शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचे चाक निखळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 16:35 IST

शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या भरधाव रिक्षाचे चाक निखळल्याने शाळकरी मुलांसह नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. मात्र, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी धाव घेऊन रिक्षाला हातभार लावल्याने मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देशाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचे चाक निखळलेसाताऱ्यातील घटनेने खळबळ : मोठा अनर्थ टळला

सातारा : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या भरधाव रिक्षाचे चाक निखळल्याने शाळकरी मुलांसह नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. मात्र, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी धाव घेऊन रिक्षाला हातभार लावल्याने मोठा अनर्थ टळला.याबाबत अधिक माहिती अशी,लहान मुलांची शाळा सुटल्यानंतर एक रिक्षाचालक पाच-सहा मुले घेऊन रिक्षातून घरी सोडण्यासाठी निघाला होता. समर्थ मंदिरहून राजवाड्याकडे येत असतानाच गोल मारूती मंदिराजवळ भरधाव रिक्षाचे उजव्या बाजूचे पाठीमागील चाक अचानक निखळले.

चाक बाजूला तीव्र उतारावरून गडगडत गेल्यामुळे मधल्या रॉडवर रिक्षा घासत काही अंतर पुढे गेली. ही घटना घडली त्यावेळी रस्त्यावर वर्दळ होती. हा अपघात पाहून नागरिकांच्या काळजाचा अक्षरश: थरकाप उडाला. रिक्षातील मुलांनी आरडाओरड केल्यामुळे काही नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन रिक्षाला हातभार लावला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.रिक्षा चालकाने या अपघातानंतर रिक्षाची अन्य दोन चाके तपासली असता या दोन्ही चाकांचेही नटबोल्ट सैल झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. जाणूनबुजून कोणीतरी खोडसाळपणे हा प्रकार केला असावा, अशी शंका रिक्षा चालकाने यावेळी व्यक्त केली. चालकाने पुन्हा रिक्षाला चाक बसवून मुलांना सुखरूप घरी सोडले.

टॅग्स :SchoolशाळाSatara areaसातारा परिसर