शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

व्हाॅट्सॲपच्या ‘आपुलकी ग्रुप’ने दाखविली माणुसकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:37 IST

औंध : औंध येथील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मागील दोन दिवसांत एकाचवेळी ४७ कोरोनाबाधितांनी कोरोनावर ...

औंध : औंध येथील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मागील दोन दिवसांत एकाचवेळी ४७ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने परिसरात समाधानकारक वातावरण निर्मिती झाली आहे. सतत दोनअंकी रुग्णसंख्या सापडत असताना आता एक अंकीवर आल्याने कोरोनाला हरविण्यासाठी औंधकर सज्ज झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करून तब्बल ७० हजार रुपये रोख व अन्नधान्याची मदत कोरोनाग्रस्त कुटुंबाला ‘आपुलकी ग्रुपने’ करून माणुसकी जपली आहे.

औंधमध्ये एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढत चालला होता. दि. २० एप्रिल रोजी ग्रामपंचायत, व्यापारी व ग्रामस्थांनी जनता कर्फ्यू पुकारला, त्यानंतर आकडा आटोक्यात येईना म्हटल्यावर प्रांताधिकारी जनार्दन कासार व तहसीलदार किरण जमदाडे यांनी संपूर्ण औंध गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले. हा वाढता धोका लक्षात घेऊन औंधमधील एका वस्तीत कोरोना चाचणीचा कॅम्प लावण्यात आला. त्यामध्ये अनेक जण बाधित निघाले. या सर्वांचे विलगीकरण औंध येथील आश्रमशाळेत करण्यात आले. त्या सर्व कुटुंबांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता व्हाॅट्सॲपच्या ‘आपुलकी ग्रुप’च्या माध्यमातून आवाहन करण्यात आले. त्या आवाहनाला औंधसह पंचक्रोशीतील व औंधप्रेमींनी भरभरून मदत केली. दोन दिवसांत सत्तर हजार रुपये जमा झाले व जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपातही मोठ्या प्रमाणात मदत झाली. ही सर्व मदत बाधित कुटुंबाना देण्यात आली. त्यांना आधार देण्यात आला.

या लढाईत औंध ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी आपापल्या वाॅर्डात कोरोनाला हरवायचे, या उद्देशाने वाॅर्डात स्वतः खांद्यावर पंप घेऊन वाॅर्डाचे निर्जंतुकीकरण केले.

(चौकट...)

अन् आत्मविश्वास वाढला

काही औंधकरांनी आपले घरचे, जवळचे, नातेवाईक, मित्रमंडळी गमावले आहेत. त्यामुळे आता हातात हात घालून कोरोनाला हरवूया, अशी आर्त हाक एकमेकांना देत आहेत, तर सामाजिक कार्यकर्त्यांनीदेखील जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. दोन दिवसांत ४७ रुग्णांनी कोरोनाला हरविल्यामुळे औंधकरांचा आत्मविश्वास वाढला आहे, लवकरच आम्ही औंध कोरोनामुक्त करू, असा निश्चय सर्वांनी केला आहे.

फोटो : १६ औंध

औंध येथील आश्रमशाळेत विलगीकरणात असलेल्या ग्रामस्थांनी कोरोनावर मात केल्याने सर्वांचे स्वागत करून त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. (छाया-रशीद शेख)