पण काही विकृत मनोवृत्तीच्या नतद्रष्टाने यातील ५० झाडे सोमवारी मध्यरात्री तोडून टाकली. या घटेनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.त्यानंतर पोलिस विभागीय अधिकारी यशवंत काळे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, सहायक पोलिस उपनिरीक्षक युवराज हांडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती. या घटनेला ४८ तास उलटले तरी कोणालाही अटक झाली नाही. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण ६३ क्रमांकाचा असून, या झाडांची देखभाल ग्रामपंचायतीकडे आहे. बुधवारी चार वनक्षेत्रपाल, अधिकारी राजेंद्र धुमाळ, वनपाल काश्मीर शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मुख्यमंत्र्यांनी घटनेची दखल घ्यावीजलयुक्त शिवार अभियानाच्या चळवळीअंतर्गत ही झाडे लावली होती. या चार गावांतील लोकांनी अभूतपूर्व अशी एकजूट करून महाराष्ट्रात आदर्शवत ठरतील, अशी कामे केली आहेत; पण अशा सामाजिक कार्यात अडथळे आणणाऱ्या समाजकंटकांवर पोलिस काहीच कारवाई करणार नसतील तर चांगल्या भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल खचले जाईल. या चार गावांतील जलयुक्त शिवार अभियानातील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.