शहरं
Join us  
Trending Stories
1
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
4
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
5
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
6
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
7
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
8
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
9
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
10
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
11
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
12
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
13
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
14
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
15
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
16
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
17
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
18
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
19
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
20
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचे चाक निखळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 16:35 IST

शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या भरधाव रिक्षाचे चाक निखळल्याने शाळकरी मुलांसह नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. मात्र, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी धाव घेऊन रिक्षाला हातभार लावल्याने मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देशाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचे चाक निखळलेसाताऱ्यातील घटनेने खळबळ : मोठा अनर्थ टळला

सातारा : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या भरधाव रिक्षाचे चाक निखळल्याने शाळकरी मुलांसह नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. मात्र, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी धाव घेऊन रिक्षाला हातभार लावल्याने मोठा अनर्थ टळला.याबाबत अधिक माहिती अशी,लहान मुलांची शाळा सुटल्यानंतर एक रिक्षाचालक पाच-सहा मुले घेऊन रिक्षातून घरी सोडण्यासाठी निघाला होता. समर्थ मंदिरहून राजवाड्याकडे येत असतानाच गोल मारूती मंदिराजवळ भरधाव रिक्षाचे उजव्या बाजूचे पाठीमागील चाक अचानक निखळले.

चाक बाजूला तीव्र उतारावरून गडगडत गेल्यामुळे मधल्या रॉडवर रिक्षा घासत काही अंतर पुढे गेली. ही घटना घडली त्यावेळी रस्त्यावर वर्दळ होती. हा अपघात पाहून नागरिकांच्या काळजाचा अक्षरश: थरकाप उडाला. रिक्षातील मुलांनी आरडाओरड केल्यामुळे काही नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन रिक्षाला हातभार लावला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.रिक्षा चालकाने या अपघातानंतर रिक्षाची अन्य दोन चाके तपासली असता या दोन्ही चाकांचेही नटबोल्ट सैल झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. जाणूनबुजून कोणीतरी खोडसाळपणे हा प्रकार केला असावा, अशी शंका रिक्षा चालकाने यावेळी व्यक्त केली. चालकाने पुन्हा रिक्षाला चाक बसवून मुलांना सुखरूप घरी सोडले.

टॅग्स :SchoolशाळाSatara areaसातारा परिसर